शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
4
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
6
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
7
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
8
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
9
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
10
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
11
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
12
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
13
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
15
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
16
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
17
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
18
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
19
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
20
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत पूर ओसरला, मात्र भातशेती पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 22:59 IST

पावसाने सोमवारपासून उसंत घेतल्याने शहर व ग्रामीण भागातील पूर ओसरला

भिवंडी : शुक्रवारपासून कोसळणाऱ्या पावसाने सोमवारपासून उसंत घेतल्याने शहर व ग्रामीण भागातील पूर ओसरला आहे. मात्र खाडीकिनारी असलेल्या अनेक गावांमधील भातशेती पाचव्या दिवशीही पाण्याखाली असल्याने भात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसाने हजेरी लावल्याने शेतीच्या कामांना वेग आला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी भातलावणीच्या कामाला सुरूवात केली होती.शुक्र वारपासून पावसाने जोरदार सुरु वात केल्याने मागील तीन दिवसांपासून सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाल्याने तालुक्यातील खाडीकिनारी असलेल्या डुंगे, वडघर, वडूनवघर, खारबाव, टेंभीवली, कोनगाव, पिंपळास, मालोडी, पाये, पायगाव ,केवणी दिवे, अंजूर , अलीमघर , वेहळे , भरोडी आदी गावातील भातशेती पाण्याखाली गेली असल्याने पिके कुजून गेली. शेतकºयांचे प्रचंड नुकसान झाले आहे.चार दिवसांपासून मुसळधार पाऊस झाल्यामुळे सर्वत्र पूरिस्थती निर्माण झाली होती. या पुराचा फटका ज्या शेतकरी व ग्रामस्थांना बसला त्या बाधित शेतकºयांच्या मालमत्तेच्या नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. पंचनामे प्राप्त होताच सरकारी निर्देशानुसार बाधित शेतकरी व नागरिकांना भरपाई देण्यात येईल, अशी प्रतिक्रि या भिवंडीचे तहसीलदार शशिकांत गायकवाड यांनी दिली आहे. हातातोंडाशी आलेली पिके वाया गेल्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे. सरकारने आम्हाला मदत करावी अशी मागणी या शेतकºयांनी केली आहे.