शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
7
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
8
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
9
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
10
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
11
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
12
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
13
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
14
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
15
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
16
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
17
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
18
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
19
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
20
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार

कल्याण ग्रामीण भागास पुराचा जोरदार तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क म्हारळ : कल्याण ग्रामीण परिसराला गुरुवारी पुराचा जोरदार तडाखा बसला आहे. वरप-कांबा गावांमध्ये पुराचे पाणी शिरले ...

लोकमत न्यूज नेटवर्क

म्हारळ : कल्याण ग्रामीण परिसराला गुरुवारी पुराचा जोरदार तडाखा बसला आहे. वरप-कांबा गावांमध्ये पुराचे पाणी शिरले असून, त्यात अनेक कुटुंबे अडकून पडली. स्थानिक रहिवासी, एनडीआरएफ व प्रशासनाने या गावांमधून जवळपास १०० जणांना सुरक्षित बाहेर काढले, तर दुसरीकडे रायता पुलावरून उल्हास नदीचे पाणी गेल्याने कल्याण-मुरबाड महामार्ग पूर्ण बंद झाला आहे. परिणामी या महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. तसेच आणे-भिसोल गावांचाही संपर्क तुटला आहे.

पहाटे ३ वाजल्यापासून पुराचे पाणी कल्याण ग्रामीण भागात शिरल्याने ग्रामस्थांचे हाल झाले. अनेक ठिकाणी आदिवासी कुटुंबांना गावातील तरुणांनी सुरक्षितस्थळी हलवले. त्याचबरोबर मोर्यानगर, शर्मा चाळ आदी ठिकाणी अडकलेल्या नागरिकांना पंचायत समिती सदस्य भाऊ गोंधळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सुरक्षितपणे सेक्रेड हार्ट शाळेत स्थलांतरित केले. तेथेच त्यांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था केली आहे. तसेच विवेक गंभीरराव, महेश देशमुख यांच्या टीमने कल्याण-मुरबाड महामार्गावर दोरखंडाची साखळी बनवून अनेकांना सुरक्षित बाहेर काढले. एनडीआरएफची टीम दुपारी १२ नंतर ग्रामीण परिसरात दाखल झाली. या टीमने रेस्क्यू ऑपरेशन राबवून अनेकांना सुरक्षित बाहेर काढले.

शहाड- मोहने वाहतूक बंद

- शहाड येथे मोहने रोड पूर्णतः पाण्याखाली गेल्याने शहाड-मोहने रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली. पुराचे पाणी रस्त्यावर आल्याने गाड्या पाण्याखाली गेल्या. तसेच वखारीमध्ये पाणी शिरले.

- अंबिकानगर येथे अडकलेल्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले. शंभरहून अधिक नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविल्याचे कल्याणचे तहसीलदार दीपक आकडे यांनी सांगितले.

------------------