शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
3
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
4
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
5
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
6
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
7
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
8
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
10
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
11
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
12
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
13
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
14
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
15
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
16
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
17
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
18
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण
19
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
20
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)

नालेसफाईचा पुरता फज्जा

By admin | Updated: June 26, 2017 01:34 IST

दोन आठवड्यांहून विलंबाने दाखल झालेल्या पावसाने विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे/कल्याण/भिवंडी : दोन आठवड्यांहून विलंबाने दाखल झालेल्या पावसाने विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह शनिवारी रात्रीपासून तडाखेबंद हजेरी लावली. त्यामुळे रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. रस्ते पाण्याखाली गेले आणि सखल भागही जलमय झाले. सर्व महापालिका, नगरपालिकांनी नालेसफाईबाबत केलेल्या दाव्यांचा या पावसाने फज्जा उडवला. भिवंडी तालुक्यातील तीन पूल पाण्याखाली गेल्याने २० गावांचा संपर्क तुटला.पावसामुळे नाल्यांना नद्यांचे स्वरूप आले, तर नद्या काही काळातच सांडपाण्यासह दुथडी भरून वाहू लागल्या. डोंबिवली परिसरात सकाळी पावणेदहाच्या सुमारास वीज कडाडल्याच्या प्रचंड आवाजाने शहरवासीयांची दाणादाण उडवली. ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा, डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ-बदलापूर स्थानकांत रेल्वेरूळांत पाणी साचल्याने वाहतूक मंदावली होती. कळव्यात तर रूळ पाण्याखाली गेल्याने काही काळ वाहतूक वळवावी लागली. हे पाणी साचण्यास पालिकांची अपुरी नालेसफाई कारणीभूत असल्याचा आरोप रेल्वे अधिकाऱ्यांनी केला. नालेसफाई अपुरी झाल्याने, त्यातील गाळामुळे ठिकठिकाणी पावसाचे पाणी रस्त्यावर पसरले. सखल भागातील घराघरांत शिरले. प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घातल्याची घोषणा महापालिकांनी केल्यानंतरही त्याची अंमलबजावणी न झाल्याने नाल्यांत अडकलेला जास्तीत जास्त कचरा प्लास्टिकचा असल्याचे दिसून आले. तसेच या सर्व शहरांच्या वेगवेगळ््या भागात साठलेला कचरा वेळेत उचलला न गेल्याने तोही नाल्यांत वाहून गेला. त्यामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा झाला नाही. डोंबिवलीच्या नांदिवली परिसरात फेरीवाले, भाजीविक्रेत्यांनी नाले बुजवून आपली दुकाने थाटल्याने पावसाच्या पाण्याचा निचरा होऊ शकला नाही. त्यामुळे स्वामी समर्थ मठाचा परिसर गुडघाभर पाण्याखाली गेला होता. भिवंडी तालुक्यातील तीन पूल पाण्याखाली गेले असून वीस गावांचा संपर्क तुटला आहे. गेल्या चोवीस तासांत भिवंडीत सर्वाधिक २०५ मिमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे वाडा तसेच वसई परिसराला जोडणारे तीन पूल पाण्याखाली गेले आणि अवचीतपाडा, निंबवली, गोराड, कलभोण व गणेशपुरीसह छोट्या-मोठ्या वीस गावांचा संपर्क तुटला. या पावसाने शेतकरी सुखावले तरी वाडा व वसईच्या बाजारात नियमीत जाऊन दुध,भाजीपाला विक्री करणारा शेतकरी गावातच अडकून पडल्याने तो शहरापर्यंत पोचू शकला नाही. या गावांपर्यंत महसूल विभागाचे अधिकारीदेखील संध्याकाळपर्यंत पोचू शकले नाहीत. ग्रामस्थ हा दावा करीत असताना जिल्हाधिकारी कार्यालयाने मात्र रात्री उशिरा गावांशी संपर्क तुटला नसल्याचे जाहीर केले. संबंधित बातम्या आतील पानांत