शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
3
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
4
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
5
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
6
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
7
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
8
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
9
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
10
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
11
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
12
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
13
Bhendwal Bhavishyvani 2025: शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
14
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
15
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
16
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
17
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
18
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
19
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
20
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?

मच्छीमार नौका फुटली

By admin | Updated: April 7, 2016 01:08 IST

बुधवारी पहाटे चारच्या सुमारास मासेमारीहून अर्नाळा बंदरात परत येत असलेल्या मासेमारी नौकेची दिशा जीपीएस सिस्टीम बिघडल्याने चुकल्याने ती खडकावर आदळून अपघात झाला.

विरार : बुधवारी पहाटे चारच्या सुमारास मासेमारीहून अर्नाळा बंदरात परत येत असलेल्या मासेमारी नौकेची दिशा जीपीएस सिस्टीम बिघडल्याने चुकल्याने ती खडकावर आदळून अपघात झाला. या नौकेवर असलेले १७ खलाशी सुखरुप असून नौका मात्र पूर्णपणे मोडल्याने मालकाला मोठे नुकसान सहन करावे लागणार आहे.अर्नाळा गावातील विल्सन पिस्तोल यांच्या मालकीची देवदूत ही मासेमारी नौका १७ खलाशांना घेऊन मासेमारी करून बंदराकडे येत होती. पहाटे चारच्या सुमारास गडद धुके पसरले होते. त्यातच नौकेवरील जीपीएस सिस्टीम बंद पडल्याने नौकेची दिशा चुकली. ही नौका नेमकी रानगाव समुद्रात असलेल्या खडकावर जाऊन आदळली. धडक इतकी जोरात होती की नौका पार मोडून पडली. नौकेवरील सर्व १७ खलाशी सुखरुप रानगाव समुद्रकिनाऱ्यावर आले. अपघाताची खबर मिळताच अर्नाळा बंदरात असलेल्या गस्तीवरील पोलीस स्पीड बोटीने घटनास्थळी पोचले. नौकेलाही समुद्रकिनाऱ्यावर आणण्यात आले. अपघातात नौका पूर्णपणे मोडून पडली असून मालकाला मोठा फटका बसला आहे. दरम्यान, अपघातग्रस्त नौकेचे नुकसान झाल्यास मच्छिमारांना कोणत्याही आर्थिक मदतीची तरतूद नाही. मासेमारी बोट अपघातग्रस्त झाल्यास मालकाला मोठा फटका बसतो. बोट बांधण्यासाठी किमान तीस ते चाळीस लाख रुपये खर्च येतो. पण, अपघातानंतर भरपाई मात्र मिळत नसल्याने एकमेव उदरनिर्वाहाचे साधन गमावून मच्छिमार कुटुंबावर मोठे संकट ओढावते, असे भाजपाचे वसई तालुका अध्यक्ष महेंद्र पाटील यांनी सांगितले.हा धोकादायक खडक नष्ट करण्याची मागणीरानगाव येथे असलेल्या या खडकामुळे अनेक मासेमारी बोटींना अपघात होऊन मोठे नुकसान झाले आहे. तत्कालीन आमदार विवेक पंडित यांनी ६ मे २०१४ रोजी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग जैन यांना पत्र लिहून हा खडक काढण्याची मागणी केली होती. या खडकामुळे मच्छिमारांच्या बोटी अपघातग्रस्त होऊन त्यांचे आर्थिक नुकसान होते. तसेच जिवीत हानी होण्याचा धोकाही पंडित यांनी आपल्या पत्रात व्यक्त केला होता. मात्र, त्यावर बोर्डाकडून कोणतीच कार्यवाही केलेली नाही.अर्नाळा दीपस्तंभाची उंची ६० मीटर करा : अर्नाळा समुद्रकिनारी मासेमारी बोटींना रात्रीच्या वेळी दिशा कळावी यासाठी दिपस्तंभ बांधण्यात आला आहे. मात्र, सध्याच्या दिपस्तंभाची उंची फक्त ३० मीटर आहे. रात्री आणि धुके असताना उंची कमी असल्याने समुद्रात असलेल्या मासेमारी बोटींना दिपस्तंभ दिसून येत नाही. परिणामी अनेकदा दिशा कळत नसल्याने बोटी भरकटत आहेत. यासाठी दिपस्तंभांची उंची वाढवून ती किमान ६० मीटर पर्यंत करण्यात यावी, अशी मागणी पाटील यांनी राज्य सरकारकडे केली आहे.