शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
4
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
5
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीचं धक्कादायक कृत्य
6
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
7
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
8
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
9
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
10
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
11
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
12
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
13
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
14
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
15
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
16
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
17
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
18
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम क्षेत्राला महापुराचे ग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2019 23:45 IST

बदलापुरात रिकाम्या फ्लॅटची संख्या वाढली : ग्राहक वळताहेत अंबरनाथ, कल्याणकडे

पंकज पाटील।लोकमत न्यूज नेटवर्कबदलापूर : गेल्या चार वर्षांमध्ये बदलापुरातील बांधकाम क्षेत्राला मंदीचा फटका अनेकदा सहन करावा लागला. या मंदीतून सावरण्याचा प्रयत्न बांधकाम व्यावसायिक करत असतानाच २७ जुलैच्या महापुराचा जोरदार फटका बसला. पुरामुळे बदलापुरात घर घेणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. मंदी आणि पूर असा दुहेरी फटका बदलापूरच्या बांधकाम क्षेत्राला बसला आहे.

सर्वाधिक वेगाने वाढणाºया लहान शहरांपैकी एक शहर म्हणजे बदलापूर. गेल्या १० वर्षांमध्ये बदलापूरचा विकास झपाट्याने झाला आहे. विकासकांना आता जागादेखील शिल्लक राहिलेली नाही. शहरात १५० हून अधिक नव्या इमारतींची बांधकामे सुरू आहे. गेल्या तीन वर्षांपासून काम सुरू असलेल्या प्रकल्पांची संख्या ३५० पेक्षा जास्त आहे. शहरात ५०० पेक्षा जास्त फ्लॅटची संख्या असलेल्या प्रकल्पांची संख्या १२ च्या वर आहे. काही प्रकल्पांमध्ये हजारपेक्षा जास्त फ्लॅटचे बांधकाम करण्यात आले आहे. बदलापुरात घरखरेदीसाठी येणाऱ्यांची संख्या जास्त असली, तरी ज्या प्रमाणात घरांची निर्मिती होत आहे, त्या तुलनेत विक्री घटलेली आहे. सध्या २० हजारांहून अधिक फ्लॅट ग्राहकांच्या प्रतीक्षेत आहेत. प्रत्येक प्रकल्पात केवळ १० ते २० टक्के फ्लॅटची विक्री झालेली आहे. नव्याने तयार होणाºया इमारतींची ही अवस्था असल्याने, येऊ घातलेल्या प्रकल्पांबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. अगदी मोजक्याच प्रकल्पांमध्ये ५० टक्क्यांपर्यंत घरांची विक्री झाली आहे. उर्वरित घरांची विक्री करण्यासाठी बांधकाम व्यावसायिक ग्राहकांच्या शोधात आहे.

२०१४-१५ मध्ये बदलापुरात २९० प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली होती. २०१५-१६ मध्ये २०८ प्रकल्पांना, २०१६-१७ मध्ये २०२ प्रकल्पांना, २०१७-१८ मध्ये २२६ प्रकल्पांना आणि २०१८-१९ मध्ये १८० प्रकल्पांनाच मंजुरी मिळाली आहे. प्रकल्पांच्या बांधकाम मंजुरीचा घसरता क्रम पाहता, गेल्या काही वर्षांत प्रकल्पांची संख्या घटलेली दिसत आहे. सर्वसामान्य ग्राहकांची कमतरता भासत असताना काही बांधकाम व्यावसायिकांनी उच्चभ्रू ग्राहकांकडे लक्ष केंद्रित करून महागड्या फ्लॅटची निर्मिती केली आहे. मात्र, ते प्रकल्पही पुढे सरकताना दिसत नाहीत. ग्राहकांचा बदलापूरकडे असलेला ओढा, आता काही प्रमाणात कमी झाला आहे.

आधीच बांधकाम क्षेत्रात मंदी असताना, २६ जुलैच्या महापुराने बांधकाम व्यावसायिकांच्या संकटात भर घातली आहे. उल्हास नदीकिनाºयावरील भागातील इमारतींमध्ये पुराचे पाणी गेल्याने आणि त्यातच महालक्ष्मी एक्स्प्रेस अडकल्याचे वृत्त राष्ट्रीय स्तरावर गेल्याने बदलापूर हा पूरग्रस्त परिसर असल्याची भावना ग्राहकांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे बदलापूरकडे येणारा ग्राहक हा आता अंबरनाथ आणि कल्याण भागाकडे वळला आहे. महापुराचा फटका बांधकाम क्षेत्राला बसला आहे. बदलापूरमधील काही भाग पुरात बुडाला होता. आता त्याचा फटका संपूर्ण शहरास बसत आहे. ज्या भागात पाणी आले नाही आणि येणारही नाही, त्या भागातील घरांच्या विक्रीवरही परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.पूरग्रस्त भागातील निर्माणाधीन गृहप्रकल्प संकटात : ग्राहकांनी फिरवली पाठबदलापुरातील पूरग्रस्त भागांमध्ये ४० ते ४५ निर्माणाधीन गृहप्रकल्प आहेत. या इमारतींमध्येही पुराचे पाणी शिरले होते. त्यामुळे या इमारतींकडे घरखरेदी करणारे ग्राहक ढुंकूनही बघण्यास तयार नाहीत. अशा स्थितीतही बांधकाम व्यावसायिकांनी अद्याप घरांच्या किमती कमी केलेल्या नाहीत. दुसरीकडे, बदलापुरातील पूरग्रस्त भागातील रहिवाशांनी त्यांची राहती घरे विक्रीस काढली आहेत. या घरांची संख्याही मोठी आहे. महापुराचे संकट पुन्हा ओढवू नये, यासाठी या भागातील घरे विकून स्थलांतर करण्याची मानसिकता अनेकांनी केली आहे.