शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
5
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
6
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
7
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
8
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
9
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
10
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
11
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
12
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
13
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
14
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
15
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
16
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
17
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
18
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
19
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
20
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?

ज्येष्ठांचे आर्थिक गणित कोलमडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 06:33 IST

निवृत्त झाल्यानंतर मिळणारी रक्कम ज्येष्ठ नागरिक बँकेत ठेवतात. त्यावर मिळणाºया व्याजावर त्यांचा महिन्याचा घर खर्च चालतो. मात्र, व्याज दरात रिझर्व्ह बँकेने कपात केल्याने त्याचा फटका ज्येष्ठांना बसला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : निवृत्त झाल्यानंतर मिळणारी रक्कम ज्येष्ठ नागरिक बँकेत ठेवतात. त्यावर मिळणाºया व्याजावर त्यांचा महिन्याचा घर खर्च चालतो. मात्र, व्याज दरात रिझर्व्ह बँकेने कपात केल्याने त्याचा फटका ज्येष्ठांना बसला आहे. त्यांचे महिन्याचे आर्थिक गणितच कोलमडल्याने व्याजदर वाढवावा, अशी मागणी ‘फेसकॉमने रिझर्व्ह बँकेकडे केली आहे.ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नांवर ‘फेसकॉम’ काम करते. संघटनेचे रमेश पारखे म्हणाले, देशभरात सध्या २० कोटी ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यापैकी ११ टक्केच ज्येष्ठांनाच पेन्शन मिळते. उर्वरित ८९ टक्के पेन्शनविना आहेत. त्यापैकी काही ज्येष्ठ नागरिक हे खाजगी कंपन्यांतून निवृत्त झाले आहेत. निवृत्तीनंतर त्यांना भविष्य निर्वाह निधी व ग्रॅच्युटीपोटी काही रक्कम मिळाली आहे. ती त्यांनी बँकांमध्ये ठेवली असून, त्यावर त्यांना व्याज मिळते. त्या रकमेतून त्यांचा घरखर्च चालतो. ६० वर्षांपुढील बहुतांश ज्येष्ठांना रक्तदाब, मधुमेहासारखे आजार असतात. त्यामुळे व्याजाच्या रक्कमेतून जवळपास दोन ते तीन हजार रुपये औषधांवर तर उर्वरित रक्कमेतून जेवण-खाणे, घराचे पाणी व विजेचे बील, घराचा देखभाल-दुरुस्तीचा खर्च करावा लागतो, असे ते म्हणाले.एका ज्येष्ठ नागरिकाला महिन्याला किमान आठ हजार रुपये इतका खर्च असतो. अनेक ज्येष्ठांनी सहकारी बँकांमध्ये साडेनऊ टक्के व्याज दर मिळत असल्याने तेथे ठेवी ठेवल्या. मात्र, तीन वर्षांत रिझर्व्ह बँकेने हळूहळू व्याजाच्या ठेवीवरील व्याजदर कमी केले आहेत. त्याचा फटका ज्येष्ठांना बसला आहे. त्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. एका ज्येष्ठ नागरिकाला वर्षाला १५ ते २५ हजार रुपयांचा फटका बसला आहे, असे पारखे यांनी निदर्शनास आणले आहे.टपाल विभागाने मासिक उत्पन्न योजनेवरील व्याजदरातही अर्धा टक्क्याने घट केली आहे. त्यासाठी ‘फेसकॉम’ने रिझर्व्ह बँकेकडे पाठपुरावा सुरू केला आहे. कमी केलेले व्याज दर पुन्हा वाढवावेत, असे म्हटले आहे. या शिवाय शेतमजूर, नाका कामगार, मजूर यांना उतार वयात हाताला काम मिळत नाही. त्यांच्या शरीरातील शक्ती क्षीण होते. त्यांच्या हाताला काम मिळाले नाही की ते आर्थिकदृष्ट्या निराधार होतात. अशा शेतमजूर, मजुरी करणाºयांना पेन्शन योजना लागू करण्याची मागणी त्यांनी केली. त्यांना दरमहा जगण्यापुरते पैसे मिळावे, याचा विचार केंद्राने करण्याची गरज पारखे यांनी व्यक्त केली आहे.तीन वर्षांपासून प्रक्रियाया संदर्भात अर्थतज्ज्ञ विलास देसाई म्हणाले, रिझर्व्ह बँकेने व्याजाचा दर एका दिवसात कमी केलेला नाही. गेल्या दोन वर्षांत तो ०.७५ टक्के या प्रमाणात कमी होत गेला आहे. व्याज दर कमी करण्याची प्रक्रिया तीन वर्षांपासून सुरू आहे. आर्थिक मंदीमुळे रिझर्व्ह बँकेने हे धोरण स्वीकारले आहे. काही ठिकाणी तो दोन ते अडीच टक्के कमी झाला आहे.