शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

पालघरच्या वाढवण बंदराविरोधात मच्छीमारांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 23:47 IST

खासगी उद्योगपतींना फायदा करून देण्यासाठी मच्छीमारांच्या मुळावर उठणारा हा वाढवण बंदर प्रकल्प कदापि होऊ देणार नाही, असा निर्धार मच्छीमार आंदोलकांनी बोलून दाखवला.

मीरा रोड : पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदराच्या विरोधात भाईंदरमधील मच्छीमारांनी केंद्र सरकारचा निषेध करत मंगळवारी आंदोलन केले व बंद पाळला. खासगी उद्योगपतींना फायदा करून देण्यासाठी मच्छीमारांच्या मुळावर उठणारा हा वाढवण बंदर प्रकल्प कदापि होऊ देणार नाही, असा निर्धार मच्छीमार आंदोलकांनी बोलून दाखवला.समुद्रकिनाऱ्यावरील भाईंदरच्या उत्तन, पाली व चौक येथील मच्छीमारांनी बंद पुकारला होता. त्यामुळे या परिसरातील सर्व व्यवहार बंद होते. मच्छीमार आणि कोळी महिला काळे झेंडे आणि केंद्र सरकारच्या निषेधाचे फलक घेऊन आंदोलनात उतरले होते. राज्य सरकार वाढवण बंदराला विरोध करत असताना केंद्राने मात्र ५० टक्के खासगी भागीदारीतून प्रकल्प मंजूर केला आहे. या प्रकल्पाला मच्छीमारांसह शेतकऱ्यांचाही गेल्या १९ वर्षांपासून विरोध सुरू आहे. परंतु मच्छीमार व शेतकऱ्यांच्या विरोधाला न जुमानता पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. मर्जीतील उद्योगपतींना आंदण देण्यासाठी वाढवण प्रकल्पाचा घाट घातला जात असल्याचा आरोप यावेळी चौक मच्छीमार संस्थेचे जॉर्जी गोविंद यांनी केला.मच्छीमार नेते लिओ कोलासो म्हणाले की, वाढवण बंदर ही तर कोळ्यांचे समुद्रकिनारे आणि बंदर गिळंकृत करण्याची ही केंद्राची सुरुवात आहे. स्वाभिमान आणि सन्मानाने जगणाऱ्या मच्छीमारांना उद्योगपतींच्या जंजाळात अडकवून देशोधडीला लावण्याचा हा केंद्र सरकारचा डाव असल्याचा घणाघात कोलासो यांनी केला .बंदर झाल्यावर मोठी जहाजे येतील आणि मासेमारीवर संक्रांत येईल. मोठ्या जहाजांमुळे मासेमारी करता येणार नाही. मोठ्या जहाजांमुळे मच्छीमारांच्या लहान बोटींना अपघाताचा धोका निर्माण होऊन आपल्याला मासेमारी करता येणार नाही, असा आरोप विल्यम गोविंद यांनी केला.