शहरं
Join us  
Trending Stories
1
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
2
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
3
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
4
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
5
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
6
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
7
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
8
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
9
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
10
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
11
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
12
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
13
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
14
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
15
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
16
बलूचिस्तानात सैन्याला मिळाले बेफाम अधिकार; सर्वसामान्यांविरोधात पाकिस्तानात बनला कठोर कायदा
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

वणव्यांमुळे वनसंपत्ती होतेय नष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2021 23:46 IST

वनविभागाने उपाययोजना करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कविक्रमगड : विक्रमगड तालुक्यासह  अनेक भागांत मार्च महिन्यात जंगलांना वणवे लागल्याचे चित्र दिसून येत आहे. या लावल्या जाणाऱ्या आगीमुळे मौल्यवान वनसंपत्ती नष्ट होण्याच्या मार्गावर असून वन्यप्राण्यांनादेखील याचा फटका बसून त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाल्याने वनविभागाने तत्काळ यावर उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. 

मागील काही वर्षांपासून जंगलात आगी लावण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यातच ससे, रानडुक्कर, हरीण यांची शिकार करण्यासाठी शिकारी जंगलांना आगी लावतात. मोठ्या प्रमाणात गवत असल्याने आणि हे गवत उन्हात तापलेले असल्याने आग मोठ्या प्रमाणात पसरते आणि आटोक्यात आणणे कठीण बनते. यामुळे वणवा पसरून पूर्ण डोंगर जळून खाक होताे.     आठ ते दहा वर्षांपूर्वी गावांमध्ये मोठ्या प्रमाणात बैल, गायी, म्हशी, रेडे शेतकऱ्यांकडे असायचे. मात्र, आता हे प्रमाण खूपच कमी झाले आहे. गावाचा विचार केला तर २० ते २५ पाळीव जनावरे गावामध्ये आढळून येतात. पूर्वी ही सगळी जनावरे शेतकरी जंगलात चरायला नेत असत. त्यामुळे जंगलात गवताचे प्रमाण कमी राहत होते. तसेच उन्हाळ्यातदेखील गुरांना चारण्यासाठी गवत लागत असल्याने सहसा कोणी जंगलात आगी लावत नसे. मात्र, सध्या गुरेढोरे राहिली नसल्याने जंगलात मोठ्या प्रमाणात गवत वाढते. त्यातच, काही शिकार करणारी समाजकंटक मंडळी जंगलाला आगी लावतात. त्यामुळे पूर्ण जंगल जळून राख होते. त्यामुळे काही प्रमाणात राहिलेल्या मुक्या जनावरांनादेखील खाण्यासाठी गवत उरत नसल्याने चाऱ्याच्या शोधात त्यांना रानोमाळ भटकावे लागते.    या लावल्या जात असलेल्या वणव्यांमध्ये नवीन उगवलेली जंगली झाडांची रोपे जाळून खाक होतात. 

सध्या जंगलात मोठ्या प्रमाणात वणवे लागल्याचे दिसून येत आहे. खरेतर, वनविभागाने याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असून वृक्षारोपणावर करोडो रुपये खर्च करण्यापेक्षा जर या वणव्यांवर नियंत्रण आणणाऱ्या अत्याधुनिक सामग्री घेतल्यास जंगल मोठ्या प्रमाणात वाचेल. त्याचबरोबर आगी लावणाऱ्या समाजकंटकांवर वनविभागाने कडक कारवाई करण्याची गरज आहे.- स्वप्नील ठाकरे, निसर्गप्रेमी

टॅग्स :thaneठाणे