शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही गरिबीत, तुमची मौज का? आणखी एका देशात लोक रस्त्यावर; जनतेच्या पैशाची लूट, पसरला असंतोष
2
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
3
युक्रेनचा रशियावर ड्रोन हल्ला! क्रिमिया रिसॉर्टवरील हल्ल्यात २ जणांचा मृत्यू, १५ जण गंभीर जखमी
4
Eknath Shinde: जीएसटी सुधारणांमुळे उत्पादन आणि रोजगार वाढेल- एकनाथ शिंदे
5
H-1B व्हिसाने हैराण झालेल्यांना चीनची ऑफर; भारतीयांसाठीही मोठी संधी! काय आहे नवा ‘के- व्हिसा’?
6
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले; ४० पेक्षा अधिक वेळा ट्रम्प यांचा दावा, आता तरी नोबेल द्या
7
France Gen-Z Protest: फ्रान्समध्ये Gen- Z चा संताप! लिमामध्ये DINA विरोधात बंड, दगडफेक आणि पोलिसांशी झटापट
8
...तर पतीच्या प्रेयसीकडून पत्नीला मिळेल भरपाई; हायकोर्टानं नोंदवली निरीक्षणे
9
आजचे राशीभविष्य- २२ सप्टेंबर २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास! आर्थिक लाभ होणार
10
ट्रम्प हे मित्र की शत्रू..अमेरिकेच्या २ निर्णयांनी भारताला बसला मोठा फटका; पुढे काय करायला हवं?
11
घोडबंदर भागातील धुमसता असंतोष राजकीय? शिंदेसेनेची कोंडी करण्यासाठी भाजपा घालतंय खतपाणी
12
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
13
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
14
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
15
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
16
पाकिस्तानी ‘खेळाडूंना’ जपानमध्ये अटक; परदेशात जाण्यासाठी वापरला वेगळाच अन् अफलातून फंडा
17
राज्य सहकारी बँकेत पती-पत्नीला एकत्र नोकरीला असेल बंदी; विवाहानंतर ६० दिवसांत राजीनामा बंधनकारक
18
जनाब, आपल्या पायाखाली काय जळते ते पाहा...अमेरिकेची चाल, भारताभोवती तयार होतोय धोकादायक त्रिकोण
19
विशिष्ट समुदायासाठी उभारली जाते इमारत; गृहनिर्माण संस्थांना सदस्य निवडीचा अधिकार आहे का?
20
धगधगत्या ज्वालेतून आली जगन्माता, भक्ती दाटते नाव घेता...; कुलस्वामिनीच्या उत्सवाचे विविध रंग

नालेसफाईचा पुरता फज्जा

By admin | Updated: June 26, 2017 01:34 IST

दोन आठवड्यांहून विलंबाने दाखल झालेल्या पावसाने विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे/कल्याण/भिवंडी : दोन आठवड्यांहून विलंबाने दाखल झालेल्या पावसाने विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह शनिवारी रात्रीपासून तडाखेबंद हजेरी लावली. त्यामुळे रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. रस्ते पाण्याखाली गेले आणि सखल भागही जलमय झाले. सर्व महापालिका, नगरपालिकांनी नालेसफाईबाबत केलेल्या दाव्यांचा या पावसाने फज्जा उडवला. भिवंडी तालुक्यातील तीन पूल पाण्याखाली गेल्याने २० गावांचा संपर्क तुटला.पावसामुळे नाल्यांना नद्यांचे स्वरूप आले, तर नद्या काही काळातच सांडपाण्यासह दुथडी भरून वाहू लागल्या. डोंबिवली परिसरात सकाळी पावणेदहाच्या सुमारास वीज कडाडल्याच्या प्रचंड आवाजाने शहरवासीयांची दाणादाण उडवली. ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा, डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ-बदलापूर स्थानकांत रेल्वेरूळांत पाणी साचल्याने वाहतूक मंदावली होती. कळव्यात तर रूळ पाण्याखाली गेल्याने काही काळ वाहतूक वळवावी लागली. हे पाणी साचण्यास पालिकांची अपुरी नालेसफाई कारणीभूत असल्याचा आरोप रेल्वे अधिकाऱ्यांनी केला. नालेसफाई अपुरी झाल्याने, त्यातील गाळामुळे ठिकठिकाणी पावसाचे पाणी रस्त्यावर पसरले. सखल भागातील घराघरांत शिरले. प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घातल्याची घोषणा महापालिकांनी केल्यानंतरही त्याची अंमलबजावणी न झाल्याने नाल्यांत अडकलेला जास्तीत जास्त कचरा प्लास्टिकचा असल्याचे दिसून आले. तसेच या सर्व शहरांच्या वेगवेगळ््या भागात साठलेला कचरा वेळेत उचलला न गेल्याने तोही नाल्यांत वाहून गेला. त्यामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा झाला नाही. डोंबिवलीच्या नांदिवली परिसरात फेरीवाले, भाजीविक्रेत्यांनी नाले बुजवून आपली दुकाने थाटल्याने पावसाच्या पाण्याचा निचरा होऊ शकला नाही. त्यामुळे स्वामी समर्थ मठाचा परिसर गुडघाभर पाण्याखाली गेला होता. भिवंडी तालुक्यातील तीन पूल पाण्याखाली गेले असून वीस गावांचा संपर्क तुटला आहे. गेल्या चोवीस तासांत भिवंडीत सर्वाधिक २०५ मिमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे वाडा तसेच वसई परिसराला जोडणारे तीन पूल पाण्याखाली गेले आणि अवचीतपाडा, निंबवली, गोराड, कलभोण व गणेशपुरीसह छोट्या-मोठ्या वीस गावांचा संपर्क तुटला. या पावसाने शेतकरी सुखावले तरी वाडा व वसईच्या बाजारात नियमीत जाऊन दुध,भाजीपाला विक्री करणारा शेतकरी गावातच अडकून पडल्याने तो शहरापर्यंत पोचू शकला नाही. या गावांपर्यंत महसूल विभागाचे अधिकारीदेखील संध्याकाळपर्यंत पोचू शकले नाहीत. ग्रामस्थ हा दावा करीत असताना जिल्हाधिकारी कार्यालयाने मात्र रात्री उशिरा गावांशी संपर्क तुटला नसल्याचे जाहीर केले. संबंधित बातम्या आतील पानांत