शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

वणव्यांमुळे वनसंपत्ती होतेय नष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2021 23:46 IST

वनविभागाने उपाययोजना करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कविक्रमगड : विक्रमगड तालुक्यासह  अनेक भागांत मार्च महिन्यात जंगलांना वणवे लागल्याचे चित्र दिसून येत आहे. या लावल्या जाणाऱ्या आगीमुळे मौल्यवान वनसंपत्ती नष्ट होण्याच्या मार्गावर असून वन्यप्राण्यांनादेखील याचा फटका बसून त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाल्याने वनविभागाने तत्काळ यावर उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. 

मागील काही वर्षांपासून जंगलात आगी लावण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यातच ससे, रानडुक्कर, हरीण यांची शिकार करण्यासाठी शिकारी जंगलांना आगी लावतात. मोठ्या प्रमाणात गवत असल्याने आणि हे गवत उन्हात तापलेले असल्याने आग मोठ्या प्रमाणात पसरते आणि आटोक्यात आणणे कठीण बनते. यामुळे वणवा पसरून पूर्ण डोंगर जळून खाक होताे.     आठ ते दहा वर्षांपूर्वी गावांमध्ये मोठ्या प्रमाणात बैल, गायी, म्हशी, रेडे शेतकऱ्यांकडे असायचे. मात्र, आता हे प्रमाण खूपच कमी झाले आहे. गावाचा विचार केला तर २० ते २५ पाळीव जनावरे गावामध्ये आढळून येतात. पूर्वी ही सगळी जनावरे शेतकरी जंगलात चरायला नेत असत. त्यामुळे जंगलात गवताचे प्रमाण कमी राहत होते. तसेच उन्हाळ्यातदेखील गुरांना चारण्यासाठी गवत लागत असल्याने सहसा कोणी जंगलात आगी लावत नसे. मात्र, सध्या गुरेढोरे राहिली नसल्याने जंगलात मोठ्या प्रमाणात गवत वाढते. त्यातच, काही शिकार करणारी समाजकंटक मंडळी जंगलाला आगी लावतात. त्यामुळे पूर्ण जंगल जळून राख होते. त्यामुळे काही प्रमाणात राहिलेल्या मुक्या जनावरांनादेखील खाण्यासाठी गवत उरत नसल्याने चाऱ्याच्या शोधात त्यांना रानोमाळ भटकावे लागते.    या लावल्या जात असलेल्या वणव्यांमध्ये नवीन उगवलेली जंगली झाडांची रोपे जाळून खाक होतात. 

सध्या जंगलात मोठ्या प्रमाणात वणवे लागल्याचे दिसून येत आहे. खरेतर, वनविभागाने याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असून वृक्षारोपणावर करोडो रुपये खर्च करण्यापेक्षा जर या वणव्यांवर नियंत्रण आणणाऱ्या अत्याधुनिक सामग्री घेतल्यास जंगल मोठ्या प्रमाणात वाचेल. त्याचबरोबर आगी लावणाऱ्या समाजकंटकांवर वनविभागाने कडक कारवाई करण्याची गरज आहे.- स्वप्नील ठाकरे, निसर्गप्रेमी

टॅग्स :thaneठाणे