शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
3
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
4
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
5
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
6
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
7
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
8
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
10
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
11
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
12
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
13
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
14
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
16
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
17
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
18
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
19
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
20
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!

जलद लोकलमुळे प्रवाशांना आर्थिक भुर्दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 00:52 IST

अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी; धिमी लोकल सोडण्याची मागणी

ठाणे : उपनगरी लोकल सध्या फास्ट ट्रॅकवरच धावत आहेत. त्यामुळे काही स्टेशनवर उतरणाºया प्रवाशांना पुढील दोन ते तीन स्टेशनपर्यंत जावे लागते. त्यानंतर पुन्हा मागे येण्यासाठी या कर्मचारी, अत्यावश्यक सेवेच्या प्रवाशांना रिक्षाभाड्याचा मनमानी आर्थिक भुर्दंडाला तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे त्यांच्यात तीव्र नाराजी व्यक्त होत असून, त्यांनी धीमी लोकलची मागणी केली आहे.अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सेवा सुरू आहे. मात्र, त्या जलद ट्रॅकवरून धावत असल्यामुळे कळवा, मुंब्रा, कोपर, ठाकुर्ली स्टेशनवर त्या थांबत नाहीत. त्यामुळे तेथे राहणाºया कर्मचाºयांना एक ते दोन स्टेशन पुढे उतरावे लागत आहे. यासारखी गंभीर स्थिती कसारा, बदलापूरकडे जाणाºया प्रवाशांना सहन करावी लागत आहे. विठ्ठलवाडी, उल्हासनगर या स्टेशनवरही लोकल थांबत नाहीत. याप्रमाणेच शहाडसह त्यापुढील स्टेशनलाही न थांबता थेट टिटवाळा स्टेशनवर लोकल थांबत आहे. त्यामुळे कर्मचाºयांना आर्थिक भुर्दंड बसत आहे.आर्थिकदृष्ट्या कमकुवत कर्मचारी रिक्षाभाड्याच्या रोजच्या रोख रकमेच्या समस्येमुळे तीव्र नाराज आहे. या प्रवाशांत अत्यावश्यक सेवेतील काही कंत्राटी कर्मचारी आहेत तर काही कर्मचारी आधीच कर्जाने जर्जर झालेले आहेत.सावकारांकडून कर्जाच्या हप्त्याची वसुलीकोरोनामुळे अनेकांना पूर्ण वेतनही मिळत नाही. जे मिळते ते वेतनही घरापर्यंत काही कर्मचाºयांना नेता येत नाही. वेतन घेताच बाजूला उभे असलेले सावकार ते कर्जाच्या हप्त्यापोटी घेऊन टाकत असल्याचे त्रस्त कर्मचाºयांनी सांगितले. त्यातच महिन्याचे पूर्ण दिवस भरण्यासाठी या कर्मचारी वर्गास रोजच्या रिक्षाभाड्याच्या रोख रकमेला तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे ते नाराज आहेत.

टॅग्स :central railwayमध्य रेल्वे