शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

ठाणे जिल्ह्यातील बारावीच्या ९२९४४ विद्यार्थ्यांचा उद्या पहिला इंग्रजीचा पेपर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 17:30 IST

कला, वाणिज्य, विज्ञान आणि एमसीव्हीसी आदी शाखेचे ९२ हजार ९४४ विद्यार्थ्यांचा इंग्रजी हा पहिला पेपर आहे. सकाळी ११ ते दुपारी २ वाजे दरम्यान जिल्ह्यातील सुमारे १५८ परीक्षा केंद्रावर ही परीक्षा घेतली जात आहे.

ठळक मुद्दे जिल्ह्यातील सुमारे १५८ परीक्षा केंद्रावर ही परीक्षाचार भरारी पथक तैनात करण्यात आले कला, वाणिज्य, विज्ञान आणि एमसीव्हीसी आदी शाखेचे ९२ हजार ९४४ विद्यार्थ्यांचा इंग्रजी हा पहिला पेपर

ठाणे : बारावीच्या बोर्डाची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. कला, वाणिज्य, विज्ञान आणि एमसीव्हीसी आदी शाखेचे ९२ हजार ९४४ विद्यार्थ्यांचा इंग्रजी हा पहिला पेपर आहे. सकाळी ११ ते दुपारी २ वाजे दरम्यान जिल्ह्यातील सुमारे १५८ परीक्षा केंद्रावर ही परीक्षा घेतली जात आहे.यंदा २० मार्चपर्यंत चालणा-या या परीक्षेसाठी विज्ञान शाखेचे ३२ हजार ४८ विद्यार्थी आहेत. याशिवाय कला शाखेचे १५ हजार ३४२, वाणिज्य शाखेचे ४४५४१ आणि एमसीव्हीसीचे एक हजार १३ आदी जिल्ह्याभरातील ९२ हजार ९४४ विद्यार्थी बारावीची ही परीक्षा देत आहेत. या परीक्षेसाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी १३ कस्टडी सेंटर आहेत. १५८ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी चोक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.परीक्षा केंद्रांवर कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये यासाठी चार भरारी पथक तैनात करण्यात आले आहे. ठिकठिकाणच्या केंद्रावर व्हीडीओ चित्रिकरणासाठी देखील खास पथक तैनात आहे. शिक्षणाधिकारी प्राथमिक, शिक्षणाधिकारी माध्यमिक, निरंतन शिक्षणाधिकारी आणि उपशिक्षणाधिकारी यांचे चार भरारी पथक जिल्ह्याभरात तैनात करण्यात आली आहेत. जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या परीक्षा केंद्रांवर चोक पोलिस बंदोबस्त करण्यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे.

टॅग्स :thaneठाणेcollectorतहसीलदार