शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
3
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
4
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
5
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
6
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
7
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
8
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
9
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
10
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
11
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
12
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
13
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
14
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
15
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
16
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
17
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
18
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
19
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
20
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 

मच्छीमार नौका फुटली

By admin | Updated: April 7, 2016 01:08 IST

बुधवारी पहाटे चारच्या सुमारास मासेमारीहून अर्नाळा बंदरात परत येत असलेल्या मासेमारी नौकेची दिशा जीपीएस सिस्टीम बिघडल्याने चुकल्याने ती खडकावर आदळून अपघात झाला.

विरार : बुधवारी पहाटे चारच्या सुमारास मासेमारीहून अर्नाळा बंदरात परत येत असलेल्या मासेमारी नौकेची दिशा जीपीएस सिस्टीम बिघडल्याने चुकल्याने ती खडकावर आदळून अपघात झाला. या नौकेवर असलेले १७ खलाशी सुखरुप असून नौका मात्र पूर्णपणे मोडल्याने मालकाला मोठे नुकसान सहन करावे लागणार आहे.अर्नाळा गावातील विल्सन पिस्तोल यांच्या मालकीची देवदूत ही मासेमारी नौका १७ खलाशांना घेऊन मासेमारी करून बंदराकडे येत होती. पहाटे चारच्या सुमारास गडद धुके पसरले होते. त्यातच नौकेवरील जीपीएस सिस्टीम बंद पडल्याने नौकेची दिशा चुकली. ही नौका नेमकी रानगाव समुद्रात असलेल्या खडकावर जाऊन आदळली. धडक इतकी जोरात होती की नौका पार मोडून पडली. नौकेवरील सर्व १७ खलाशी सुखरुप रानगाव समुद्रकिनाऱ्यावर आले. अपघाताची खबर मिळताच अर्नाळा बंदरात असलेल्या गस्तीवरील पोलीस स्पीड बोटीने घटनास्थळी पोचले. नौकेलाही समुद्रकिनाऱ्यावर आणण्यात आले. अपघातात नौका पूर्णपणे मोडून पडली असून मालकाला मोठा फटका बसला आहे. दरम्यान, अपघातग्रस्त नौकेचे नुकसान झाल्यास मच्छिमारांना कोणत्याही आर्थिक मदतीची तरतूद नाही. मासेमारी बोट अपघातग्रस्त झाल्यास मालकाला मोठा फटका बसतो. बोट बांधण्यासाठी किमान तीस ते चाळीस लाख रुपये खर्च येतो. पण, अपघातानंतर भरपाई मात्र मिळत नसल्याने एकमेव उदरनिर्वाहाचे साधन गमावून मच्छिमार कुटुंबावर मोठे संकट ओढावते, असे भाजपाचे वसई तालुका अध्यक्ष महेंद्र पाटील यांनी सांगितले.हा धोकादायक खडक नष्ट करण्याची मागणीरानगाव येथे असलेल्या या खडकामुळे अनेक मासेमारी बोटींना अपघात होऊन मोठे नुकसान झाले आहे. तत्कालीन आमदार विवेक पंडित यांनी ६ मे २०१४ रोजी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग जैन यांना पत्र लिहून हा खडक काढण्याची मागणी केली होती. या खडकामुळे मच्छिमारांच्या बोटी अपघातग्रस्त होऊन त्यांचे आर्थिक नुकसान होते. तसेच जिवीत हानी होण्याचा धोकाही पंडित यांनी आपल्या पत्रात व्यक्त केला होता. मात्र, त्यावर बोर्डाकडून कोणतीच कार्यवाही केलेली नाही.अर्नाळा दीपस्तंभाची उंची ६० मीटर करा : अर्नाळा समुद्रकिनारी मासेमारी बोटींना रात्रीच्या वेळी दिशा कळावी यासाठी दिपस्तंभ बांधण्यात आला आहे. मात्र, सध्याच्या दिपस्तंभाची उंची फक्त ३० मीटर आहे. रात्री आणि धुके असताना उंची कमी असल्याने समुद्रात असलेल्या मासेमारी बोटींना दिपस्तंभ दिसून येत नाही. परिणामी अनेकदा दिशा कळत नसल्याने बोटी भरकटत आहेत. यासाठी दिपस्तंभांची उंची वाढवून ती किमान ६० मीटर पर्यंत करण्यात यावी, अशी मागणी पाटील यांनी राज्य सरकारकडे केली आहे.