शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
2
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबूतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
4
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
5
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
6
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
7
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
8
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
9
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
10
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
11
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
12
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
13
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
14
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
15
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
16
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
17
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
18
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...
19
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
20
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."

गढूळ पाणीपुरवठा, मनसेचा पालिका मुख्यालयात ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 01:09 IST

पुन्हा आंदोलनाचा इशारा : अधिकाऱ्यांना दूषित पाण्याच्या बाटल्या भेट

ठाणे : एकीकडे ठाणे शहर स्मार्ट सिटीकडे वाटचाल करीत आहे. मात्र, दुसरीकडे ठाणेकरांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळत नसल्याचे समोर आले आहे. ज्ञानेश्वरनगरातील रहिवाशांना मागील पाच ते सहा महिन्यांपासून गढूळ पाणीपुरवठा होत आहे. या विरोधात बुधवारी मनसने महापालिका मुख्यालयात ठिय्या आंदोलन केले. यावेळी अधिकारी आणि पालिकेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून प्रशासनाला गढूळ पाण्याच्या बाटल्याही भेट म्हणून दिल्या.

शहर अभियंता रवींद्र खडताळे यांनी येत्या तीन दिवसांत ही समस्या सोडवण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेतले असले तरी सात दिवसांत जर ही समस्या नाही सोडवली तर अधिकाऱ्यांच्या घरी जाऊन त्यांना हे गढूळ पाणी पाजले जाईल, असा इशारा मनसेने दिला आहे. यावेळी पोलिसांनी मनसेच्या १० जणांना पोलिसांनी अटक केली. मात्र त्यांची जामीनावर सुटका करण्यात आली.येथे होतो दूषित पाणीपुरवठा

स्मार्ट ठाण्यात ठाणेकरांना गढूळ पाणी प्यावे लागत असून ही गंभीर समस्या ज्यांच्या समोर मांडायची आहे ते पाणी खात्याचे उपअभियंता अर्जुन अहिरे सुटीवर असल्याने कार्यकर्ते चांगलेच संतापले. त्यांनी थेट आयुक्त कार्यालयात आंदोलनाचा इशारा दिला. मात्र, स्वत: नगर अभियंता पाण पुरवठा विभागात आल्याने कार्यकर्त्यांनी त्यांच्याकडे समस्या मांडली. वागळे, पाचपाखडी, वर्तकनगर, म्हाडा, लोकमान्यनगर, ज्ञानेश्वरनगर अशा अनेक भागात गढूळ पाण्याचा पाणीपुरवठा होत असल्याचे त्यांनी यावेळी शहर अभियंत्यांच्या निदर्शनास आणून दिले.

टॅग्स :MNSमनसे