शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

पालघरच्या वाढवण बंदराविरोधात मच्छीमारांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 23:47 IST

खासगी उद्योगपतींना फायदा करून देण्यासाठी मच्छीमारांच्या मुळावर उठणारा हा वाढवण बंदर प्रकल्प कदापि होऊ देणार नाही, असा निर्धार मच्छीमार आंदोलकांनी बोलून दाखवला.

मीरा रोड : पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदराच्या विरोधात भाईंदरमधील मच्छीमारांनी केंद्र सरकारचा निषेध करत मंगळवारी आंदोलन केले व बंद पाळला. खासगी उद्योगपतींना फायदा करून देण्यासाठी मच्छीमारांच्या मुळावर उठणारा हा वाढवण बंदर प्रकल्प कदापि होऊ देणार नाही, असा निर्धार मच्छीमार आंदोलकांनी बोलून दाखवला.समुद्रकिनाऱ्यावरील भाईंदरच्या उत्तन, पाली व चौक येथील मच्छीमारांनी बंद पुकारला होता. त्यामुळे या परिसरातील सर्व व्यवहार बंद होते. मच्छीमार आणि कोळी महिला काळे झेंडे आणि केंद्र सरकारच्या निषेधाचे फलक घेऊन आंदोलनात उतरले होते. राज्य सरकार वाढवण बंदराला विरोध करत असताना केंद्राने मात्र ५० टक्के खासगी भागीदारीतून प्रकल्प मंजूर केला आहे. या प्रकल्पाला मच्छीमारांसह शेतकऱ्यांचाही गेल्या १९ वर्षांपासून विरोध सुरू आहे. परंतु मच्छीमार व शेतकऱ्यांच्या विरोधाला न जुमानता पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. मर्जीतील उद्योगपतींना आंदण देण्यासाठी वाढवण प्रकल्पाचा घाट घातला जात असल्याचा आरोप यावेळी चौक मच्छीमार संस्थेचे जॉर्जी गोविंद यांनी केला.मच्छीमार नेते लिओ कोलासो म्हणाले की, वाढवण बंदर ही तर कोळ्यांचे समुद्रकिनारे आणि बंदर गिळंकृत करण्याची ही केंद्राची सुरुवात आहे. स्वाभिमान आणि सन्मानाने जगणाऱ्या मच्छीमारांना उद्योगपतींच्या जंजाळात अडकवून देशोधडीला लावण्याचा हा केंद्र सरकारचा डाव असल्याचा घणाघात कोलासो यांनी केला .बंदर झाल्यावर मोठी जहाजे येतील आणि मासेमारीवर संक्रांत येईल. मोठ्या जहाजांमुळे मासेमारी करता येणार नाही. मोठ्या जहाजांमुळे मच्छीमारांच्या लहान बोटींना अपघाताचा धोका निर्माण होऊन आपल्याला मासेमारी करता येणार नाही, असा आरोप विल्यम गोविंद यांनी केला.