शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मच्छीमार नौका फुटली

By admin | Updated: April 7, 2016 01:08 IST

बुधवारी पहाटे चारच्या सुमारास मासेमारीहून अर्नाळा बंदरात परत येत असलेल्या मासेमारी नौकेची दिशा जीपीएस सिस्टीम बिघडल्याने चुकल्याने ती खडकावर आदळून अपघात झाला.

विरार : बुधवारी पहाटे चारच्या सुमारास मासेमारीहून अर्नाळा बंदरात परत येत असलेल्या मासेमारी नौकेची दिशा जीपीएस सिस्टीम बिघडल्याने चुकल्याने ती खडकावर आदळून अपघात झाला. या नौकेवर असलेले १७ खलाशी सुखरुप असून नौका मात्र पूर्णपणे मोडल्याने मालकाला मोठे नुकसान सहन करावे लागणार आहे.अर्नाळा गावातील विल्सन पिस्तोल यांच्या मालकीची देवदूत ही मासेमारी नौका १७ खलाशांना घेऊन मासेमारी करून बंदराकडे येत होती. पहाटे चारच्या सुमारास गडद धुके पसरले होते. त्यातच नौकेवरील जीपीएस सिस्टीम बंद पडल्याने नौकेची दिशा चुकली. ही नौका नेमकी रानगाव समुद्रात असलेल्या खडकावर जाऊन आदळली. धडक इतकी जोरात होती की नौका पार मोडून पडली. नौकेवरील सर्व १७ खलाशी सुखरुप रानगाव समुद्रकिनाऱ्यावर आले. अपघाताची खबर मिळताच अर्नाळा बंदरात असलेल्या गस्तीवरील पोलीस स्पीड बोटीने घटनास्थळी पोचले. नौकेलाही समुद्रकिनाऱ्यावर आणण्यात आले. अपघातात नौका पूर्णपणे मोडून पडली असून मालकाला मोठा फटका बसला आहे. दरम्यान, अपघातग्रस्त नौकेचे नुकसान झाल्यास मच्छिमारांना कोणत्याही आर्थिक मदतीची तरतूद नाही. मासेमारी बोट अपघातग्रस्त झाल्यास मालकाला मोठा फटका बसतो. बोट बांधण्यासाठी किमान तीस ते चाळीस लाख रुपये खर्च येतो. पण, अपघातानंतर भरपाई मात्र मिळत नसल्याने एकमेव उदरनिर्वाहाचे साधन गमावून मच्छिमार कुटुंबावर मोठे संकट ओढावते, असे भाजपाचे वसई तालुका अध्यक्ष महेंद्र पाटील यांनी सांगितले.हा धोकादायक खडक नष्ट करण्याची मागणीरानगाव येथे असलेल्या या खडकामुळे अनेक मासेमारी बोटींना अपघात होऊन मोठे नुकसान झाले आहे. तत्कालीन आमदार विवेक पंडित यांनी ६ मे २०१४ रोजी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग जैन यांना पत्र लिहून हा खडक काढण्याची मागणी केली होती. या खडकामुळे मच्छिमारांच्या बोटी अपघातग्रस्त होऊन त्यांचे आर्थिक नुकसान होते. तसेच जिवीत हानी होण्याचा धोकाही पंडित यांनी आपल्या पत्रात व्यक्त केला होता. मात्र, त्यावर बोर्डाकडून कोणतीच कार्यवाही केलेली नाही.अर्नाळा दीपस्तंभाची उंची ६० मीटर करा : अर्नाळा समुद्रकिनारी मासेमारी बोटींना रात्रीच्या वेळी दिशा कळावी यासाठी दिपस्तंभ बांधण्यात आला आहे. मात्र, सध्याच्या दिपस्तंभाची उंची फक्त ३० मीटर आहे. रात्री आणि धुके असताना उंची कमी असल्याने समुद्रात असलेल्या मासेमारी बोटींना दिपस्तंभ दिसून येत नाही. परिणामी अनेकदा दिशा कळत नसल्याने बोटी भरकटत आहेत. यासाठी दिपस्तंभांची उंची वाढवून ती किमान ६० मीटर पर्यंत करण्यात यावी, अशी मागणी पाटील यांनी राज्य सरकारकडे केली आहे.