शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
4
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
5
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
6
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
7
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
8
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
9
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
10
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
11
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
12
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
13
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
14
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
15
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
16
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
17
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
18
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
19
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
20
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन

वणव्यांमुळे वनसंपत्ती होतेय नष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2021 23:46 IST

वनविभागाने उपाययोजना करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कविक्रमगड : विक्रमगड तालुक्यासह  अनेक भागांत मार्च महिन्यात जंगलांना वणवे लागल्याचे चित्र दिसून येत आहे. या लावल्या जाणाऱ्या आगीमुळे मौल्यवान वनसंपत्ती नष्ट होण्याच्या मार्गावर असून वन्यप्राण्यांनादेखील याचा फटका बसून त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाल्याने वनविभागाने तत्काळ यावर उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. 

मागील काही वर्षांपासून जंगलात आगी लावण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यातच ससे, रानडुक्कर, हरीण यांची शिकार करण्यासाठी शिकारी जंगलांना आगी लावतात. मोठ्या प्रमाणात गवत असल्याने आणि हे गवत उन्हात तापलेले असल्याने आग मोठ्या प्रमाणात पसरते आणि आटोक्यात आणणे कठीण बनते. यामुळे वणवा पसरून पूर्ण डोंगर जळून खाक होताे.     आठ ते दहा वर्षांपूर्वी गावांमध्ये मोठ्या प्रमाणात बैल, गायी, म्हशी, रेडे शेतकऱ्यांकडे असायचे. मात्र, आता हे प्रमाण खूपच कमी झाले आहे. गावाचा विचार केला तर २० ते २५ पाळीव जनावरे गावामध्ये आढळून येतात. पूर्वी ही सगळी जनावरे शेतकरी जंगलात चरायला नेत असत. त्यामुळे जंगलात गवताचे प्रमाण कमी राहत होते. तसेच उन्हाळ्यातदेखील गुरांना चारण्यासाठी गवत लागत असल्याने सहसा कोणी जंगलात आगी लावत नसे. मात्र, सध्या गुरेढोरे राहिली नसल्याने जंगलात मोठ्या प्रमाणात गवत वाढते. त्यातच, काही शिकार करणारी समाजकंटक मंडळी जंगलाला आगी लावतात. त्यामुळे पूर्ण जंगल जळून राख होते. त्यामुळे काही प्रमाणात राहिलेल्या मुक्या जनावरांनादेखील खाण्यासाठी गवत उरत नसल्याने चाऱ्याच्या शोधात त्यांना रानोमाळ भटकावे लागते.    या लावल्या जात असलेल्या वणव्यांमध्ये नवीन उगवलेली जंगली झाडांची रोपे जाळून खाक होतात. 

सध्या जंगलात मोठ्या प्रमाणात वणवे लागल्याचे दिसून येत आहे. खरेतर, वनविभागाने याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असून वृक्षारोपणावर करोडो रुपये खर्च करण्यापेक्षा जर या वणव्यांवर नियंत्रण आणणाऱ्या अत्याधुनिक सामग्री घेतल्यास जंगल मोठ्या प्रमाणात वाचेल. त्याचबरोबर आगी लावणाऱ्या समाजकंटकांवर वनविभागाने कडक कारवाई करण्याची गरज आहे.- स्वप्नील ठाकरे, निसर्गप्रेमी

टॅग्स :thaneठाणे