शहरं
Join us  
Trending Stories
1
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
2
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
3
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
4
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
5
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
6
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
7
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
8
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
9
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
10
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
11
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
12
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
13
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
14
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
15
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
16
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
17
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
18
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
19
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
20
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."

आधी स्वबळावर खुर्ची मिळवा; मगच लोकांना शब्द द्या!

By admin | Updated: February 16, 2017 05:30 IST

दुसऱ्यांच्या भरवशावर खुर्ची मिळवणाऱ्या माणसाने शब्द द्यायचा नसतो. आधी स्वत:च्या बळावर सत्ता मिळवा आणि मग लोकांना शब्द द्या,

ठाणे : दुसऱ्यांच्या भरवशावर खुर्ची मिळवणाऱ्या माणसाने शब्द द्यायचा नसतो. आधी स्वत:च्या बळावर सत्ता मिळवा आणि मग लोकांना शब्द द्या, असा टोला मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना मारला. दिवा येथील जाहीर सभेत ते बोलत होते.भाजपा-सेनेसह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचाही त्यांनी या वेळी समाचार घेतला. भाजपा-सेनेच्या राज्यात मराठी माणसांचे मुंबईत बेहाल झाले. मुंबईत अनधिकृत इमारतींचे जाळे आहे. परंतु, जिथे मराठी माणसे राहतात, तिथेच कारवाई करण्याची हिंमत दाखवली जाते. परप्रांतीयांच्या मतांवर त्यांचा डोळा आहे. म्हणूनच जुहू येथील प्रचारसभेत मुख्यमंत्र्यांनी हिंदीत भाषण केल्याचा आरोप ठाकरे यांनी केला. अनधिकृत इमारती उभारणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांवर नावाला गुन्हे दाखल केले जातात. ते जामिनावर लगेच सुटतात. पण मराठी माणूस बेघर होतो. या मराठीजनांना घराबाहेर काढणारे नतद्रष्ट दुर्दैवाने आपलेच आहेत. काँग्रेस-राकाँने जे केले, तोच कित्ता भाजपा-सेना गिरवत असल्याचा आरोपही त्यांनी केला. शासकीय आकडेवारीनुसार ठाणे जिल्ह्यात परप्रांतीयांची लोकसंख्या दररोज वाढतेय. परप्रांतीयांना वाढू देणाऱ्या लाचारांच्या हातातच येथील महापालिकांची सत्ता आहे. ठाण्यात सर्व प्रमुख पक्षांचे नेते बांधकाम व्यवसायात आहेत. येथील अनधिकृत इमारती त्यांच्याच नावे असल्याचा स्पष्ट आरोप ठाकरेंनी केला. दिव्यातील डम्पिंग ग्राउंडच्या प्रश्नावर मनसेने आंदोलन केल्यानंतर आयुक्तांनी तीन महिन्यांत प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले. मुख्यमंत्री मात्र हाच प्रश्न सोडवण्यासाठी एक वर्षाची मुदत मागतात. डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न योग्य पद्धतीने नाशिक महापालिकेने सोडवला असल्याचा दावा त्यांनी या वेळी केला. दिवा आणि ठाण्यातील स्थानिक प्रश्नांनाही त्यांनी हात घातला. गेली २५ वर्षे ठाण्याची सत्ता भाजपा-सेनेच्या हाती होती. त्यांच्याच राजवटीत येथील समस्या आणि अनधिकृत बांधकामे वाढल्याचा आरोप ठाकरे यांनी केला.भाजपाकडून अपमानास्पद वागणूक मिळते, म्हणून उद्धव ठाकरे पाठिंबा काढण्याची धमकी देतात. वास्तविक, त्यांचा अपमान दररोज होत आहे. शिवस्मारकाच्या जलपूजनासाठी आलेल्या पंतप्रधानांनी उद्धव ठाकरेंकडे ढुंकूनही पाहिले नव्हते. आता आणखी अपमान सहन होण्याची ते वाट बघत आहेत का, असा सवाल त्यांनी केला. नोटाबंदीबाबत बोलताना ठाकरे यांनी हा प्रयोग फसल्याचा आरोप केला. म्हणूनच, आता पंतप्रधान या विषयावर बोलण्याचे टाळत असल्याचा आरोप ठाकरे यांनी केला. (प्रतिनिधी)