शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
3
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
4
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
5
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
6
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
7
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
8
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
9
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
10
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
11
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
12
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
13
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
14
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
15
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
16
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
17
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ
18
Nobel Prize: सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि उमर याघी यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर
19
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
20
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकत इतिहास रचला! त्या अमन सेहरावतला आखाड्यात उतरण्यावर बंदी; जाणून घ्या कारण

घनकचरा करवसुलीस माजी नगरसेवकाचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:27 IST

कल्याण : केडीएमसीने उत्पन्नवाढीचे मार्ग शोधले पाहिजेत; मात्र ते मार्ग नागरिकांच्या माथी कराचा बोजा वाढविणारे नसावेत. मनपाने घनकचरा करवसुलीची ...

कल्याण : केडीएमसीने उत्पन्नवाढीचे मार्ग शोधले पाहिजेत; मात्र ते मार्ग नागरिकांच्या माथी कराचा बोजा वाढविणारे नसावेत. मनपाने घनकचरा करवसुलीची सुरुवात करून कोरोनाकाळात आर्थिकदृष्ट्या बेजार झालेल्या नागरिकांच्या खिशाला कात्री लावली आहे. त्यामुळे या करवसुलीला शिवसेनेचे माजी नगरसेवक वामन म्हात्रे यांनी विरोध केला आहे.

मनपाने घनकचरा व्यवस्थापन करापोटी प्रत्येक मालमत्ताधारकाकडून दर दिवसाला दोन रुपये याप्रमाणे वर्षाला ७२० रुपये इतकी रक्कम मालमत्ताकराच्या बिलात आकारण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाकाळात नागरिकांची आर्थिक गणिते बिघडली आहेत. काहींच्या नोकऱ्या गेल्या आहेत, तर काहींच्या पगारात कपात झाली आहे. अशा अडचणी असताना मनपाने हा नवा कर लादला असून, तो रद्द करावा, अशी मागणी म्हात्रे यांनी मनपा प्रशासनाकडे केली आहे.

म्हात्रे यांनी यापूर्वी अनेकदा पाणी चोरीविरोधात आवाज उठविला आहे. मनपा हद्दीतील अनेक मालमत्तांकडून कर आकारला जात नाही. त्यांच्याकडून करआकारणी सुरू केल्यास मनपाच्या तिजोरीत मालमत्ता करापोटी एक हजार कोटींची भर पडू शकते. तसेच हजारो बेकायदा नळजोडण्या नियमित केल्यास त्यातून कोट्यवधी रुपये मिळतील; मात्र मनपाने त्याकडे दुर्लक्ष करत नागरिकांच्या माथी कचरा कर लादला आहे, असे ते म्हणाले.

सामान्य करदाते वाऱ्यावरच

- मनपाने २०११ ते २०२० दरम्यान विकासकामांवर २६ हजार कोटींचा भांडवली खर्च केला आहे. तरीही विकासकामे अपूर्ण आहेत.

- मनपाने मोकळ्या जागेवरील करात बिल्डरांना सूट दिली. त्यावेळी सामान्य नागरिकांना मालमत्ताकरात सूट देण्याचे आश्वासन दिले होते.

- बिल्डरांना सूट देऊन ते थकीत रकमेचा कोट्यवधींचा भरणा करत नसल्याने मनपाने दोनदा अभय योजना राबविली आहे. बिल्डरांना सूट देताना सामान्य करदात्यांचा विचार केला जात नसल्याचा आरोप म्हात्रे यांनी केला आहे.

------------------