शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

परतीच्या पावसामुळे घसरला ओल्या झालेल्या फुलांचा दर्जा  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 06:24 IST

परतीच्या पावसाचा परिणाम भाज्यांप्रमाणे फुलांवरही झाला आहे. त्यामुळे दरवर्षी दिवाळीच्या तोंडावर वाढणारे फुलांचे दर यंदा मात्र सर्वसाधारण आहेत. यंदा मालाला दर्जा नसल्याने

ठाणे : परतीच्या पावसाचा परिणाम भाज्यांप्रमाणे फुलांवरही झाला आहे. त्यामुळे दरवर्षी दिवाळीच्या तोंडावर वाढणारे फुलांचे दर यंदा मात्र सर्वसाधारण आहेत. यंदा मालाला दर्जा नसल्याने फुलांचे दर फार वाढलेले नसल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.सण - उत्सव, समारंभाचे वातावरण प्रसन्न करण्यासाठी फुलांची आवश्यकता असते. गणेशोत्सव, नवरात्रौत्सव, दिवाळी, दसरा या सण - उत्सवांत फुलांची खरेदी मोठ्या प्रमाणात केली जाते. यानिमित्ताने एरव्हीपेक्षा फुलांचे दरही तिप्पट - चौपट होतात. ते वधारले तरी फुलांची मागणी मात्र कायम असते. दिवाळीच्या तोंडावर विविध प्रकारांची फुले बाजारात दाखल झाली आहेत. परंतु, परतीच्या पावसाने त्यांच्या दर्जावर मात्र पाणी फेरले. गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या दिवाळीत फुलांचे दर सर्वसाधारण आहेत. पावसामुळे मालाला दर्जा नाही, फुले माल भिजलेली येत आहेत. आजची फुले ही उद्या लगेच खराब होऊ शकतात. त्यामुळे फार महागड्या दरात ती विकली जात नसल्याचे विक्रेते संजय ठसाळे यांनी लोकमतला सांगितले. बुधवारी नरक चतुर्दशी असल्याने मंगळवारी ठाणेकरांनी फुलांची खरेदी केली. लक्ष्मीपूजनच्या दिवशी दुप्पट गर्दी होईल, असा अंदाज ठसाळे यांनी व्यक्त केला. ठाण्याचा बाजार फुलांनी बहरला असला तरी मालाचा दर्जा खालावला असल्याने विक्रेत्यांमध्ये नाराजी आहे. दिवाळीच्या निमित्ताने मंगळवारी तब्बल ५० हजारांहून किलो अधिक फुलांची आवक झाल्याचे ठसाळे म्हणाले.

टॅग्स :diwaliदिवाळी