शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
2
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
3
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
4
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
5
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
6
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
7
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
8
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
9
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
10
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
11
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
12
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!
13
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
14
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? ५ महिन्यांत २००%, तर आतापर्यंत दिलाय ५१३१२% चा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
16
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
17
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
18
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
19
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
20
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!

यंदाही मच्छिमारांची घरे धोक्यात

By admin | Updated: June 20, 2016 01:55 IST

सातपाटीच्या पश्चिमेला समुद्र किनाऱ्यावर राहणाऱ्या मच्छीमारांच्या घरांना संरक्षण देणारा बंधारा मागील ७-८ वर्षांपासून फुटला असून त्याच्या दुरुस्तीच्या निधीचा प्रस्ताव मागील

हितेन नाईक,  पालघरसातपाटीच्या पश्चिमेला समुद्र किनाऱ्यावर राहणाऱ्या मच्छीमारांच्या घरांना संरक्षण देणारा बंधारा मागील ७-८ वर्षांपासून फुटला असून त्याच्या दुरुस्तीच्या निधीचा प्रस्ताव मागील २-३ वर्षापासून धूळखात पडून आहे. त्यामुळे या पावसाळयातही किनाऱ्यांलगतच्या घरांना उधाणाच्या लाटाचा तडाखा सहन करावा लागणार आहे. या बंधाऱ्याच्या दुरुस्तीचा १४ कोटी पैकी ५ कोटीच्या पहिल्या टप्प्याच्या निधीचा प्रस्ताव तांत्रिक मान्यतेसाठी पडून आहे.सातपाटी गावाच्या पश्चिमेकडील समुद्र किनाऱ्यालगत राहणाऱ्या मच्छिमारांची अनेक घरे समुद्राला आलेल्या तुफानी वादळ वारे आणि भयंकर लाटांच्या तडाख्याने उध्वस्त झाली होती. सहकारी संस्थांच्या मागणीवरून तत्कालीन केंद्रिय पेट्रोलियम मंत्री व बिहारचे विद्यमान राज्यपाल राम नाईक यांच्या प्रयत्नाने सोळाशे मीटर बंधाऱ्याला मान्यता मिळून २ फेब्रुवारी २००३ साली हा बंधारा लोकार्पित करण्यात आला होता. मागील १३ वर्षा पासून ऊन, पाऊस, वादळी वारे आणि महाकाय लाटांचे तडाखे झेलीत हा बंधारा उभा असून त्याची आता पडझड झाली आहे. या बंधाऱ्याचे दगड समुद्रात वाहून गेल्याने बंधाऱ्या ला भगदाडे पडली आहेत. तर बंधाऱ्या वरून खाली उतरण्या साठी बांधण्यात आलेले रॅम्प (पायऱ्या) तुटल्याने महिला वर्गाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. माजी राज्यमंत्री राजेंद्र गवितांनी मेरी टाईम बोर्डाकडून निधी आणून दुरुस्तीच्या कामाला सुरुवातही केली होती. त्या नंतर काही दिवसात पुन्हा हे काम बंद पडले ते आजपर्यंत बंदच आहे. त्या नंतर बंधाऱ्याच्या दुरुस्तीची अनेक आश्वासने निवडणूकी पूर्वी सातपाटीकरांनी ऐकली असून हि आश्वासने हवेत विरल्याचा अनुभव त्यांनी घेतला आहे.महाराष्ट्र शासनाकडून या जिल्ह्यातील पालघर, डहाणू आणि वसई तालुक्यातील कळंब (दीड कोटी), अर्नाळा (दीड कोटी), सातपाटी (पाच कोटी), नवापूर(दीड कोटी), तारापूर (दोन कोटी), घिवली(दीड कोटी), एडवन (दीड कोट), डहाणू-बुरुज पाडा(दीड कोटी), गुंगवाडा (दीड कोटी), तडीयाळे (दीड कोटी), धाकटी डहाणू (एक कोटी), नरपड (एक कोटी), ई, १२ बंधाऱ्या च्या कामाचे निधी चे प्रस्ताव तांत्रिक मान्यते साठी सरकार दरबारी पडून आहेत.त्यातील धाकटी डहाणू आणि नरपड ह्या आमदार अमित घोडा यांच्या तालुक्यातील कामाचे टेंडर होऊन कामाची वर्क आॅर्डर मिळाल्याची माहिती पतन विभागाच्या कार्यालयातुन मिळाली आहे. सातपाटी सह बाकीच्या किनारपट्टी वरील लोकांच्या घरांना समुद्राच्या महाकाय लाटा धडका देत असल्याने या कामाची वर्कआॅर्डर निघणे अत्यावश्यक असताना ही बाब धूळ खात का पडून आहेत असा प्रश्न मच्छीमार विचारू लागले आहेत.