शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
2
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
3
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
4
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
5
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
6
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
7
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
8
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
9
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
10
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
11
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
12
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
13
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
14
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
15
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
16
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
17
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
18
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
19
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
20
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ

पाच वर्षात महाराष्ट्र दुष्काळमुक्त

By admin | Updated: June 21, 2017 04:25 IST

गेल्यावर्षी महाराष्ट्रात पाण्याअभावी दुष्काळ होता. त्यामुळे नागरिक व शेतकरी होरपळून निघाला होता. त्याला दिलासा देण्यासाठी सरकारने जलयुक्त शिवार योजना राबवली.

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : गेल्यावर्षी महाराष्ट्रात पाण्याअभावी दुष्काळ होता. त्यामुळे नागरिक व शेतकरी होरपळून निघाला होता. त्याला दिलासा देण्यासाठी सरकारने जलयुक्त शिवार योजना राबवली. त्यामुळे यंदाच्यावर्षी राज्यात पाण्याचे मागच्या वर्षीच्या तुलनेत दुर्भिक्ष्य नाही. येत्या पाच वर्षात महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचे ध्येय भाजप सरकारने डोळ््यासमोर ठेवले असल्याचे प्रतिपादन राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी येथे केले.केंद्र सरकारला तीन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त कल्याण स्पोर्ट कॉमप्लेक्समध्ये जनहिताचे कुठले निर्णय घेतले याची माहिती देणारा कार्यक्रम झाला. जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्टतर्फे कार्यक्रम झाला. याप्रसंगी जेएनपीटीचे व्यवस्थापक डी. नरेश, विश्वस्त विवेक देशपांडे, आमदार नरेंद्र पवार आणि उपमहापौर मोरश्वर भोईर आदी उपस्थित होते. चव्हाण म्हणाले की, जलयुक्त शिवार योजनेमुळे ११ हजारापेक्षा अधिक गावे दुष्काळमुक्त झाली आहेत. ही योजना भाजपा सरकारने प्रभावीपणे राबवली. त्यामुळे यावर्षी मे अखेरीस पाणीटंचाईची झळ मोठ्या प्रमाणात जाणवली नाही. संरक्षण साधन सामग्रीची टक्केवारी ५० वर नेली. यूपीए सरकारच्या काळात हीच टक्केवरी केवळ १० होती. त्यात ४० टक्के वाढ केली आहे. सर्जिकल स्ट्राईक करुन शत्रू राष्ट्राला चांगलाच धडा शिकवला. सरकार सगळ््याच बाबतीत सतर्क व संवेदनशील आहे. आधारकार्ड, मोबाइल आणि कॅशलेसमुळे विविध ९२ जनहितकारी योजनांचा लाभ कोणत्याही दलालांशिवाय थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होत आहे. हे सरकार पारदर्शक व गतीमान आहे, असे ते म्हणाले.