शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

ठाण्यात पहिला कल अकरा वाजता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 23:29 IST

अंतिम निकालासाठी रात्र : लकी ड्रॉ काढून व्हीव्हीपॅट मोजणी; मतमोजणी केंद्रांत रंगीत पडदे

ठाणे : ठाणे लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी सकाळी ८ वाजता सुरू झाली तरी पहिल्या फेरीचा निकाल येण्यास ११ वाजतील. त्यानंतर संपूर्ण निकाल जाहीर होण्यास किमान १२ तास लागतील. म्हणजे या वेळी लोकसभा निकाल जाहीर होण्यास रात्र होईल, अशी कबुली निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांनी दिली.

प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील पाच मतदान केंद्रांवरील व्हीव्हीपॅटच्या मोजणीला एक तास लागणार आहे. उमेदवारांच्या प्रतिनिधींसमोर लकी ड्रॉ काढून व्हीव्हीपॅटच्या मतदान केंद्रांची निवड केली जाणार असल्याचे पवार यांनी सांगितले.

स्ट्राँगरूममधून ईव्हीएम मशीन आणणारा शिपाई, कर्मचारी यांनी त्यांच्या विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणी टेबलवर जाऊन बसावे म्हणून त्यांना ज्या रंगाचे टीशर्ट दिले आहेत. त्याच रंगाचे पडदे त्या विधानसभा मतमोजणी बॅरेकला लावण्यात आलेले आहे.

ठाणे लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी घोडबंदर रोडवरील कावेसरच्या आनंद नगरमधील न्यू. होरयझन स्कॉलर्स स्कूल येथे २३ मे रोजी होणार आहे. तब्बल ११ लाख ६७ हजार २६५ मतांची मोजणी सकाळी ८ वाजल्यापासून होणार आहे. या ठाणे लोकसभा मतदारसंघात २३ लाख ७० हजार २७३ मतदारांपैकी ११ लाख ६७ हजार २६५ (४९.२५ टक्के) मतदान झाले आहे. यामध्ये सहा लाख ४७ हजार ४७१ पुरुष व पाच लाख १९ हजार ७७९ महिला मतदारांचा समावेश आहे. या वेळी पाच हजार २८३ टपाली मतदानापैकी आतापर्यंत तीन हजार २२३ टपाली मतदान प्राप्त झाले. सेना दलाच्या ६३० पैकी २३२ मते प्राप्त झाली. पोस्टाने येणारे मतदान २३ मे रोजी ७.५९ वाजेपर्यंत स्वीकारले जाणार आहे.

ऐरोलीकरिता तब्बल ३३ फेऱ्यांत मोजणीमीरा-भार्इंदर विधानसभेच्या ४२७ मतदान केंद्रांची तर ओवळा माजिवडा विधानसभेच्या ४३२ मतदान केंद्रांची मतमोजणी ३१ फेऱ्यांमध्ये पूर्ण होईल.कोपरी पाचपाखाडीतील ३७२ मतदान केंद्रांवरील मतमोजणी २७ फेºयांमध्ये तर ठाणे विधानसभेची २८ फेºयांमध्ये मतमोजणी होईल, ऐरोलीच्या ४५२ मतदान केंद्रांची मतमोजणी ३३ फेºयांमध्ये होईल आणि बेलापूरच्या ३८६ मतदान केंद्रांची मतमोजणी २८ फेºयांमध्ये पूर्ण होणार असल्याचेही पवार यांनी सांगितले.

८४ टेबलवर मतमोजणीमतमोजणी केंद्रांत एक हजार ४०० अधिकारी कर्मचारी तैनात आहेत. प्रत्येक विधानसभेच्या मतमोजणीच्या ठिकाणी दोन सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत.सहा विधानसभा मतदारसंघांची मतमोजणी ८४ टेबलवर होणार आहे. प्रत्येक विधानसभेच्या २०० मतांसह सहा विधानसभेच्या एक हजार २०० मतांची एक फेरी यानुसार मतमोजणीची घोषणा केली जाणार आहे.या मतमोजणी केंद्रांतील कर्मचाºयांचे प्रशिक्षण २२ मेला पुन्हा एकदा प्रशिक्षण होईल आणि मतमोजणीच्या दिवशी पहाटे ५ वाजता शेवटचे प्रशिक्षण होईल.मतमोजणी केंद्रांच्यावर असलेल्या स्ट्राँगरुममध्ये २७ सीसीटीव्ही कॅमेरे असून मतमोजणी केंद्रांमध्ये ३६ सीसीटीव्ही कॅमेºयांच्या निगराणीत मतमोजणी केली जाणार आहे. या वेळी केंद्रीय निवडणूक आयोगाने शैलेश किसनानी व संतोष कुमार माल या केंद्रीय निरीक्षकांना नियुक्त केले आहेत. चोख पोलीस बंदोबस्तात मतमोजणी होईल. तब्बल ७३० पोलीस अधिकारी व सीआरपीएफच्या ३० जवानांची व एसआरपीएफच्या ३० जवानाची तुकडी या मतमोजणी केंद्रावर तैनात आहे.

भिवंडीत मांडण्यात येणार ८४ टेबललोकमत न्यूज नेटवर्कभिवंडी : भिवंडी लोकसभा निवडणुकीचा निकाल समजण्यासाठी मतदारांना मध्यरात्रीपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. मतमोजणी व इतर तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करून अधिकृत निकालाला रात्री उशीर होईल, अशी माहिती भिवंडी लोकसभा निवडणूक निर्णय अधिकारी किसन जावळे यांनी मंगळवारी सायंकाळी पत्रकार परिषदेत दिली.भिवंडी तालुक्यात एलकुंदे गावातील प्रेसिडेन्सी हायस्कूलमध्ये मतमोजणी सकाळी आठ वाजता सुरू होणार आहे. त्यामुळे पहाटे पाचपासून मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहतील. कपिल पाटील (भाजप), सुरेश टावरे (काँग्रेस),डॉ.अरूण सावंत(वंचित बहुजन आघाडी) यांच्यासह पंधरा उमेदवार रिंगणात होते. सहा विधानसभा मतदारसंघासाठी प्रत्येकी १४ टेबलप्रमाणे एकूण ८४ टेबल मांडण्यात येणार आहेत.सर्वात कमी फेºया भिवंडी पूर्व विधानसभा क्षेत्राच्या २१ होणार आहेत. तर सर्वात जास्त फेºया मुरबाड विधानसभा क्षेत्राच्या ३५ होणार आहेत. त्याचप्रमाणे कल्याण पश्चिमच्या ३२, तर भिवंडी पश्चिम, भिवंडी ग्रामीण व शहापूर यांच्या प्रत्येकी २५ फेºया होतील. सहा विधानसभा मतदारसंघातून प्रत्येकी ५ अशा ३० व्हीव्हीपॅड मशीनच्या मतांची मोजणी होईल तसेच मतांच्या आकड्यांची बरोबरी तपासली जाईल, अशी माहिती जावळे यांनी दिली.सर्वप्रथम टपाली व सेवा कर्मचाºयांच्या मतांची मोजणी होईल. मतमोजणीसाठी सुमारे ४५० अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. त्यामध्ये १०२ मतमोजणी सुपरवायझर, १०२ सूक्ष्म निरीक्षक व १५० सिलिंग कर्मचाºयांचा समावेश आहे. मतमोजणी केंद्राजवळ अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडक बंदोवस्त ठेवला असून केंद्र व राज्य राखीव सुरक्षा दलासह सुमारे ४०० पोलीस अधिकारी कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.