शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

सिंधुदुर्गात मच्छीमारांचा वाद मिटला

By admin | Updated: November 24, 2015 01:37 IST

पारंपरिक आणि मिनी पर्ससीन मच्छीमार यांच्यात मच्छीमारी वरून झालेल्या वादावर पालकमंत्री दीपक केसरकर यांनी जसा यशस्वी तोडगा काढला तसा

पालघर : पारंपरिक आणि मिनी पर्ससीन मच्छीमार यांच्यात मच्छीमारी वरून झालेल्या वादावर पालकमंत्री दीपक केसरकर यांनी जसा यशस्वी तोडगा काढला तसा तो वसई-पालघरमधील मच्छीमारांच्या बाबतीत पालकमंत्री सवरा कधी काढणार असा प्रश्न मच्छीमारांत निर्माण झाला आहे. पारंपरिक मच्छीमारांनी ५ नॉटीकल मैलापर्यंत तर मिनी पर्ससीनधारकांनी ५ ते १२ नॉटीकल मैलापर्यंतच्या सागरीक्षेत्रात मच्छीमार करण्याची मर्यादा शनिवारी पार पडलेल्या बैठकीत पालकमंत्र्यांनी आखून दिली. या निर्णयास पारंपरिक व पर्ससीन मच्छीमारांनी संमती दर्शविली असून या निर्णयामुळे शांततेचे व सलोख्याचे वातावरण निर्माण होणार असल्याचा विश्वास खासदार विनायक राऊत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केला.सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातही स्थानिक मच्छीमारांमध्ये मासेमारी व्यवसायावरून वाद निर्माण झाला होता. पारंपरिक मच्छीमार व पर्ससीन यांच्यात उद्रेक निर्माण होऊन वातावरण तंग झाले होते. जाळपोळ यासारख्या घटनादेखील घडल्या होत्या. या वादावर तोडगा काढण्यासाठी मच्छीमारांची शनिवारी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी बैठक आयोजित केली होती.या बैठकीमध्ये पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत, जिल्हाधिकारी अनिल भंडारी, मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, पारंपरिक व मिनी पर्ससीन मच्छीमारांचे प्रतिनिधी, सरपंच, मत्स्य विभागातील अधिकारी आदी उपस्थित होते. यावेळी माहिती देताना खासदार विनायक राऊत म्हणाले की, आचरा गावात उद्रेक झाला होता. या उद्रेकावर मार्ग काढण्याची व आचरा गावात शांती, गावपण टिकविले जावे यासाठी तोडगा काढण्याचा प्रयत्न केला आहे. आचरा गावात १८ मिनी पर्ससीन मिच्छमार तर १६० पारंपरिक मच्छीमार आहेत. त्यांनी समुद्रात किती अंतरापर्यंत मच्छीमारी करावी यासाठी निर्बंध आखून देण्यात आले. जी तप्तरता पालकमंत्री केसरकर आणि खासदार विनाय राऊत यांनी दाखविली ती तत्परता पालकमंत्री विष्णू सवरा आणि खासदार चिंतामण वनगा कधी दाखविणार असा प्रश्न पालघर जिल्ह्यातील मच्छीमारांत चर्चिला जात आहे.वादावर काढलेला पर्याय यशस्वी झाल्यास जिल्हयÞात इतर ठिकाणीही असेच वाद मिटविले जातील. सध्या पालघर, सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात पर्ससीन, पारंपरिक, यांत्रिकी व परराज्यातील पर्ससीनधारकांमध्ये मासेमारीवरून वाद सुरु आहेत. या वादावरही कायमस्वरूपी तोडगा काढला जाणार आहे. वरिष्ठ स्तरावर बैठक घेऊन कायद्याचा अंमल होईल यादृष्टीने तोडगा काढला जाणार आहे. (प्रतिनिधी)