शहरं
Join us  
Trending Stories
1
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
2
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
3
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
4
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
5
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
6
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
7
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
8
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
9
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
10
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
11
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
12
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
13
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
14
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
15
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
16
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
17
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
18
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
19
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
20
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट एक आणि खंडणीविरोधी पथकाच्या प्रमुखपदासाठी मोर्चेबांधणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : ठाण्याच्या खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे आणि गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकचे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : ठाण्याच्या खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे आणि गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकचे नितीन ठाकरे यांच्या बदलीनंतर याठिकाणी कोणाची वर्णी लागणार याकडे आता अनेक पोलीस अधिकाऱ्यांचे लक्ष लागले आहे. गुन्हे अन्वेषण विभागासह स्थानिक पोलीस ठाण्यांमधील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनीही या दोन जागांसाठी मोर्चेबांधणीला सुरुवात केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

एन्काउंटर स्पेशालिस्ट अधिकारी प्रदीप शर्मा यांच्या धडाकेबाज कामगिरीमुळे ठाण्याच्या खंडणीविरोधी पथकाला एक वेगळे वलय निर्माण झाले होते. मुंबई बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी दाऊद इब्राहिम याचा भाऊ इकबाल कासकर याला करोडो रुपयांच्या (चार फ्लॅट आणि ३० लाख रुपयांच्या) खंडणीप्रकरणी शर्मा, तसेच कोथमिरे यांच्या पथकाने १९ सप्टेंबर २०१७ रोजी अटक केली. अशा अनेक महत्त्वाच्या गुन्ह्यांची उकल केल्यानंतर २३ ऑगस्ट २०१७ रोजी खंडणीविरोधी पथकाच्या प्रमुखपदी आलेल्या शर्मा यांनी ४ जुलै २०१९ रोजी राजकारणात जाण्यासाठी राजीनामा दिला. त्यानंतर या पथकाची सूत्रे कोथमिरे यांच्याकडे आली. कोथमिरे यांनीही अनेक महत्त्वाच्या गुन्ह्यांची उकल केली. कुख्यात गँगस्टर एजाज लकडावाला याचा ५० लाखांच्या खंडणी प्रकरणात ८ फेब्रुवारी २०२१ रोजी मुंबईतून ताबा घेतला.

२५ जून २०१६ रोजी खंडणीविरोधी पथकात आलेल्या कोथमिरे यांची अलीकडेच ठाण्यातून बदली झाली होती; परंतु पुन्हा त्याच ठिकाणी नियुक्ती मिळविण्यात ते यशस्वी झाले होते. आता मात्र त्यांची थेट गडचिरोली येथे विशेष पोलीस महानिरीक्षकांचे वाचक (रीडर) म्हणून बदली झाली आहे. त्यांच्यापाठोपाठ युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांचीही ठाण्यातील कामगिरी चमकदार राहिली. जून २०१५ मध्ये मुंबईतून ठाण्यात ते आले होते. अगदी अलीकडे राबोडीत झालेल्या मनसेचे जमील शेख खून प्रकरणातही त्यांनी इरफान शेख आणि शाहीद शेख या दोघांना अटक केली होती. जिल्हा शासकीय रुग्णालयातून एक दिवसीय मुलाचे अपहरण झाले होते. या प्रकरणात एका महिलेसह तिघांना त्यांनी अटक केली होती. दिवा येथील एका खुनातील आरोपीला ३० वर्षांनी त्यांच्या पथकाने अटक केली. अशा अनेक गुन्ह्यांची त्यांच्या पथकाने उकल केली. आता ठाकरे यांचीही बदली नंदुरबार येथे जात पडताळणी विभागात झाली आहे. दोन वर्षांपूर्वीच ठाकरे यांचा कार्यकाळ संपला होता. तरीही या बदलीबद्दलही तर्कवितर्क केले जात आहेत.