शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

पाच लाख परवडणारी घरे

By admin | Updated: September 4, 2015 01:07 IST

धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासासाठी क्लस्टर योजनेबाबत शासनपातळीवर जोरदार हालचाली सुरू असून येत्या आॅक्टोबरपर्यंत याबाबतचे धोरण निश्चित करण्यात येणार

ठाणे : धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासासाठी क्लस्टर योजनेबाबत शासनपातळीवर जोरदार हालचाली सुरू असून येत्या आॅक्टोबरपर्यंत याबाबतचे धोरण निश्चित करण्यात येणार असल्याची ग्वाही राज्याचे गृहनिर्माण, खणीकर्म व कामगारमंत्री प्रकाश महेता यांनी ठाण्यात दिली. पंतप्रधान योजनेंतर्गत मुंबईत ११ लाख, ठाण्यात ५ लाख तर संपूर्ण राज्यात २५ लाख घरांच्या निर्मितीचे उद्दिष्ट असल्याची माहिती त्यांनी दिली. धोकादायक इमारतींमधील भाडेकरूंच्या समस्या आणि त्यावर उपाययोजना या विषयावर आयोजित मेळाव्याला मार्गदर्शन करताना ते बोलत होते. नौपाड्यातील वसंतराव नाईक सभागृहात ठाणे डिस्ट्रीक्ट को-आॅपरेटिव्ह हाउसिंग फेडरेशनच्या वतीने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. ‘मी भाडेकरू म्हणूनच जन्माला आलो. ती इमारतही धोकादायक झाल्याने गेल्या तीन ते चार वर्षांपासून पर्यायी जागेत राहत आहे,’ असे महेता यांनी सांगितले. धोकादायक इमारतींमधील पाणी आणि वीज खंडित करता येणार नसल्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट केले.भाडेकरू आणि मालकी तत्त्वाच्या इमारतींसंदर्भात पुनर्विकासाचे धोरण निश्चित करताना रस्त्यासाठी नऊ मीटरपेक्षा जास्त जागा सोडण्याचा प्रस्ताव चुकून मांडला गेला, असे महेता यांनी सांगितले. असे जर झाले तर पुनर्वसन होणार नाही. त्यामुळे एखाद्या इमारतीचा पुनर्विकास करताना रस्त्यासाठी नऊ मीटर जागा सोडण्याची गरज नसल्याचेही त्यांनी रहिवाशांच्या वतीने आमदार केळकर यांच्या मागणीला उत्तर देताना सांगितले. तत्पूर्वी, आमदार केळकर यांनी ठाणेकरांची बाजू मांडली. भाजपाचे ठाणे शहराध्यक्ष आमदार संजय केळकर, ठाणे डिस्ट्रीक्ट को-आॅपरेटीव्ह हाउसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे, ठाणे महापालिकेचे भाजपचे गटनेते संजय वाघुले यांच्यासह ठाण्यातील धोकादायक इमारतींमधील शेकडो रहिवासी या वेळी उपस्थित होते. ठाण्याला क्लस्टर डेव्हलपमेंटसाठी कोणतीच अडचण नसून त्यासाठी पुनर्विकासासाठी चार एफएसआय वाढीव देण्याची सरकारची तयारी असल्याचे महेता म्हणाले. विकासक, भाडेकरू आणि मालक यांचाही या योजनेत फायदा होणार आहे. हे धोरण स्पष्ट करणे आवश्यक आहे, असे मत त्यांनी मांडले.एखादी इमारत पडल्यानंतर जीव जातात म्हणून न्यायालयाने पोलिसांना अशा इमारती रिक्त करण्याचे आदेश दिले. परंतु, घराबाहेर काढलेल्या रहिवाशांचे काय करायचे, हा प्रश्न अनुत्तरितच राहिला. त्यामुळे आता भाडेकरू आणि मालकी तत्त्वाच्या इमारतींसंदर्भात पुनर्विकासाचे धोरण निश्चित करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)