शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

उल्हासनगरला पुराचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:24 IST

उल्हासनगर : शहरातील वालधुनी नदीकिनाऱ्यावरील मीनाताई ठाकरेनगर, प्रबुद्धनगर, करोतियानगर आदी परिसरातील शेकडो जणांना उल्हास नदीच्या पुराचा फटका बसला. शेकडो ...

उल्हासनगर : शहरातील वालधुनी नदीकिनाऱ्यावरील मीनाताई ठाकरेनगर, प्रबुद्धनगर, करोतियानगर आदी परिसरातील शेकडो जणांना उल्हास नदीच्या पुराचा फटका बसला. शेकडो जणांच्या घरात पाणी घुसल्याने एकच धावपळ उडाली. लहान मुले, वृद्ध, महिला आदींना आपत्कालीन पथकांच्या जवानांनी रबरी बोटने बाहेर काढले.

उल्हासनगरच्या मधोमध वाहणाऱ्या वालधुनी नदीच्या पुराचा सर्वाधिक धोका किनाऱ्यावरील झोपडपट्टीला असतो. मात्र बुधवारी रात्री २ वाजण्याच्या दरम्यान नदीचे पाणी भारतनगर, सम्राट अशोकनगर, रेणुका सोसायटी, दुर्गानगर आदी परिसरात पाणी घुसल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, उल्हास नदीचे पाणी वालधुनी नदीत आल्याने करोतियानगर, प्रबुद्धनगर, सी ब्लॉक, मीनाताई ठाकरे नगरात घुसल्याने नागरिकांची धावपळ झाली. महापालिकेच्या आपत्कालीन विभागाला पुराचे पाणी झोपडपट्टी परिसरात घुसल्याची माहिती मिळताच, पथकाने पुरात अडकलेल्या वृद्ध, महिला, लहान मुलासह नागरिकांना बाहेर काले. महापालिका शाळेमध्ये बेघर झालेल्या नागरिकांना ठेवण्यात आले.

महापालिका आयुक्त डॉ. राजा दयानिधी, उपायुक्त अशोक नाईकवाडे, आपत्कालीन विभागाचे प्रमुख बाळू नेटके आदींनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली. बेघर झालेल्या नागरिकांसाठी राहण्याची व जेवणाची व्यवस्था महापालिकेने केली असून अनेक सामाजिक संस्था मदतीसाठी पुढे आल्या. घरातील सर्व साहित्य, अन्नधान्य, टीव्ही व इतर इलेक्ट्रिक साहित्य खराब झाले. आता जगायचे कसे, असा प्रश्न शेकडो नागरिकांसमोर उभा ठाकला असून शासनाने त्वरित मदत करण्याची मागणी होत आहे. बेघर झालेल्या नागरिकांत वृद्ध, लहान मुले, आजारी नागरिकांची गैरसोय होत असून महापालिकेनेही मदतीसाठी पुढे येण्याची मागणी होत आहे. बेघर झालेल्या नागरिकांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन महापालिका उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी दिले.

.....

सामाजिक संस्था व दानशूरांनी पुढे यावे.....उपमहापौर

शहरातील शेकडो रहिवाशांना पुराचा फटका बसला असून शासनासह सामाजिक संस्था, दानशूर व्यक्ती यांनी पुढे येण्याचे आवाहन उपमहापौर भगवान भालेराव यांनी केले. महापालिका पुराचा फटका बसलेल्या नागरिकांसोबत असून जास्तीत जास्त मदत देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे भालेराव म्हणाले.