शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: लखनौच्या अडचणीत वाढ, दुखापतीमुळं मयांक यादव आयपीएलमधून बाहेर!
2
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा
3
Shiv Sena: पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील संशयितांची माहिती देणाऱ्याला १० लाख रुपयांचे बक्षीस
4
भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!
5
बिहार दौऱ्यात राहुल गांधी यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल, पोलिसांनी शंभराहून अधिक जणांना केलं आरोपी
6
India Pakistan Ceasefire: "भारत-पाकिस्तान यांच्यात १८ मेपर्यंत शस्त्रसंधी"; पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री डार यांचे विधान
7
आधी ट्रम्प यांच्यावर भडकली, नंतर पोस्ट डिलीट; कंगना म्हणाली, "जेपी नड्डांनी डिलीट करायला सांगितली"
8
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
9
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
10
सुटी रद्द झाल्याने कामावर परतणाऱ्या मेजरवर काळाचा घाला; डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू, लेक गंभीर जखमी
11
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
12
'गदर'मधला दरम्यान सिंग आठवतोय का? एका आजारामुळे झालं होत्याचं नव्हतं, अभिनेत्याचा झाला दुर्देवी शेवट
13
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
14
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
15
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
16
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
17
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
18
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग
19
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
20
Shahapur: डोंगरावरून उडणारा ड्रोन अचानक कोसळला अन् गावात उडाली खळबळ; तो ड्रोन कोणाचा?

ज्येष्ठांचे आर्थिक गणित कोलमडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 06:33 IST

निवृत्त झाल्यानंतर मिळणारी रक्कम ज्येष्ठ नागरिक बँकेत ठेवतात. त्यावर मिळणाºया व्याजावर त्यांचा महिन्याचा घर खर्च चालतो. मात्र, व्याज दरात रिझर्व्ह बँकेने कपात केल्याने त्याचा फटका ज्येष्ठांना बसला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : निवृत्त झाल्यानंतर मिळणारी रक्कम ज्येष्ठ नागरिक बँकेत ठेवतात. त्यावर मिळणाºया व्याजावर त्यांचा महिन्याचा घर खर्च चालतो. मात्र, व्याज दरात रिझर्व्ह बँकेने कपात केल्याने त्याचा फटका ज्येष्ठांना बसला आहे. त्यांचे महिन्याचे आर्थिक गणितच कोलमडल्याने व्याजदर वाढवावा, अशी मागणी ‘फेसकॉमने रिझर्व्ह बँकेकडे केली आहे.ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नांवर ‘फेसकॉम’ काम करते. संघटनेचे रमेश पारखे म्हणाले, देशभरात सध्या २० कोटी ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यापैकी ११ टक्केच ज्येष्ठांनाच पेन्शन मिळते. उर्वरित ८९ टक्के पेन्शनविना आहेत. त्यापैकी काही ज्येष्ठ नागरिक हे खाजगी कंपन्यांतून निवृत्त झाले आहेत. निवृत्तीनंतर त्यांना भविष्य निर्वाह निधी व ग्रॅच्युटीपोटी काही रक्कम मिळाली आहे. ती त्यांनी बँकांमध्ये ठेवली असून, त्यावर त्यांना व्याज मिळते. त्या रकमेतून त्यांचा घरखर्च चालतो. ६० वर्षांपुढील बहुतांश ज्येष्ठांना रक्तदाब, मधुमेहासारखे आजार असतात. त्यामुळे व्याजाच्या रक्कमेतून जवळपास दोन ते तीन हजार रुपये औषधांवर तर उर्वरित रक्कमेतून जेवण-खाणे, घराचे पाणी व विजेचे बील, घराचा देखभाल-दुरुस्तीचा खर्च करावा लागतो, असे ते म्हणाले.एका ज्येष्ठ नागरिकाला महिन्याला किमान आठ हजार रुपये इतका खर्च असतो. अनेक ज्येष्ठांनी सहकारी बँकांमध्ये साडेनऊ टक्के व्याज दर मिळत असल्याने तेथे ठेवी ठेवल्या. मात्र, तीन वर्षांत रिझर्व्ह बँकेने हळूहळू व्याजाच्या ठेवीवरील व्याजदर कमी केले आहेत. त्याचा फटका ज्येष्ठांना बसला आहे. त्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. एका ज्येष्ठ नागरिकाला वर्षाला १५ ते २५ हजार रुपयांचा फटका बसला आहे, असे पारखे यांनी निदर्शनास आणले आहे.टपाल विभागाने मासिक उत्पन्न योजनेवरील व्याजदरातही अर्धा टक्क्याने घट केली आहे. त्यासाठी ‘फेसकॉम’ने रिझर्व्ह बँकेकडे पाठपुरावा सुरू केला आहे. कमी केलेले व्याज दर पुन्हा वाढवावेत, असे म्हटले आहे. या शिवाय शेतमजूर, नाका कामगार, मजूर यांना उतार वयात हाताला काम मिळत नाही. त्यांच्या शरीरातील शक्ती क्षीण होते. त्यांच्या हाताला काम मिळाले नाही की ते आर्थिकदृष्ट्या निराधार होतात. अशा शेतमजूर, मजुरी करणाºयांना पेन्शन योजना लागू करण्याची मागणी त्यांनी केली. त्यांना दरमहा जगण्यापुरते पैसे मिळावे, याचा विचार केंद्राने करण्याची गरज पारखे यांनी व्यक्त केली आहे.तीन वर्षांपासून प्रक्रियाया संदर्भात अर्थतज्ज्ञ विलास देसाई म्हणाले, रिझर्व्ह बँकेने व्याजाचा दर एका दिवसात कमी केलेला नाही. गेल्या दोन वर्षांत तो ०.७५ टक्के या प्रमाणात कमी होत गेला आहे. व्याज दर कमी करण्याची प्रक्रिया तीन वर्षांपासून सुरू आहे. आर्थिक मंदीमुळे रिझर्व्ह बँकेने हे धोरण स्वीकारले आहे. काही ठिकाणी तो दोन ते अडीच टक्के कमी झाला आहे.