शहरं
Join us  
Trending Stories
1
हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
3
भूस्खलन होऊन बसवर कोसळली दरड, १८ जणांचा मृत्यू, पण ३ मुलं आश्चर्यकारकरीत्या बचावली  
4
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
5
Bigg Bossचं घर सील, सर्व स्पर्धकांना लवकरच काढणार बाहेर, समोर आलं असं कारण 
6
ICC Womens World Cup 2025 : हेदर नाइटचा हिट शो! इंग्लंडनं बांगलादेशला पराभूत करत भारताला दिला धक्का
7
कस्तुरबा रुग्णालयातील पुस्तक वाटप प्रकरणाला वेगळं वळण, किशोरी पेडणेकरांचा तक्रारदारालाच प्रतिप्रश्न, म्हणाल्या...
8
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
9
अभिषेक शर्मा ICC पुरस्काराच्या शर्यतीत; त्याला कुलदीपसह झिम्बाब्वेचा गडी देणार टक्कर!
10
भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
11
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
13
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
14
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
15
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
16
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
17
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
18
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
19
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
20
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण

पालघरच्या वाढवण बंदराविरोधात मच्छीमारांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 23:47 IST

खासगी उद्योगपतींना फायदा करून देण्यासाठी मच्छीमारांच्या मुळावर उठणारा हा वाढवण बंदर प्रकल्प कदापि होऊ देणार नाही, असा निर्धार मच्छीमार आंदोलकांनी बोलून दाखवला.

मीरा रोड : पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदराच्या विरोधात भाईंदरमधील मच्छीमारांनी केंद्र सरकारचा निषेध करत मंगळवारी आंदोलन केले व बंद पाळला. खासगी उद्योगपतींना फायदा करून देण्यासाठी मच्छीमारांच्या मुळावर उठणारा हा वाढवण बंदर प्रकल्प कदापि होऊ देणार नाही, असा निर्धार मच्छीमार आंदोलकांनी बोलून दाखवला.समुद्रकिनाऱ्यावरील भाईंदरच्या उत्तन, पाली व चौक येथील मच्छीमारांनी बंद पुकारला होता. त्यामुळे या परिसरातील सर्व व्यवहार बंद होते. मच्छीमार आणि कोळी महिला काळे झेंडे आणि केंद्र सरकारच्या निषेधाचे फलक घेऊन आंदोलनात उतरले होते. राज्य सरकार वाढवण बंदराला विरोध करत असताना केंद्राने मात्र ५० टक्के खासगी भागीदारीतून प्रकल्प मंजूर केला आहे. या प्रकल्पाला मच्छीमारांसह शेतकऱ्यांचाही गेल्या १९ वर्षांपासून विरोध सुरू आहे. परंतु मच्छीमार व शेतकऱ्यांच्या विरोधाला न जुमानता पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. मर्जीतील उद्योगपतींना आंदण देण्यासाठी वाढवण प्रकल्पाचा घाट घातला जात असल्याचा आरोप यावेळी चौक मच्छीमार संस्थेचे जॉर्जी गोविंद यांनी केला.मच्छीमार नेते लिओ कोलासो म्हणाले की, वाढवण बंदर ही तर कोळ्यांचे समुद्रकिनारे आणि बंदर गिळंकृत करण्याची ही केंद्राची सुरुवात आहे. स्वाभिमान आणि सन्मानाने जगणाऱ्या मच्छीमारांना उद्योगपतींच्या जंजाळात अडकवून देशोधडीला लावण्याचा हा केंद्र सरकारचा डाव असल्याचा घणाघात कोलासो यांनी केला .बंदर झाल्यावर मोठी जहाजे येतील आणि मासेमारीवर संक्रांत येईल. मोठ्या जहाजांमुळे मासेमारी करता येणार नाही. मोठ्या जहाजांमुळे मच्छीमारांच्या लहान बोटींना अपघाताचा धोका निर्माण होऊन आपल्याला मासेमारी करता येणार नाही, असा आरोप विल्यम गोविंद यांनी केला.