शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

ठाणेकरांसाठी पाच हजार किलोंचा द्राक्ष महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 02:07 IST

सलग चार दिवस चालणार खरेदी

- सुरेश लोखंडेठाणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘विकेल ते पिकेल’ धोरणांतर्गत श्री संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार अभियानांतर्गत ठाणे शहरातील ठिकठिकाणच्या आठवडी बाजारात ११ फेब्रुवारी म्हणजे गुरुवारपासून पुढील चार दिवस चार हजार ८०० किलो ताजे, गोड द्राक्षे महोत्सव शेतकऱ्यांद्वारे पार पडणार असल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी अंकुश माने यांनी ‘लोकमत’ला दिली.ठाणेकरांना सेंद्रिय पालेभाज्या, फळफळावळांची मोठी आवड आहे. ‘विकेल ते पिकेल’ या धोरणांतर्गत श्री संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार अभियानांतर्गत ठाणे शहरातील ठिकठिकाणच्या आठवडी बाजारात सतत चार दिवस द्राक्ष महोत्सव चालणार आहे. ग्राहकांच्या मागणीप्रमाणे पुरवठा होण्यासाठी शासनाच्या रयत बाजार अभियानात इच्छुक शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या आदींनी उत्पादित केलेल्या ताज्या व दर्जेदार पाच हजार किलो द्राक्षांचा महोत्सव ठाणेकरांसाठी ठाणे महानगरपालिका परिसरातील आठवडी बाजारात सुरू होत आहे. गुरुवारपासून सुरू होणारा हा महोत्सव प्रथम शिवाईनगर, ब्रह्मांड, जांभळी, कोलबाड, लोकमान्यनगर व वसंत विहारजवळील खेवरा सर्कल आदी परिसरात पार पडेल.नाशिक येथील आत्माचे प्रकल्प संचालक यांच्याकडील नोंदणीकृत शेतकरी उत्पादक कंपन्यांमार्फत उत्पादित होणाऱ्या द्राक्षांची विक्री करण्याची संधी मिळणार आहे. द्राक्ष खरेदी करून शेतकऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी केले आहे.चोखंदळ ठाणेकरांसाठी द्राक्षमहोत्सवठाणे : चोखंदळ ठाणेकरांनी श्री. छत्रपती शिवाजी महाराज मैदान, तलावपाळी या ठिकाणासह ठाणे मनपा मैदान, डवलेनगर टीएमटी बस डेपोमागे लोकमान्यनगर पाडा नं. ३, याशिवाय ब्रह्मांड ठामपा मैदान कोलशेत फेज नं. ५, पातलीपाडा लिंक रोड, ब्रह्मांड, उन्नती गार्डन मैदान, शिवाईनगर, पोखरण रोड नं. १, महानगरपालिका भाजी मंडई, एसआरए इमारतीच्या गेटमधील मोकळी जागा, खेवरा सर्कल, पोखरण रोड नं २, कोलबाड येथील जागमाता मंदिर आणि सृष्टी बिल्डिंगमधील रस्त्याची मोकळी जागा, ठामपा मैदान कोलबाड तलावाच्या जवळ आदी ठिकाणी हा द्राक्षेमहोत्सव पार पडणार आहे.शेतकरी गटांकडून द्राक्षांची उपलब्धतामल्हार ॲग्री फार्मर बोपेगाव, ता. दिंडोरी येथून रोज एक हजार किलो द्राक्षे उपलब्ध होणार आहेत. याप्रमाणेच पराशर कृषी विकास खेडगाव येथून ५०० किलो, श्रीशक्ती महिला शेतकरी गट, खेडगाव तर ऋणानुबंध महिला स्वयंसहाय्यता, मातेरेवाडी, एकता शेतकरी बचतगट, बोपेगाव, कृषी लक्ष्मी आणि रुद्रादित्य फार्मर आदींकडून रोज २०० ते ५०० किलो द्राक्षांचा ताजा माल ठाणेकरांसाठी उपलब्ध केला जाणार आहे.