शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

पाच लाख परवडणारी घरे

By admin | Updated: September 4, 2015 01:07 IST

धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासासाठी क्लस्टर योजनेबाबत शासनपातळीवर जोरदार हालचाली सुरू असून येत्या आॅक्टोबरपर्यंत याबाबतचे धोरण निश्चित करण्यात येणार

ठाणे : धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासासाठी क्लस्टर योजनेबाबत शासनपातळीवर जोरदार हालचाली सुरू असून येत्या आॅक्टोबरपर्यंत याबाबतचे धोरण निश्चित करण्यात येणार असल्याची ग्वाही राज्याचे गृहनिर्माण, खणीकर्म व कामगारमंत्री प्रकाश महेता यांनी ठाण्यात दिली. पंतप्रधान योजनेंतर्गत मुंबईत ११ लाख, ठाण्यात ५ लाख तर संपूर्ण राज्यात २५ लाख घरांच्या निर्मितीचे उद्दिष्ट असल्याची माहिती त्यांनी दिली. धोकादायक इमारतींमधील भाडेकरूंच्या समस्या आणि त्यावर उपाययोजना या विषयावर आयोजित मेळाव्याला मार्गदर्शन करताना ते बोलत होते. नौपाड्यातील वसंतराव नाईक सभागृहात ठाणे डिस्ट्रीक्ट को-आॅपरेटिव्ह हाउसिंग फेडरेशनच्या वतीने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. ‘मी भाडेकरू म्हणूनच जन्माला आलो. ती इमारतही धोकादायक झाल्याने गेल्या तीन ते चार वर्षांपासून पर्यायी जागेत राहत आहे,’ असे महेता यांनी सांगितले. धोकादायक इमारतींमधील पाणी आणि वीज खंडित करता येणार नसल्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट केले.भाडेकरू आणि मालकी तत्त्वाच्या इमारतींसंदर्भात पुनर्विकासाचे धोरण निश्चित करताना रस्त्यासाठी नऊ मीटरपेक्षा जास्त जागा सोडण्याचा प्रस्ताव चुकून मांडला गेला, असे महेता यांनी सांगितले. असे जर झाले तर पुनर्वसन होणार नाही. त्यामुळे एखाद्या इमारतीचा पुनर्विकास करताना रस्त्यासाठी नऊ मीटर जागा सोडण्याची गरज नसल्याचेही त्यांनी रहिवाशांच्या वतीने आमदार केळकर यांच्या मागणीला उत्तर देताना सांगितले. तत्पूर्वी, आमदार केळकर यांनी ठाणेकरांची बाजू मांडली. भाजपाचे ठाणे शहराध्यक्ष आमदार संजय केळकर, ठाणे डिस्ट्रीक्ट को-आॅपरेटीव्ह हाउसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे, ठाणे महापालिकेचे भाजपचे गटनेते संजय वाघुले यांच्यासह ठाण्यातील धोकादायक इमारतींमधील शेकडो रहिवासी या वेळी उपस्थित होते. ठाण्याला क्लस्टर डेव्हलपमेंटसाठी कोणतीच अडचण नसून त्यासाठी पुनर्विकासासाठी चार एफएसआय वाढीव देण्याची सरकारची तयारी असल्याचे महेता म्हणाले. विकासक, भाडेकरू आणि मालक यांचाही या योजनेत फायदा होणार आहे. हे धोरण स्पष्ट करणे आवश्यक आहे, असे मत त्यांनी मांडले.एखादी इमारत पडल्यानंतर जीव जातात म्हणून न्यायालयाने पोलिसांना अशा इमारती रिक्त करण्याचे आदेश दिले. परंतु, घराबाहेर काढलेल्या रहिवाशांचे काय करायचे, हा प्रश्न अनुत्तरितच राहिला. त्यामुळे आता भाडेकरू आणि मालकी तत्त्वाच्या इमारतींसंदर्भात पुनर्विकासाचे धोरण निश्चित करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)