शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

वृक्षांच्या जाळपोळीची वनाधिकारी करणार चौकशी; वनमंत्र्यांकडून घटनेची गंभीर दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 00:14 IST

अंबरनाथ तालुक्यातील मांगरूळ गावाच्या परिसरात लावलेल्या वृक्षांच्या जाळपोळीचा मुद्दा चांगलाच पेटत असतानाच, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.

अंबरनाथ : अंबरनाथ तालुक्यातील मांगरूळ गावाच्या परिसरात लावलेल्या वृक्षांच्या जाळपोळीचा मुद्दा चांगलाच पेटत असतानाच, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश मुनगंटीवारांनी दिले असून, ही चौकशी कोणत्या मुद्यांच्या आधारे करावी, याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.मांगरूळ येथील वनक्षेत्रात लोकसहभागातून लावण्यात आलेल्या वृक्षांना सलग दोन वर्षे वणव्याची झळ बसली आहे. या वणव्यात असंख्य वृक्षांचे नुकसान झाले आहे. या वणव्याला वनविभाग जबाबदार असल्याचे कारण पुढे करून पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकारकडे तक्रारही केली होती. यासंदर्भात तक्रार आल्यावर वनमंत्री मुनगंटीवार यांनी सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.या आदेशानुसार आगीची चौकशी करण्यासाठी अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (संरक्षण) यांची नियुक्त केली आहे. या चौकशीत अनेक मुद्यांचा समावेश करण्यात आला आहे.आगीचे मुख्य कारण काय, ही आग कोणी लावली आणि आग हेतुपुरस्सर लावण्यात आली किंवा कसे, रोपवनाचे एकूण क्षेत्र किती होते, लागवड केलेल्या रोपांची एकूण संख्या, जिवंत रोपांची संख्या, आगीमुळे किती रोपांचे नुकसान झाले, झळ बसलेल्या रोपांपैकी किती रोपे जगतील, किती रोपांचे नव्याने रोपण करावे लागणार, वृक्षारोपणामध्ये त्रुटी होत्या का, या क्षेत्रात कितीवेळा आग लागली, त्यासंदर्भात दाखल झालेले गुन्हे, अटक आरोपींची संख्या आणि त्यांची नावे, आगीपासून संरक्षण होण्यासाठी केलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा तपशील आणि भविष्यात अशा घटना घडणार नाही, त्यासाठी करावे लागणारे उपाय, या मुद्यांवर सखोल चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.खा. श्रीकांत शिंदे यांनी वृक्षांच्या जाळपोळीच्या मुद्यावर आक्रमक पवित्रा घेतला होता. त्यांच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनादरम्यान शिवसैनिकांनी मुख्य वनसंरक्षकांवर राख आणि शाई फेकली होती.अहवाल ५ डिसेंबरपर्यंतमांगरूळ येथील वनक्षेत्राच्या जाळपोळ प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांंमार्फत ही चौकशी होत असून त्या चौकशीचा अहवाल ५ डिसेंबरपर्यंत सरकारला सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे या चौकशी अहवालातच नेमके किती वृक्षारोपण करण्यात आले, हे समोर येणार आहे.

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार