शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
5
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
6
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
7
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
8
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
9
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
10
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
11
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
12
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
13
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
14
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
15
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
16
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
17
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
18
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
19
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
20
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य

आधी दंड भरा, नंतर मूळ रक्कम स्वीकारू

By admin | Updated: March 17, 2017 06:14 IST

ठाणे महापालिकेने यंदापासून अभय योजना बंद केल्याने थकबाकीदारांचे धाबे चांगलेच दणाणले आहे.

ठाणे : ठाणे महापालिकेने यंदापासून अभय योजना बंद केल्याने थकबाकीदारांचे धाबे चांगलेच दणाणले आहे. पालिकेने मार्चअखेरपर्यंत करवसुलीसाठी विशेष मोहीम हाती घेतली असून थकबाकीदारांची यादी त्या त्या प्रभाग समिती क्षेत्रात बॅनरद्वारे जाहीर केली आहे. थकबाकीदारांकडून वसुलीसाठी नाना शकली लढवल्या जात आहेत. परंतु, अभय योजना बंद झाल्याने दंडाची रक्कम कशी भरायची, असा पेच या थकबाकीदारांना सतावू लागला आहे. पालिकेने मात्र आधी दंडाची रक्कम भरा, असाच पवित्रा घेतल्याने थकबाकीदार हवालदिल झाले आहेत. ठामपा क्षेत्रात जकातीपाठोपाठ एलबीटीदेखील बंद झाली आहे. त्यामुळे इतर उत्पन्नाच्या स्रोतांकडून वसुली करण्यासाठी पालिकेने कंबर कसली आहे. त्यानुसार, मालमत्ताकर विभागाला यंदा ४५६ कोटींचे लक्ष्य दिले असून आतापर्यंत ३१५ कोटी वसूल झाल्याची माहिती पालिकेच्या संबंधित विभागाने दिली. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही रक्कम २० कोटींपेक्षा अधिक आहे. महापालिका निवडणूक लागल्याने वसुलीवर परिणाम झाल्याचेही बोलले जात आहे. परंतु, आता शिल्लक दिवसांत प्रत्येक विभागाला टार्गेट देण्यात आले असून वसूल न झाल्यास संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांवरही कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे प्रत्येक विभाग कामास लागला आहे. यात मालमत्ताकर विभागाने ३५० अधिकारी, कर्मचाऱ्यांचा ताफा जुंपला असून पहिल्या टप्प्यात मोठ्यांच्या गळ्याला फास आवळण्याचे काम सुरू झाले आहे. मोठ्यांकडून वसुली झाली, तर छोटे थकबाकीदारदेखील मालमत्ताकर आपोआप भरतील, असा विश्वास पालिकेला आहे. त्यानुसार, जे अधिकचे थकबाकीदार आहेत, त्यांची यादी वृत्तपत्रांत प्रसिद्ध करतानाच प्रभाग समितीनिहायदेखील यादी लावण्यात आली आहे. शिवाय, बॅण्डबाजा बारातीचा फॉर्म्युलादेखील आजमावणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले. नोटिसा बजावूनही रक्कम न भरल्यास अशांच्या मालमत्ता सील करण्याची कारवाई सुरू झाली आहे. २०१५-१६ मध्ये मालमत्ताकराच्या वसुलीसाठी अभय योजना लागू केली होती. परंतु, दंडाची रक्कम फारशी पालिकेला वसूल करता आली नव्हती. त्यामुळेच यंदा ही योजनाच लागू नसल्याचे पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी गेल्या वर्षीच स्पष्ट केले होते. त्यानुसार, ही योजना बंद झाल्याने पालिकेने आपले लक्ष्य दंडाच्या रकमेवर केंद्रित केले आहे. त्यामुळे आता मूळ रक्कम भरायची की दंड, असा पेच थकबाकीदारांना सतावू लागला आहे. (प्रतिनिधी)