शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
2
जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा मिळणार? सरन्यायाधीश म्हणाले- पहलगामकडे दुर्लक्ष करू शकत नाही
3
रॉकेट बनले Muthoot Finance कंपनीचे शेअर्स, १० टक्क्यांपेक्षा अधिक तेजी; टार्गेट प्राईजही वाढवली
4
छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणला अजित पवारांनी दिली मोठी जबाबदारी
5
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
6
कर भरण्याचे टेन्शन सोडा! आता फक्त २४ रुपयांमध्ये भरा इन्कम टॅक्स, कोणी आणली खास ऑफर?
7
"4 दिवसांचं युद्ध..."; पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनीही PM शहबाज शरीफ यांच्या मोठ-मोठ्या बढाया, भारताविरोधात काय काय बोलले?
8
Janmashtami 2025: ढाक्कु माकुम ढाक्कु माकुम; 'या' राशींना फळणार गोपाळकाला, काय होणार लाभ?
9
मीरा भाईंदर महापालिकेच्या बनावट जन्म दाखल्याप्रकरणी गुन्हा दाखल, संबंधित महिला बांगलादेशी असल्याचा संशय
10
शाहरुख खानचा 'किंग' पुढे ढकलला, काय आहे कारण? लेकीचा वडिलांसोबत पहिलाच सिनेमा
11
बायडेन यांच्या मुलानं असं काय म्हटलं की ट्रम्पच्या पत्नीला आला भयंकर राग; पाठवली १ अरब डॉलर्सची नोटिस
12
Sawaliya Foods Products shares: लिस्ट होताच IPO नं दिला १००% चा रिटर्न; पहिल्याच दिवशी दुप्पट झाले गुंतवणुकदारांचे पैसे
13
कहानी में कुछ तो गडबड हैं! काँग्रेसचे राज ठाकरेंना ‘नो ऑब्जेक्शन’; उद्धवसेनेचा मार्ग मोकळा?
14
अर्जुन तेंडुलकर-सानिया जोडी जमली! या क्रिकेटर्सप्रमाणे त्याची कारकिर्दही बहरणार का?
15
'लोकशाहीच्या नावाखाली हुकूमशाही आणि दहशतवाद पसरवण्याचा प्रयत्न', RSS चा ट्रम्प यांच्यावर निशाणा
16
Bitcoin नं तोडले सर्व विक्रम; सोनं-चांदी सोडून क्रिप्टोकडे पळाले गुंतवणुकदार
17
Arjun Tendulkar Engagement: अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको सानिया चांडोक काय करते? तिचा व्यवसाय कोणता? जाणून घ्या
18
Himachal Pradesh Cloudburst : हिमाचलमध्ये पावसाचा कहर, किन्नौरमध्ये ढगफुटी; घरे आणि गाड्या गेल्या वाहून, ३२५ रस्ते बंद
19
त्रिशतकी खेळी करणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूने अचानक जाहीर केली निवृत्ती, आता केले अनेक गौप्यस्फोट
20
"पुतिन यांनी युक्रेन युद्ध थांबवलं नाही तर...!"; महत्वाच्या बैठकीपूर्वीच ट्रम्प यांची रशियाला खुली धमकी!

मच्छीमार नौका फुटली

By admin | Updated: April 7, 2016 01:08 IST

बुधवारी पहाटे चारच्या सुमारास मासेमारीहून अर्नाळा बंदरात परत येत असलेल्या मासेमारी नौकेची दिशा जीपीएस सिस्टीम बिघडल्याने चुकल्याने ती खडकावर आदळून अपघात झाला.

विरार : बुधवारी पहाटे चारच्या सुमारास मासेमारीहून अर्नाळा बंदरात परत येत असलेल्या मासेमारी नौकेची दिशा जीपीएस सिस्टीम बिघडल्याने चुकल्याने ती खडकावर आदळून अपघात झाला. या नौकेवर असलेले १७ खलाशी सुखरुप असून नौका मात्र पूर्णपणे मोडल्याने मालकाला मोठे नुकसान सहन करावे लागणार आहे.अर्नाळा गावातील विल्सन पिस्तोल यांच्या मालकीची देवदूत ही मासेमारी नौका १७ खलाशांना घेऊन मासेमारी करून बंदराकडे येत होती. पहाटे चारच्या सुमारास गडद धुके पसरले होते. त्यातच नौकेवरील जीपीएस सिस्टीम बंद पडल्याने नौकेची दिशा चुकली. ही नौका नेमकी रानगाव समुद्रात असलेल्या खडकावर जाऊन आदळली. धडक इतकी जोरात होती की नौका पार मोडून पडली. नौकेवरील सर्व १७ खलाशी सुखरुप रानगाव समुद्रकिनाऱ्यावर आले. अपघाताची खबर मिळताच अर्नाळा बंदरात असलेल्या गस्तीवरील पोलीस स्पीड बोटीने घटनास्थळी पोचले. नौकेलाही समुद्रकिनाऱ्यावर आणण्यात आले. अपघातात नौका पूर्णपणे मोडून पडली असून मालकाला मोठा फटका बसला आहे. दरम्यान, अपघातग्रस्त नौकेचे नुकसान झाल्यास मच्छिमारांना कोणत्याही आर्थिक मदतीची तरतूद नाही. मासेमारी बोट अपघातग्रस्त झाल्यास मालकाला मोठा फटका बसतो. बोट बांधण्यासाठी किमान तीस ते चाळीस लाख रुपये खर्च येतो. पण, अपघातानंतर भरपाई मात्र मिळत नसल्याने एकमेव उदरनिर्वाहाचे साधन गमावून मच्छिमार कुटुंबावर मोठे संकट ओढावते, असे भाजपाचे वसई तालुका अध्यक्ष महेंद्र पाटील यांनी सांगितले.हा धोकादायक खडक नष्ट करण्याची मागणीरानगाव येथे असलेल्या या खडकामुळे अनेक मासेमारी बोटींना अपघात होऊन मोठे नुकसान झाले आहे. तत्कालीन आमदार विवेक पंडित यांनी ६ मे २०१४ रोजी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग जैन यांना पत्र लिहून हा खडक काढण्याची मागणी केली होती. या खडकामुळे मच्छिमारांच्या बोटी अपघातग्रस्त होऊन त्यांचे आर्थिक नुकसान होते. तसेच जिवीत हानी होण्याचा धोकाही पंडित यांनी आपल्या पत्रात व्यक्त केला होता. मात्र, त्यावर बोर्डाकडून कोणतीच कार्यवाही केलेली नाही.अर्नाळा दीपस्तंभाची उंची ६० मीटर करा : अर्नाळा समुद्रकिनारी मासेमारी बोटींना रात्रीच्या वेळी दिशा कळावी यासाठी दिपस्तंभ बांधण्यात आला आहे. मात्र, सध्याच्या दिपस्तंभाची उंची फक्त ३० मीटर आहे. रात्री आणि धुके असताना उंची कमी असल्याने समुद्रात असलेल्या मासेमारी बोटींना दिपस्तंभ दिसून येत नाही. परिणामी अनेकदा दिशा कळत नसल्याने बोटी भरकटत आहेत. यासाठी दिपस्तंभांची उंची वाढवून ती किमान ६० मीटर पर्यंत करण्यात यावी, अशी मागणी पाटील यांनी राज्य सरकारकडे केली आहे.