शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
2
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
3
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
4
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
5
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
6
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
7
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 
8
५०० रुपये उधार घेतले, ११ कोटी जिंकले... भाजीवाल्याला आल्या धमक्या, बंद करावा लागला फोन
9
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
10
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम
11
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
12
Sex Education: १० वर्षांखालील मुलांना लैंगिक शिक्षणाची माहिती किती आणि कशी द्यावी? 
13
"माझी पत्नी सापडली का?" पोलिसांना रोज विचारायचा; स्वत:च रचलेला हत्येचा भयंकर कट अन्...
14
"पार्थ पवारांचा राष्ट्रवादीच्या नेत्यांनीच घात केला, काही नवीन नाही"; शिंदे गटाच्या आमदाराचा मोठा गौप्यस्फोट
15
मुंबईच्या नालासोपारा स्टेशनवर लोकलची वाट पाहत उभे होते 'हे' सेलिब्रिटी, ओळखलंत का?
16
काय सांगता! ट्रम्प आता प्रत्येक अमेरिकन नागरिकाला २ हजार डॉलर्स देणार; नेमका प्लान काय?
17
डोक्यात क्रिकेटची बॅट हाणली, 'ती' ओरडत राहिली पण तो थांबला नाही; व्यावसायिकाने पत्नीला संपवले
18
महिलांमध्ये झपाट्याने वाढतेय फुप्फुसाच्या कर्करोगाचे प्रमाण, प्रदूषण हेच मोठे कारण
19
पीपीएफमधून दरमहा कमवा १ लाखाहून अधिक करमुक्त उत्पन्न! किती करावी लागेल गुंतवणूक?
20
"चांगलं बोलता येत नसेल तर तोंड बंद ठेवा", ऐश्वर्याच्या ट्रोलिंगवरुन भडकली रेणुका शहाणे

तीव्र उतारावरील तब्बल १२०० घरांवर वनविभाग फिरवणार बुलडोजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:39 IST

ठाणे : घोलाईनगर भागात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाल्यानंतर आता घोलाईनगरसह पारसिक, इंदिरानगर, आतकोनेश्वरनगर, ...

ठाणे : घोलाईनगर भागात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाल्यानंतर आता घोलाईनगरसह पारसिक, इंदिरानगर, आतकोनेश्वरनगर, भास्करनगर, पौंडपाडा, कारगिल खोंडा आदींसह इतर भागातील डोंगराच्या अतितीव्र उतारावर असलेल्या तब्बल १२०० अतिक्रमणांवर आता वनविभाग बुलडोजर फिरविणार आहे. वनविभागाने केलेल्या सर्व्हेत अतिक्रमणांची यादी पुढे आली आहे. त्यानुसार कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन ही कारवाई केली जाणार असल्याचे वनविभागाने स्पष्ट केले.

कळव्यातील घोलाईनगर भागात १९ जुलै रोजी झालेल्या पावसात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील पाच जणांचा बळी गेला होता. त्यानंतर डोंगरावरील बांधकामांची समस्या पुढे आली. या घटनेनंतर वनविभागावर टीका झाल्यानंतर त्यांनी मागील काही दिवसांपासून डोगंरावरील तीव्र उतारांवरील अतिक्रमणांचा सर्व्हे सुरू केला होता. आता त्याचा अहवाल समोर आला आहे. या अहवालानुसार डोंगराच्या तीव्र उतारावर तब्बल १२०० अतिक्रमण असल्याची माहिती समोर आली आहे. आतकोनेश्वरनगर, भास्करनगर, इंदिरानगर, घोलाईनगर, पौंडपाडा, वाघोबानगर आणि कारगिल खोंड या भागात हा सर्व्हे करण्यात आला होता. या अहवालानुसार या ठिकाणच्या अतिक्रमणांना घरपट्टी केव्हा लावली गेली, पाणी केव्हा दिले गेले, वीज केव्हा दिली गेली याची माहिती वनविभागाकडून गोळा केली जात आहे. त्यातील किती अतिक्रमणे जुनी आणि नवीन आहेत, याचाही अभ्यास केला जाणार आहे. त्याअनुषंगाने महापालिका आणि महावितरणला पत्रव्यवहार करण्यात आला असल्याचेही वनविभागाने स्पष्ट केले आहे.

वनविभागाच्या माध्यमातून आता या डोंगरावरील तीव्र उतारावरील अतिक्रमणांवर कारवाई करताना कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. त्यानुसार येथील बांधकामधारकांकडून सोमवारपासून माहिती मागविली जाणार असल्याचे वनविभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

अतिक्रमण हटवून संरक्षक भिंत बांधणार

वनविभाग तीव्र उतारावरील १२०० बांधकामे ऑगस्ट महिन्यात हटविणार आहे. यासाठी पोलीस बंदोबस्त घेऊन कारवाई केली जाणार आहे. त्यानंतर अशा घटना टाळण्यासाठी किंबहुना अतिक्रमणांना आळा घालण्यासाठी या भागात ८ कोटींचा निधी खर्च करून संरक्षक भिंत बांधली जाणार असल्याचे वनविभागाने स्पष्ट केले आहे.

............

मागील काही दिवसापासून वनविभागाकडून डोंगराच्या तीव्र उतारावरील अतिक्रमणांचा सर्व्हे सुरू होता. त्याचा अहवाल तयार झाला असून याठिकाणची १२०० अतिक्रमणे आता हटविली जाणार आहे. त्यानंतर येथे संरक्षक भिंत उभारली जाणार आहे.

(नरेंद्र मुठे - वनक्षेत्र अधिकारी, ठाणे)