शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण-डोंबिवलीत दररोज पाच हजार चाचण्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:40 IST

कल्याण : केडीएमसी हद्दीत दिवसेंदिवस कोरोना रुग्ण वाढत असल्याने चाचण्यांचे प्रमाणही वाढविण्यात आले आहे. सध्या दिवसाला पाच हजार जणांची ...

कल्याण : केडीएमसी हद्दीत दिवसेंदिवस कोरोना रुग्ण वाढत असल्याने चाचण्यांचे प्रमाणही वाढविण्यात आले आहे. सध्या दिवसाला पाच हजार जणांची चाचणी केली जात आहे, अशी माहिती मनपाच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

मनपाची रुग्णालये, चाचणी केंद्रे, तसेच खासगी पॅथॉलॉजी लॅबमध्ये अँटिजन व आरटीपीसीआर चाचण्या केल्या जात आहेत. कोरोना रोखण्यासाठी मनपाने चाचण्यांवर भर दिला आहे. मनपाने याव्यतिरिक्त बस डेपो आणि कल्याण रेल्वेस्थानकातही चाचणी केंद्र सुरू ठेवले आहे. कोरोनाचे निदान लवकर झाल्यास रुग्णावर तातडीने उपचार सुरू करणे शक्य होते. त्यामुळेच चाचण्या वाढविण्यात येत असल्याचे मनपा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी म्हणाले. मनपा हद्दीत दररोज पाच हजार जणांची चाचणी केली जात आहे. कोरोना चाचणीनंतर पॉझिटिव्हिटीचे प्रमाण २३ टक्के आहे. हे प्रमाण १० टक्क्यांच्या आत असायला हवे. कोरोना रुग्णांचा दुपटीचा दर हा ४३ दिवसांवर आला आहे.

मनपाने मागील वर्षापासून आतापर्यंत एकूण चार लाख ९१ हजार ९३७ जणांची चाचणी केली आहे. त्यापैकी दोन लाख ७७ हजार ४६२ जणांची अँटिजन, तर दोन लाख १४ हजार ४७५ जणांची आरटीपीसीआर चाचणी केली आहे. सुरुवातीस आरटीपीसीआर चाचणीसाठी दोन हजारांपेक्षा जास्त रक्कम घेतली जात होती. आता ही रक्कम नियंत्रित करण्यात आली आहे. डॉ. रजनीकांत देसाई म्हणाले, आता आरटीपीसीआर चाचणीसाठी ५०० रुपये आकारले जातात. घरी जाऊन चाचणी केल्यास ७०० रुपये घेतले जात आहेत.

‘लस तातडीने उपलब्ध करून द्या’

- राज्य सरकारच्या नव्या निर्बंधांनुसार रिक्षा, टॅक्सी आणि बसचालकांनी १० एप्रिलपूर्वी आरटीपीसीआर चाचणी करून घ्यायची आहे. १५ दिवसांची वैधता ठरविली आहे, तसेच अत्यावश्यक सेवेतील दुकानांतील कामगारांनाही आरटीपीसीआर चाचणी सक्तीची केली आहे. ही चाचणी करून घेण्याची जबाबदारी दुकानमालकाची आहे; अन्यथा त्यांचे दुकान बंद करण्याची कारवाई केली जाईल.

- मात्र, आरटीपीसीआर चाचणीचा ५०० रुपयांचा खर्च परवडणार नसल्याने या सगळ्य़ांना कोरोनाची लस तातडीने उपलब्ध करून दिली पाहिजे, अशी मागणी दुकानदार व रिक्षाचालक-मालक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

---------------------------