शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात पाच आरटीपीसीआर केंद्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 00:57 IST

राज्यात आघाडी : प्रशासनाची माहिती

n    लाेकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाणे जिल्ह्यात कोरोनाला अटकाव घालण्यासाठी जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभाग, महसूल विभाग दिवसरात्र झटत आहे. अशातच कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची माहिती तत्काळ मिळवून त्यांना उपचाराखाली आणण्यासाठी ठाणे जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील तीन महापालिका क्षेत्रांसह एक नगरपालिका तर, ग्रामीण परिक्षेत्रात एक अशा पाच आरटीपीसीआर (कोरोना चाचणी) केंद्रांची जिल्हा नियोजन निधीतून उभारणी करण्यात आली आहे. जिल्हा नियोजन निधीतून पाच आरटीपीसीआर केंद्रे उभारणारा ठाणे जिल्हा हा राज्यातील पहिला जिल्हा ठरला आहे.मार्चच्या अखेरीपासून सर्वत्र कोरोनाने हाहाकार उडवून दिला आहे. तेव्हापासून आरोग्य विभागातील डॉक्टर्स, परिचारिका, सफाई कर्मचारी यांच्यासह पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासनातील महसूल विभागातील तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठीदेखील दिवसरात्र कार्यरत आहेत. त्यात ठाणे जिल्ह्यात मार्च महिन्याच्या अखेरीस कोरोनाने शिरकाव केल्यानंतर एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत होती. त्या वेळी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा नियोजन निधीतून आरोग्य यंत्रणांचे सक्षमीकरण करण्यात आले. त्याचबरोबर जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांचे चाचणीचे प्रमाण वाढविण्याबरोबरच त्याच्या निदानासाठी जिल्ह्यातील तीन महापालिका क्षेत्रासह एक नगरपालिका आणि ग्रामीण परिक्षेत्रात एक अशा पाच ठिकाणी आरटीपीसीआर (कोरोना चाचणी) केंद्रांची उभारणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी जिल्हा नियोजन निधीतून ही केंद्रे व साहित्याच्या खरेदीसाठी आठ कोटींचा निधी खर्च करण्यात आला. तसेच प्रत्येक केंद्रावर १० हजार आरटीपीसीआर (कोरोना चाचणी) किटदेखील उपलब्ध करून दिले.या ठिकाणी उभारली केंद्रेभिवंडी, मीरा भाईंदर, उल्हासनगर या महापालिका क्षेत्रांसह बदलापूर-अंबरनाथ नगर परिषदेमध्ये एक आणि ग्रामीण परिक्षेत्रातील पडघा येथे आरटीपीसीआर (कोरोना चाचणी) केंद्र उभारले असून या ठिकाणी दिवसाकाठी २०० ते २५० चाचण्यांची तपासणी करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.सहा हजार ६०२ रुग्ण घेत आहेत उपचारठाणे जिल्ह्यात सात ते आठ महिन्यांत दोन लाख ३४ हजार ८७५ जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यापैकी दोन लाख २२ हजार ४८३ जण कोरोनामुक्त झाले. तर, पाच हजार ७९० जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. त्यात सध्या जिल्ह्यात सहा हजार ६०२ रुग्ण विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या