शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही तोंड उघडलं तर अडचणीत याल"; अजित पवारांच्या टीकेला रवींद्र चव्हाणांकडून जशास तसे उत्तर
2
सुकमामध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत १२ नक्षलवादी ठार
3
मुस्ताफिजुर रहमान बाबत निर्णय झाला, संघातून वगळण्याचे बीसीसीआयचे केकेआरला आदेश
4
सावधान! फोनचे 'ब्लूटूथ' ऑन ठेवणं पडू शकतं महागात; क्षणात बँक खातं होईल रिकामं!
5
७ जानेवारीला उघडणार ४५ वर्ष जुन्या कंपनीचा IPO; किती करावी लागणार गुंतवणूक, प्राईज बँड किती? जाणून घ्या
6
सोमवारी तळहातावरील गुरु पर्वतावर लावा हळदीचा टिळा; 'पुष्य नक्षत्रा'च्या मुहूर्तावर उघडेल भाग्याचे द्वार!
7
व्हिडीओ घेऊ नका...! वडिलांना घेऊन रुग्णालयातून बाहेर पडताना श्रद्धा कपूर पापाराझींवर भडकली
8
Mithun Chakraborty : "जोपर्यंत माझ्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब..."; मिथुन चक्रवर्ती कडाडले, ममता बॅनर्जींवर गंभीर आरोप
9
Nashik Municipal Election 2026 : गटबाजीच्या खेळात प्रभाग २५ मध्ये दोन ठिकाणी कमळ कोमेजले, असे का घडले?
10
६७ बिनविरोध नगरसेवक निवडणूक आयोगाच्या रडारवर; दबाव टाकला की आमिष दाखवलं? होणार चौकशी
11
तारिक रहमान होणार 'किंग', पण प्रचाराचं काय? बांगलादेशात निवडणूक आयोगाच्या 'या' एका नियमाने वाढवलं टेन्शन!
12
Border 2: मेरा दिमाग हिला हुआ है! 'घर कब आओगे' गाण्याच्या लाँचवेळी सनी देओल असं का म्हणाला?
13
पाकिस्तानची नापाक खेळी; राजस्थानमध्ये ड्रोनने पाठवली 'पांढरी पावडर', पोलिसांनी असा लावला छडा
14
इराणमध्ये खामेनींविरोधात निदर्शने तीव्र, ट्रम्प यांच्या पाठिंब्यामुळे 'Gen-Z' चा उत्साह वाढला
15
एकच प्रीमिअम, पती-पत्नीला मिळणार विमा सुरक्षा प्लॅन; जाणून घ्या कसं?
16
महाराष्ट्राचा शाहरुख खान! पन्नाशीच्या उंबरठ्यावर असलेल्या उमेश कामतचं थक्क करणारं ट्रान्सफॉर्मेशन, दाखवले सिक्स पॅक ॲब्स
17
कंडोमच्या किमती वाढल्याने लोकसंख्या वाढेल? सलग तिसऱ्या वर्षी चीनला भीती, भारतासाठी ही एक संधी
18
'ऑपरेशन सिंदूर'वर पाकिस्तानचा यू-टर्न, आता युद्धविरामाचे श्रेय दिले चीनला; आधी ट्रम्प यांना दिलेले
19
‘नवसाचं पोर गेलं, भरपाई दिल्याने परत येणार का?’ दूषित पाण्यामुळे मृत्यू; दोन अधिकाऱ्यांना हटवले
20
इराण पेटला...! सर्वोच्च नेते खामेनेईंविरुद्ध तरुणाईचे रस्त्यावर उतरून आंदोलन; देशाच्या अर्थव्यवस्थेला घरघर, निदर्शनात सात जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

पाच लाखांच्या वीमा कवचामुळे बुडीत बँकांच्या खातेदारांना दिलासा- पुरुषोत्तम रुपाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2021 20:56 IST

ठाण्याच्या वागळे इस्टेट येथील आशर आयटी पार्कच्या सभागृहात रुपाला यांच्या हस्ते दिवाळखोरीत निघालेल्या बँकांच्या खातेदारांना प्रतिनिधीक स्वरुपात धनादेशाचे वाटप करण्यात आले.

ठाणे: केंद्रीय अर्थमंत्रलयाने बँकींग क्षेत्रत केलेल्या नव्या कायद्यामुळे आता बँक खातेदारांना त्यांच्या पैशांची हमी मिळणार आहे. एखादी बँक दिवाळखोरीत निघाली तर त्यांना पाच लाखांपर्यंतची रक्कम ९० दिवसांमध्ये देण्याचा नियम बंधनकारक केला आहे. त्याचा महाराष्ट्रासह देशभरातील बँक खातेदारांना मोठा लाभ होणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय मत्सव्यवसाय तथा दुग्धव्यवसाय मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी रविवारी ठाण्यातील कार्यक्रमात केले.

ठाण्याच्या वागळे इस्टेट येथील आशर आयटी पार्कच्या सभागृहात रुपाला यांच्या हस्ते दिवाळखोरीत निघालेल्या बँकांच्या खातेदारांना प्रतिनिधीक स्वरुपात धनादेशाचे वाटप करण्यात आले. त्यावेळी या खात्यादारांशी संवाद साधतांना ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, एकेकाळी बँक ही केवळ व्यावसायिक, उद्योजक आणि उच्च मध्यमवर्गीयांच्याच ठेवी ठेवण्यासाठी म्हणून ओळखली जात होती. परंतू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणलेल्या जनधन योजनेमुळे तिची ओळख सर्वसामान्यांसाठीही झाली. त्यामुळेच ४० कोटी ग्राहक बँकांशी जोडले गेले. 

जनधन योजनेत खाते उघडण्यासाठी लोकांकडे शंभर रु पये देखिल नाहीत. याची जाणीव झाल्यानंतर शून्य बचत खात्याद्वारेही जनधनचे खाते उघडण्याची परवानगी दिली. शून्यापासून सुरु झालेल्या या खात्यांमध्ये आता ६० हजार कोटी बँकामध्ये जमा झाले. बँकींग क्षेत्रत जनतेचा विश्वास निर्माण होण्याचे काम मोदींच्या या योजनेमुळे झाले. आता याच धर्तीवर डीबीटीची (डायरेक्ट बेनेफिट) योजना राबविली. दिवाळखोरीत निघालेल्या बँकांमधून पूर्वी एक लाखांचे वीमा कवच दिले जायचे. ते आता वाढवून पाच लाख रुपये करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यामुळे या ग्राहकांना न्याय मिळाला आहे. पूर्वी हे एक लाख रुपये मिळविण्यासाठीही खूप अडचणी येत होत्या. 

आता ही संपूर्ण प्रक्रीया सुलभ केली आहे.यावेळी परेश शाह यांना एक लाख ३३ हजार आणि िवना िदनी समेळ यांना पाच लाख रुपये असे दोन धनादेश खातेदारांना रुपाला यांच्या हस्ते देण्यात आले. ठाणे जिल्हयात या योजनेचे १८५ लाभार्थी असून त्यांना एक कोटी ६५ लाख रुपये दिले जाणार आहेत. यातील सुमारे १०० ग्राहकांचे पैसे त्यांच्या खात्यांमध्ये जमा झाल्याची माहिती जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक जयानंद भारती यांनी यावेळी सांगितले.

केंद्र सरकारच्या या डीआयसीजीसी योजनेमुळे आपल्याला एक लाख ८० हजार रुपये मिळाले. याचा विशेष आनंद असल्याचे ८४ वर्षीय विनायक जोशी (सिटी को ऑपरेटीव्ह बँकेचे खातेदार) यावेळी म्हणाले. याच योजनेमुळे आई वडिलांसह आपली दीड लाखांची रक्कम बँकेत जमा झाल्यामुळे अनिता गंधे यांनीही समाधान व्यक्त केले.यावेळी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी केलेल्या मार्गदर्शनाची चित्रफितही याच कार्यक्रमात थेट प्रक्षेपणाद्वारे दाखविण्यात आली.

टॅग्स :thaneठाणे