शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

अखेर उत्तन समुद्रकिनारी साफसफाईसाठी नेमले पथक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:45 IST

मीरारोड : शहरातील सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी महापालिकेची असताना पालिका मात्र जबाबदारी झटकत असल्याचे वृत्त लोकमतने २४ जुलै ...

मीरारोड : शहरातील सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी महापालिकेची असताना पालिका मात्र जबाबदारी झटकत असल्याचे वृत्त लोकमतने २४ जुलै रोजी उत्तन समुद्रकिनाऱ्यावरील कचऱ्याबाबत दिले होते. त्याची दखल घेऊन महापालिका आयुक्तांनी येथील दैनंदिन स्वच्छतेसाठी १० कर्मचाऱ्यांचे पथक नेमले आहे.

शहरातील सार्वजनिक समुद्र व खाडीकिनारे, तलाव आदी नियमित स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी मीरा-भाईंदर महापालिकेची आहे. परंतु, महापालिका मात्र आपली जबाबदारी टाळत आली होती. लोकमतने उत्तन समुद्र किनाऱ्यावर सततच्या अस्वच्छतेच्या साम्राज्याबाबत महापालिका जबाबदारी टाळत असल्याचे वृत्त जुलै व ऑगस्टमध्ये दिले होते. २४ जुलैच्या वृत्तानंतर महापालिकेने साफसफाईची जबाबदारी घेतल्याचे सांगितले होते.

आमदार गीता जैन यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस उत्तन समुद्र किनारा स्वच्छता मोहीम राबवून साजरा केला होता, तर स्थानिक नगरसेविका शर्मिला गंडोली यांनी ६ ऑगस्ट रोजी आयुक्तांना पत्र देऊन अतिरिक्त सफाई व सुरक्षा कर्मचारी पुरवण्याची मागणी केली होती. किनारा सफाई मोहीम राबवणाऱ्या फॉर फ्युचर इंडिया, सोशल शेड या संस्थेच्या तरुणांनीसुद्धा किनारा नियमित स्वच्छतेसाठी अपेक्षा व्यक्त केली होती. अखेर आयुक्त दिलीप ढोले यांनी उत्तन समुद्र किनाऱ्याच्या दैनंदिन स्वच्छतेसाठी नऊ कर्मचारी व देखरेखीसाठी एक निरीक्षक असे दहा जणांचे पथक नेमले आहे.

उत्तन-पाली भागातील समुद्र किनारा पर्यटकांसह शहरातील नागरिकांचे निसर्गाच्या सानिध्यात विरंगुळ्यासाठीचे महत्त्वाचे ठिकाण आहे. उत्तन किनारी लोकांची गर्दी असते. आता महापालिकेने उत्तन समुद्र किनारा स्वच्छतेची जबाबदारी घेतल्याने येथील किनारे नियमित स्वच्छ राहतील. स्थानिक मच्छीमारही स्वच्छतेबाबत अधिक जागरूक राहून परिसर स्वच्छ व आरोग्यदायी ठेवण्यात पुढाकार घेणार आहेत.