शहरं
Join us  
Trending Stories
1
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
2
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
3
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
4
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
5
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
6
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
7
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन
8
धक्कादायक! विद्यापीठात महिलेवर लैंगित अत्याचार; बंगळुरू विद्यापीठाच्या प्राध्यापकाला अटक
9
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
10
मेट्रो ठेकेदार जे. कुमार इन्फ्राला ५ लाखाचा दंड; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एमएमआरडीएचा दणका
11
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
12
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
13
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
14
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
15
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
16
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...
17
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
18
राजस्थानात आजपासून धर्मांतरविरोधी कायदा लागू; बुलडोझर कारवाईसह अनेक कठोर तरतुदी
19
८९ वर्षीय अभिनेते धर्मेंद्र मुंबईतील रुग्णालयात दाखल, चाहते चिंतेत; हेल्थ अपडेट आली समोर
20
Yavatmal Accident: गाडी शिकताना नियंत्रण सुटलं अन्...; एकाच कुटुंबातील ४ जण ठार

भिवंडीत पूर ओसरला, मात्र भातशेती पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 22:59 IST

पावसाने सोमवारपासून उसंत घेतल्याने शहर व ग्रामीण भागातील पूर ओसरला

भिवंडी : शुक्रवारपासून कोसळणाऱ्या पावसाने सोमवारपासून उसंत घेतल्याने शहर व ग्रामीण भागातील पूर ओसरला आहे. मात्र खाडीकिनारी असलेल्या अनेक गावांमधील भातशेती पाचव्या दिवशीही पाण्याखाली असल्याने भात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसाने हजेरी लावल्याने शेतीच्या कामांना वेग आला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी भातलावणीच्या कामाला सुरूवात केली होती.शुक्र वारपासून पावसाने जोरदार सुरु वात केल्याने मागील तीन दिवसांपासून सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाल्याने तालुक्यातील खाडीकिनारी असलेल्या डुंगे, वडघर, वडूनवघर, खारबाव, टेंभीवली, कोनगाव, पिंपळास, मालोडी, पाये, पायगाव ,केवणी दिवे, अंजूर , अलीमघर , वेहळे , भरोडी आदी गावातील भातशेती पाण्याखाली गेली असल्याने पिके कुजून गेली. शेतकºयांचे प्रचंड नुकसान झाले आहे.चार दिवसांपासून मुसळधार पाऊस झाल्यामुळे सर्वत्र पूरिस्थती निर्माण झाली होती. या पुराचा फटका ज्या शेतकरी व ग्रामस्थांना बसला त्या बाधित शेतकºयांच्या मालमत्तेच्या नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. पंचनामे प्राप्त होताच सरकारी निर्देशानुसार बाधित शेतकरी व नागरिकांना भरपाई देण्यात येईल, अशी प्रतिक्रि या भिवंडीचे तहसीलदार शशिकांत गायकवाड यांनी दिली आहे. हातातोंडाशी आलेली पिके वाया गेल्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे. सरकारने आम्हाला मदत करावी अशी मागणी या शेतकºयांनी केली आहे.