शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड! आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये, बंद दाराआड चर्चा?
2
लोकसभेत दारुण पराभव, मग विधानसभेत दमदार 'कमबॅक' कसा? महायुतीच्या नेत्याने सांगितलं गुपित
3
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
4
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू
5
बाबा ताजुद्दीन उरूस: नागपूर रेल्वे स्थानकावर कडेकोट बंदोबस्त; सुरक्षा यंत्रणा, प्रशासन सज्ज
6
महापालिका उमेदवारीची सर्वाधिक स्पर्धा भाजपमध्ये; आताच ५०० पेक्षा अधिक इच्छुकांची यादी तयार
7
पडळकरांना सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा दिल्याने त्यांच्यात सुधारणा - नीलम गोऱ्हे
8
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
9
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
10
वहिनीच्या अवतीभवती फिरायचा दीर, 'त्या' दिवशी हाताला धरून तिला घरी आणलं अन् कहरच केला...
11
Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!
12
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
13
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
14
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई
15
Electric Scooter: ओला, टीव्हीएस, बजाजसाठी धोक्याची घंटा, बाजारात येतेय रेट्रो स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर!
16
सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा
17
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!
18
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
19
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
20
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...

बसगाड्यांना लागणाऱ्या आगीला प्रशासनच जबाबदार

By admin | Updated: August 11, 2016 03:58 IST

केडीएमटीच्या बसना वारंवार लागणाऱ्या आगीच्या घटनांना प्रशासनच जबाबदार असल्याचा आरोप परिवहन सभापती भाऊसाहेब चौधरी यांनी केला

कल्याण : केडीएमटीच्या बसना वारंवार लागणाऱ्या आगीच्या घटनांना प्रशासनच जबाबदार असल्याचा आरोप परिवहन सभापती भाऊसाहेब चौधरी यांनी केला आहे तर महापौर राजेंद्र देवळेकर यांनी या घटनांची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने अहवाल सादर करा, असे आदेश प्रशासनाला दिले आहेत.गणेशघाट आगारातून बाहेर पडलेल्या बसला २९ जुलैला आग लागल्याची घटना ताजी असतानाच सोमवारी कल्याण बस आगारात केडीएमटीच्या आणखीन एका बसला आग लागल्याची घटना घडली. चालक आणि वाहकांनी वेळीच प्रसंगावधान दाखवल्याने आगीचे प्रमाण फारसे वाढले नाही. इंजीनच्या वायरमध्ये शॉर्टसर्कीट झाल्याने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनांना कार्यशाळा व्यवस्थापक अनंत कदम जबाबदार आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करा, अशी मागणी परिवहन सदस्यांच्या वतीने परिवहन व्यवस्थापक देवीदास टेकाळे आणि आयुक्त ई. रवींद्रन यांच्याकडे केली. आग लागलेल्या दोन्ही बस आयशर कंपनीच्या आहेत. वारंवार घडलेल्या घटना पाहता कंपनीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. या सर्व घटनांना तत्कालीन प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप सभापती चौधरी यांनी केला आहे. या कंपनीच्या २० बसेस उपक्रमाकडे आहेत. बस खरेदीआधी २ सप्टेंबर २०१३ रोजी इंदौर येथे या बसेस पाहणी करण्यासाठी परिवहनचे सदस्य गेले होते. त्या बाहेरून योग्य वाटत असल्या तरी उपक्रमात दाखल होण्याआधी त्याचे स्ट्रक्चर बॉडी इनस्पेक्शन सदस्यांच्या समक्ष होणे आवश्यक असल्याकडे लक्ष वेधले होते. यासंदर्भात तत्कालीन महाव्यवस्थापक सुधीर राऊत यांना पत्रही पाठविले होते. परंतु त्याची दखल न घेता त्या बस सेवेत दाखल केल्याने आजची परिस्थिती उदभवली आहे.