शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

भातसा, काळू, उल्हास नद्यांना पूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क टिटवाळा : कल्याण तालुक्यातील भातसा, काळू व उल्हास नद्यांना गुरुवारी पूर आल्याने नदीकाठच्या गावांत पाणी शिरले ...

लोकमत न्यूज नेटवर्क

टिटवाळा : कल्याण तालुक्यातील भातसा, काळू व उल्हास नद्यांना गुरुवारी पूर आल्याने नदीकाठच्या गावांत पाणी शिरले असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्याने त्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्याचबरोबर टिटवाळा शहरातील काही गृहसंकुलांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

खडवली येथील भातसा नदीला पूर आल्याने नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने खडवली-पडघा वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. तसेच या पुरामुळे खडवली नदीकाठच्या इंदिरानगर, ज्यू, आदिवासी आश्रम शाळा परिसर, स्वामी समर्थ मठ परिसर येथील घरांत पाणी शिरले आहे. रात्री २ वाजता झोपेत असताना पाणी शिरल्याने त्यामुळे लोकांना घरातून बाहेर काढता आले नाही. मात्र, त्यांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे.

रुंदे गावाजवळील काळू नदीवरील पूलही बुधवारी रात्रीपासूनच पाण्याखाली आहे. यामुळे लगतच्या १० ते १२ गावांचा संपर्क तुटला आहे. तसेच काळू नदीवरील गुरवली व वासुंद्री येथील पूलही पाण्याखाली गेल्याने येथील लगतच्या ९ ते १९ गावांचा संपर्क तुटलेला आहे. त्यामुळे या परिसरातील जनजीवन अक्षरशः विस्कळीत झाले आहे.

दुसरीकडे टिटवाळा रेल्वस्थानक ते गणपती मंदिर या मुख्य रस्त्यावर शिव मंदिरालगत असणाऱ्या पुलावरून काळू नदीचे पाणी गेल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. डीजी-वन शोरूमपर्यंत पुराचे पाणी शिरले आहे. टिटवाळा मंदिर परिसरातील लोक पलीकडे, तर स्थानिक परिसरातील लोक अलीकडे अडकून पडले होते. अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचल्याने येथील नारायणनगर रोडवर असणाऱ्या गणेश कृपा चाळीतील २५ घरे पाण्याखाली आहेत; तर सांगोडा रोड येथील २०० खोल्या पाण्याखाली गेल्या. तसेच येथील एका मोठ्या गृहसंकुलातील काही इमारतींच्या पार्किंग परिसरात व क्लब हाऊसमध्येही पाणी शिरले. तसेच गायत्री धाम सोसायटीच्या तीनही फेजमधील तळमजल्यावरील घरांत छतापर्यंत पाणी शिरले होते. लगतच असणाऱ्या म्हाडाच्या १२ घरातदेखील छतापर्यंत पुराचे पाणी शिरले होते. टिटवाळा स्थानकातील रेल्वे रूळांमध्ये पाणी असल्याने रेल्वे वाहतूकही ठप्प झाली होती. या ठिकाणी पोलीस, नागरिक व सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते लोकांना मदतीचा हात देताना दिसत आहेत.

--------------