शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
3
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
4
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
5
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
6
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
7
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
8
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
9
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
10
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
11
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
12
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
13
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
14
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
15
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
16
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
17
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
18
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
19
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
20
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात पाच आरटीपीसीआर केंद्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 00:57 IST

राज्यात आघाडी : प्रशासनाची माहिती

n    लाेकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाणे जिल्ह्यात कोरोनाला अटकाव घालण्यासाठी जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभाग, महसूल विभाग दिवसरात्र झटत आहे. अशातच कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची माहिती तत्काळ मिळवून त्यांना उपचाराखाली आणण्यासाठी ठाणे जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील तीन महापालिका क्षेत्रांसह एक नगरपालिका तर, ग्रामीण परिक्षेत्रात एक अशा पाच आरटीपीसीआर (कोरोना चाचणी) केंद्रांची जिल्हा नियोजन निधीतून उभारणी करण्यात आली आहे. जिल्हा नियोजन निधीतून पाच आरटीपीसीआर केंद्रे उभारणारा ठाणे जिल्हा हा राज्यातील पहिला जिल्हा ठरला आहे.मार्चच्या अखेरीपासून सर्वत्र कोरोनाने हाहाकार उडवून दिला आहे. तेव्हापासून आरोग्य विभागातील डॉक्टर्स, परिचारिका, सफाई कर्मचारी यांच्यासह पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासनातील महसूल विभागातील तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठीदेखील दिवसरात्र कार्यरत आहेत. त्यात ठाणे जिल्ह्यात मार्च महिन्याच्या अखेरीस कोरोनाने शिरकाव केल्यानंतर एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत होती. त्या वेळी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा नियोजन निधीतून आरोग्य यंत्रणांचे सक्षमीकरण करण्यात आले. त्याचबरोबर जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांचे चाचणीचे प्रमाण वाढविण्याबरोबरच त्याच्या निदानासाठी जिल्ह्यातील तीन महापालिका क्षेत्रासह एक नगरपालिका आणि ग्रामीण परिक्षेत्रात एक अशा पाच ठिकाणी आरटीपीसीआर (कोरोना चाचणी) केंद्रांची उभारणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी जिल्हा नियोजन निधीतून ही केंद्रे व साहित्याच्या खरेदीसाठी आठ कोटींचा निधी खर्च करण्यात आला. तसेच प्रत्येक केंद्रावर १० हजार आरटीपीसीआर (कोरोना चाचणी) किटदेखील उपलब्ध करून दिले.या ठिकाणी उभारली केंद्रेभिवंडी, मीरा भाईंदर, उल्हासनगर या महापालिका क्षेत्रांसह बदलापूर-अंबरनाथ नगर परिषदेमध्ये एक आणि ग्रामीण परिक्षेत्रातील पडघा येथे आरटीपीसीआर (कोरोना चाचणी) केंद्र उभारले असून या ठिकाणी दिवसाकाठी २०० ते २५० चाचण्यांची तपासणी करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.सहा हजार ६०२ रुग्ण घेत आहेत उपचारठाणे जिल्ह्यात सात ते आठ महिन्यांत दोन लाख ३४ हजार ८७५ जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यापैकी दोन लाख २२ हजार ४८३ जण कोरोनामुक्त झाले. तर, पाच हजार ७९० जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. त्यात सध्या जिल्ह्यात सहा हजार ६०२ रुग्ण विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या