शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

देशातील पहिला ब्राउनफिल्ड प्रकल्प, हक्काच्या घराचे स्वप्न क्लस्टरमुळे होणार पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 03:30 IST

धोकादायक इमारतीत जीव मुठीत धरून राहणाऱ्या लाखो ठाणेकरांचे स्वत:च्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होण्याचा मार्ग क्लस्टरमुळे अखेरीस खुला झाला

ठाणे : धोकादायक इमारतीत जीव मुठीत धरून राहणाऱ्या लाखो ठाणेकरांचे स्वत:च्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होण्याचा मार्ग क्लस्टरमुळे अखेरीस खुला झाला असून या योजनेमुळे ठाण्याचा चेहरामोहरा बदलणार असून देशातील पुनर्विकासाचा हा सर्वात मोठा ब्राउनफिल्ड प्रकल्प ठरणार असल्याचे प्रतिपादन ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.क्लस्टर डेव्हलपमेंटच्या प्रकल्पाचे सविस्तर सादरीकरण बुधवारी त्यांच्या उपस्थितीत करण्यात आले. धोकादायक इमारती कोसळून निष्पाप जीवांचे नाहक बळी जाण्याचे प्रकार ठाण्यात वारंवार घडत होते. लक्षावधी नागरिक जीव मुठीत धरून या इमारतींमध्ये राहतात. त्यांना हक्काचे सुरक्षित घर मिळावे, यासाठी मागील १४ वर्षे लढा सुरू होता. विधिमंडळातदेखील धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाचा मुद्दा वारंवार उपस्थित करून ठाण्यासाठी क्लस्टर डेव्हलपमेंट योजना लागू करण्याची मागणी केली होती.विधिमंडळाचे कामकाज अनेकदा बंद पाडले. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना विधिमंडळाच्या पायºयांवर घेराव घातला. प्रसंगी निलंबनही पत्करले. ठाणे ते विधिमंडळ असा ठाणेकरांचा भव्य मोर्चा काढला, ज्यात स्वत: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सहभागी झाले होते.या प्रदीर्घ लढ्यानंतर २०१४ साली विधानसभा निवडणुकांपूर्वी तत्कालीन आघाडी सरकारने ठाण्यासाठी क्लस्टर योजना मंजूर केली. परंतु, त्या योजनेत अनेक त्रुटी होत्या. त्या आता दूर करण्यात आल्या आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेच्या माध्यमातून सोशल इम्पॅक्ट असेसमेंट अहवाल सादर केला. महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. त्यानंतर, न्यायालयाने हिरवा कंदील दाखवल्यानंतर राज्य सरकारने ठाण्यासाठी सुधारित क्लस्टर योजनेची अधिसूचना जारी केली.त्यानुसार, ठाण्यासाठी तिचा आराखडा तयार केला असल्याचे त्यांनी सांगितले. क्लस्टर योजनेतून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येतील आणि ठाण्याच्या सौंदर्यात आणखी भर पडेल, असेही ते म्हणाले.>तलावही घेणार मोकळा श्वासदेशातील पुनर्विकासाचा हा सर्वात मोठा ब्राउनफिल्ड प्रकल्प असणार आहे, असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही, असेही त्यांनी सांगितले.क्लस्टरमुळे शहरातील ग्रीन झोन्स, अ‍ॅमिनिटीत वाढ होणार असून वाहतूककोंडी दूर करण्यासाठी प्रशस्त रस्तेदेखील उपलब्ध होणार आहेत. तसेच, अतिक्र मणे झालेल्या तलावांनाही मोकळा श्वास घेता येणार आहे. कारण, त्यांचेही सुशोभीकरण करण्यात येणार आहे.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदे