शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

व्हॅलेंटाइन डे च्या मुहूर्तावर ठाण्यात ३०० विद्यार्थ्यांना किल्ले सफारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:41 IST

ठाणे : ‘प्रेम करावे तर शिवाजी महाराजांच्या विचारांवर; त्यांच्या गडकिल्ल्यांवर करावे’ असा संदेश देऊन रविवारी व्हॅलेंटाइन डे चा ...

ठाणे : ‘प्रेम करावे तर शिवाजी महाराजांच्या विचारांवर; त्यांच्या गडकिल्ल्यांवर करावे’ असा संदेश देऊन रविवारी व्हॅलेंटाइन डे चा मुहूर्त साधून ठाण्यातील ३०० विद्यार्थ्यांना ‘शिवनेरी’ किल्ल्याची सफर घडविण्यात आली. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या ओवळा माजिवडा विधानसभा शाखेने हा अनोखा उपक्रम आयोजिला होता. सध्या पबजी आणि सोशल मीडियाच्या युगात विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले आणि त्याचा इतिहास समजावा यासाठी हा उपक्रम हाती घेत शिवरायांना वंदन करून शिवजयंतीच्या एक आठवडा आधीच शिवनेरीवर भगवा ध्वज फडकावण्यात आला.

कोरोना काळात लाॅकडाऊनमुळे शाळा बंद असल्याने शैक्षणिक सहलींना ब्रेक लागला होता. त्यातच रविवार सुट्टीचा दिवस आणि जगभर व्हॅलेंटाईन डे ची धूम सुरू असतानाच आठवडाभरावर आलेल्या शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर मनविसेने परिसरातील ३०० हून अधिक विद्यार्थी व विद्यार्थिनींना पुण्याच्या जुन्नर येथील शिवनेरी किल्ल्याची सफर घडवली. ठाणे ते पुणे असा बस प्रवास, विद्यार्थ्यांना नाश्ता, जेवण आदी सोयी उपक्रमात मोफत पुरविण्यात आल्या. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे यांच्या मार्गदर्शनाखाली उप शहर अध्यक्ष संदीप चव्हाण व सचिव मयूर तळेकर यांनी गेल्या महिनाभरापासून या उपक्रमासाठी विद्यार्थ्यांची नावनोंदणी सुरू केली होती. त्यानुसार विभाग अध्यक्ष विवेक भंडारे, उपविभाग अध्यक्ष सागर वर्तक, मंदार पाष्टे, सोमनाथ भोईटे, शाखाध्यक्ष निखिल येवले, आकाश मोरे, संदीप शेळके, दीपक पोळ, प्रशांत पालव, ऋषिकेश घुले, अमोल मड्ये, विघ्नेश शेलार यांच्या टीमने विद्यार्थ्यांची वर्गवारी करून त्यांना शिवनेरीवर नेणे, या किल्ल्याची विद्यार्थी वर्गास माहिती देणे अशी व्यवस्था पाहिली.

----------------

चौकट

गेल्या तीन वर्षांपासून हा उपक्रम सुरू आहे. यंदा अधिक मोठ्या प्रमाणात किल्ले सफर मोहीम हाती घेण्यात आली. पुढील वर्षी एका नव्या किल्ल्यावर विद्यार्थ्यांना नेण्यात येईल. त्यावेळी ही संख्या हजारोंच्या घरात असेल अशी माहिती यावेळी उपशहर अध्यक्ष संदीप चव्हाण यांनी दिली.