शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
3
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
4
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
5
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
6
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
7
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
8
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
9
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
10
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
11
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
12
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
13
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
14
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
15
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
16
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
17
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
18
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
19
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
20
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली

गढूळ पाणीपुरवठा, मनसेचा पालिका मुख्यालयात ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 01:09 IST

पुन्हा आंदोलनाचा इशारा : अधिकाऱ्यांना दूषित पाण्याच्या बाटल्या भेट

ठाणे : एकीकडे ठाणे शहर स्मार्ट सिटीकडे वाटचाल करीत आहे. मात्र, दुसरीकडे ठाणेकरांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळत नसल्याचे समोर आले आहे. ज्ञानेश्वरनगरातील रहिवाशांना मागील पाच ते सहा महिन्यांपासून गढूळ पाणीपुरवठा होत आहे. या विरोधात बुधवारी मनसने महापालिका मुख्यालयात ठिय्या आंदोलन केले. यावेळी अधिकारी आणि पालिकेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून प्रशासनाला गढूळ पाण्याच्या बाटल्याही भेट म्हणून दिल्या.

शहर अभियंता रवींद्र खडताळे यांनी येत्या तीन दिवसांत ही समस्या सोडवण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेतले असले तरी सात दिवसांत जर ही समस्या नाही सोडवली तर अधिकाऱ्यांच्या घरी जाऊन त्यांना हे गढूळ पाणी पाजले जाईल, असा इशारा मनसेने दिला आहे. यावेळी पोलिसांनी मनसेच्या १० जणांना पोलिसांनी अटक केली. मात्र त्यांची जामीनावर सुटका करण्यात आली.येथे होतो दूषित पाणीपुरवठा

स्मार्ट ठाण्यात ठाणेकरांना गढूळ पाणी प्यावे लागत असून ही गंभीर समस्या ज्यांच्या समोर मांडायची आहे ते पाणी खात्याचे उपअभियंता अर्जुन अहिरे सुटीवर असल्याने कार्यकर्ते चांगलेच संतापले. त्यांनी थेट आयुक्त कार्यालयात आंदोलनाचा इशारा दिला. मात्र, स्वत: नगर अभियंता पाण पुरवठा विभागात आल्याने कार्यकर्त्यांनी त्यांच्याकडे समस्या मांडली. वागळे, पाचपाखडी, वर्तकनगर, म्हाडा, लोकमान्यनगर, ज्ञानेश्वरनगर अशा अनेक भागात गढूळ पाण्याचा पाणीपुरवठा होत असल्याचे त्यांनी यावेळी शहर अभियंत्यांच्या निदर्शनास आणून दिले.

टॅग्स :MNSमनसे