शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

पाच गावांत शिरले बारवी धरणाचे पाणी

By admin | Updated: August 8, 2016 02:19 IST

गेल्या आठवड्यातील पावसाने बारवी धरणाच्या पाण्याची पातळी वाढल्याने तोंडली, काचकोळी, जांभूळवाडी, मार्गवाडी, देववाडीतील प्रकल्पग्रस्तांच्या घरात पाणी शिरू लागले आहे

बदलापूर/मुरबाड : गेल्या आठवड्यातील पावसाने बारवी धरणाच्या पाण्याची पातळी वाढल्याने तोंडली, काचकोळी, जांभूळवाडी, मार्गवाडी, देववाडीतील प्रकल्पग्रस्तांच्या घरात पाणी शिरू लागले आहे. त्यांना त्वरित घरे सोडण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. अनेक गावांतील पाणवठेही पाण्याखाली गेल्याने त्यांच्या स्थलांतराच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र, गावात पाणी शिरत असतानाही काही प्रकल्पग्रस्तांनी गाव न सोडण्याचा निर्णय घेतला आहे. आहे त्याच गावात उंचवट्याच्या ठिकाणी तात्पुरती निवारा शेड उभारून तेथे ते राहत आहेत. दोन दिवसांत पाण्याची पातळी आणखी वाढेल. सर्व आदिवासी पाडे पाण्याखाली जातील. त्यामुळे घरे सोडण्यावरून एमआयडीसी आणि प्रकल्पग्रस्तांमध्ये संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत.या ग्रामस्थांच्या स्थलांतरासाठी एमआयडीसीने मुरबाड शहरात आठ महिन्यांच्या भाडेकराराने ५० खोल्या घेतल्या आहेत. जी कुटुंबे स्थलांतरित होतील, त्यांच्या पाळीव जनावरांसाठी तंबू उभारून चाऱ्याची व्यवस्था केली जाणार आहे. या गावांतील पाणवठे पाण्याखाली गेले आहेत. तात्पुरती व्यवस्था म्हणून त्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. दरम्यान, मोबदल्याच्या मुद्द्यावरून काही गावकऱ्यांनी अद्याप घरे सोडलेली नाहीत. त्यामुळे त्यांना सक्तीने घरांतून बाहेर काढण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. प्रकल्पग्रस्त गावांतील चार घरे, विहिरी आणि बोअरवेल पाण्याखाली गेली आहे. या आदिवासीपाड्याला जोडणारा मुख्य रस्ता पाण्याखाली गेल्याने या गावांचा संपर्क तुटला आहे. हे प्रकल्पग्रस्त जीव धोक्यात घालून या रस्त्यावरून जात आहेत. ज्या घरांमध्ये पाणी शिरले आहे, त्यांनी गाव न सोडता त्याच गावात वरच्या भागात तात्पुरती शेड बांधली आहे. या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी बारवी प्रकल्पग्रस्त पीडित सेवा संघाचे अध्यक्ष कमलाकर भोईर यांनी ग्रामस्थांसोबत चर्चा केली. मात्र, या बैठकीत गाव न सोडण्याचाच निर्णय एकमताने घेण्यात आला. बुडित क्षेत्रात वास्तव्य करणाऱ्या प्रकल्पग्रस्तांनी पाण्याशी न खेळता आणि कोणाच्याही भूलथापांना बळी न पडता त्वरित घरे सोडावी आणि स्थलांतर करावे, असे आवाहन आमदार किसन कथोरे यांनी केले आहे. या स्थलांतरितांची अवहेलना होणार नाही, याची काळजी घेण्याचे आदेशही त्यांनी प्रशासनाला दिले.ज्यांच्या घरात पाणी शिरले आहे, त्यांच्या स्थलांतरापेक्षा बारवी प्रकल्पपीडितांच्या संघटनेच्या ‘वातानुकूलित’ पदाधिकाऱ्यांनी त्यांची माथी भडकावण्याचा प्रयत्न केल्याने कथोरे यांनी त्यांच्यावरही टीका केली. आजवरच्या आंदोलनात बाधित आदिवासी आणि आंदोलकांचा किती फायदा झाला आहे, असा प्रश्न त्यांनी विचारला. बारवी धरण आताच अस्तित्वात आलेले नाही. ज्याज्या वेळी त्याची उंची वाढवली, त्यात्या वेळी शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन मोबदल्याची मागणी मान्य केल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. पावसाळी अधिवेशनात बारवी प्रकल्पपीडित कुटुंबांच्या घरातील एकाला परिसरातील नगरपालिकांत कायमस्वरूपी नोकरी देण्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. (प्रतिनिधी/वार्ताहर)