शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक भारतीय संतापलाय..."; पंतप्रधान मोदी यांचा CJI गवईंना फोन, हल्ल्याचा केला निषेध
2
अभिनेता विजय देवरकोंडा याच्या कारला अपघात, दुसऱ्या कारने मागून दिली धडक
3
NDA, MGB अन् JSP मध्ये थेट सामना, बाकीचे रेसमध्येही नाहीत! बिहार निवडणुकीच्या घोषणेनंतर, काय म्हणाले प्रशांत किशोर?
4
हनिट्रॅप, शारीरिक संबंध आणि पैशांची मागणी, निवृत्त अधिकाऱ्यांना जाळ्यात अडकवणारी सुंदरी अशी सापडली
5
न्यूझीलंड विरुद्ध तझमिनची विक्रमी सेंच्युरी; स्मृती पडली मागे! दक्षिण आफ्रिकेचा पहिला विजय
6
तुमचा मित्र कुठे आहे? सहज शोधू शकाल, इन्स्टाग्रामने आणलं खास फिचर, मिळेल अशी माहिती
7
सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचं पुढे काय होणार? गवईंनी घेतला मोठा निर्णय 
8
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
9
‘मेट्रो  ९ मार्गिका १५ डिसेंबरपर्यंत आणि मेट्रो ४ मार्गिका ३१ डिसेंबर पर्यंत सुरू करा’, परिवहन मंत्र्यांचे आदेश 
10
भारताविरूद्ध 'अतिआगाऊपणा' पाकिस्तानच्या महिला फलंदाजाला पडला महागात, ICCने सुनावली शिक्षा
11
सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील सार्वजनिक विद्यापीठात अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता
12
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
13
वनडेत ५६४ धावा! प्रतिस्पर्धी संघाला ८७ धावांवर All Out करत या संघानं ४७७ धावांनी जिंकली मॅच
14
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
15
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
16
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
17
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
18
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
19
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
20
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम

जिल्ह्यात पाच आरटीपीसीआर केंद्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 00:57 IST

राज्यात आघाडी : प्रशासनाची माहिती

n    लाेकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाणे जिल्ह्यात कोरोनाला अटकाव घालण्यासाठी जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभाग, महसूल विभाग दिवसरात्र झटत आहे. अशातच कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची माहिती तत्काळ मिळवून त्यांना उपचाराखाली आणण्यासाठी ठाणे जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील तीन महापालिका क्षेत्रांसह एक नगरपालिका तर, ग्रामीण परिक्षेत्रात एक अशा पाच आरटीपीसीआर (कोरोना चाचणी) केंद्रांची जिल्हा नियोजन निधीतून उभारणी करण्यात आली आहे. जिल्हा नियोजन निधीतून पाच आरटीपीसीआर केंद्रे उभारणारा ठाणे जिल्हा हा राज्यातील पहिला जिल्हा ठरला आहे.मार्चच्या अखेरीपासून सर्वत्र कोरोनाने हाहाकार उडवून दिला आहे. तेव्हापासून आरोग्य विभागातील डॉक्टर्स, परिचारिका, सफाई कर्मचारी यांच्यासह पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासनातील महसूल विभागातील तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठीदेखील दिवसरात्र कार्यरत आहेत. त्यात ठाणे जिल्ह्यात मार्च महिन्याच्या अखेरीस कोरोनाने शिरकाव केल्यानंतर एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत होती. त्या वेळी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा नियोजन निधीतून आरोग्य यंत्रणांचे सक्षमीकरण करण्यात आले. त्याचबरोबर जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांचे चाचणीचे प्रमाण वाढविण्याबरोबरच त्याच्या निदानासाठी जिल्ह्यातील तीन महापालिका क्षेत्रासह एक नगरपालिका आणि ग्रामीण परिक्षेत्रात एक अशा पाच ठिकाणी आरटीपीसीआर (कोरोना चाचणी) केंद्रांची उभारणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी जिल्हा नियोजन निधीतून ही केंद्रे व साहित्याच्या खरेदीसाठी आठ कोटींचा निधी खर्च करण्यात आला. तसेच प्रत्येक केंद्रावर १० हजार आरटीपीसीआर (कोरोना चाचणी) किटदेखील उपलब्ध करून दिले.या ठिकाणी उभारली केंद्रेभिवंडी, मीरा भाईंदर, उल्हासनगर या महापालिका क्षेत्रांसह बदलापूर-अंबरनाथ नगर परिषदेमध्ये एक आणि ग्रामीण परिक्षेत्रातील पडघा येथे आरटीपीसीआर (कोरोना चाचणी) केंद्र उभारले असून या ठिकाणी दिवसाकाठी २०० ते २५० चाचण्यांची तपासणी करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.सहा हजार ६०२ रुग्ण घेत आहेत उपचारठाणे जिल्ह्यात सात ते आठ महिन्यांत दोन लाख ३४ हजार ८७५ जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यापैकी दोन लाख २२ हजार ४८३ जण कोरोनामुक्त झाले. तर, पाच हजार ७९० जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. त्यात सध्या जिल्ह्यात सहा हजार ६०२ रुग्ण विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या