शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

फटाकाबंदीमुळे आली 550 दुकानांवर संक्रांत; प्रदूषण रोखण्यासाठी महापालिका सावध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2020 23:33 IST

ठाणे मनपा हद्दीत दरवर्षी २५० च्या आसपास स्टॉलला परवानगी दिली जाते.

ठाणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हरित लवादानेच वाढते प्रदूषण रोखण्यासाठी दिल्लीसह १८ शहरांमध्ये फटाके वाजविण्यास बंदी केली आहे. यामध्ये ठाणे कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगरसह बदलापूरचादेखील समावेश आहे. कोरोनाचे संकट लक्षात घेऊन ठाणे महापालिकेने आधीच फटाके स्टॉलला परवानगी नाकारली आहे. यामुळे ठाण्यासह, कल्याण डोंबिवली आणि उल्हासनगरमध्ये सुमारे ५५० स्टॉलवर संक्रांत आली आहे.

कोरोनाचा आजार श्वसनाशी संबंधित असल्यामुळे अशा रुग्णांना फटाक्यांच्या प्रदूषणाचा त्रास होण्याचा दावा समाज माध्यमांवर केला जात असून ठाण्यातील काँग्रेस पक्षाने दिवाळीत फटाकेविक्री आणि वाजविण्यास बंदी घालण्याची मागणी केली होती. मुंबई महापालिकेने त्यानुसार फटाकेबंदी केली आहे. परंतु, ठाण्यासह जिल्ह्यातील इतर महापालिकांनी तशी कोणतेही पावले उचलली नव्हती. आता वाढते प्रदूषण रोखण्यासाठी दिल्लीसह देशातील अनेक शहरांमध्ये ९ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून सर्व प्रकारच्या फटक्यांची विक्री व फटाके वाजविण्यावर राष्ट्रीय हरित लवादाने बंदी घातली असून ती ३० नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहणार आहे.

ठाणे मनपा हद्दीत दरवर्षी २५० च्या आसपास स्टॉलला परवानगी दिली जाते. परंतु, यंदा महापालिकेने तशी प्रक्रियाच सुरू न केल्याने एकही अर्ज पालिकेकडे आलेला नाही. त्यामुळे महापालिकेचा भार हलका झाला आहे. परंतु, कोपरीत कित्येक वर्षांपासूनची फटाकेविक्रीची दुकाने मात्र सुरूच राहणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले आहे.

दुसरीकडे उल्हासनगरमध्ये मात्र पालिकेची परवानगी न घेताच रस्त्यांवर फटाके विक्रीची स्टॉल उभारले आहेत. या स्टॉलवर आता पालिकेला कारवाई करावी लागणार आहे. एकूणच ठाण्यासह, कल्याण डोंबिवली आणि उल्हासनगर भागात दरवर्षी लागणारे ५५० च्या आसपास फटाके विक्रीचे स्टॉल यंदा मात्र लागणार नसल्याचेच दिसत आहे. त्यामुळे ठाणेकरांची दिवाळी यंदा हवाप्रदूषण आणि ध्वनिप्रदूषणमुक्त साजरी होणार आहे.

टॅग्स :thaneठाणे