शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

अखेर उल्हासनगरात अभय योजना लागू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 05:15 IST

उल्हासनगर : येथील नागरिक मालमत्ता कर भरत नसल्याने पालिकेचे नुकसान होत आहे. यामुळे पालिकेने अखेर अभय योजना जाहीर केली. ...

उल्हासनगर : येथील नागरिक मालमत्ता कर भरत नसल्याने पालिकेचे नुकसान होत आहे. यामुळे पालिकेने अखेर अभय योजना जाहीर केली. योजना दोन टप्प्यात असून, १८ फेब्रुवारी ते ७ मार्च या कालावधीत मालमत्ता कर भरणाऱ्यांना ८० टक्के, तर ८ ते ३१ मार्चदरम्यान कर भरणाऱ्यांना ५० टक्के व्याज माफ होणार आहे. नागरिकांनी अभय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी उपमहापौर भगवान भालेराव यांनी केले आहे.

उल्हासनगरातील नागरिकांना कोरोना काळात दिलासा देण्यासाठी महापौर लीलाबाई अशान, उपमहापौर भालेराव यांनी पुढाकार घेऊन मालमत्ता कर विभागासाठी अभय योजना लावण्याचे संकेत यापूर्वी दिले होते. बुधवारी महासभा सुरू होण्यापूर्वी महापौर, उपमहापौर, आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांनी पत्रकार परिषद घेऊन दोन टप्प्यातील अभय योजना जाहीर केली. ३१ मार्चअखेर वसुलीचे १०० कोटींचे लक्ष्य ठेवल्याची माहिती नगरसेवक अरुण अशान यांनी दिली. मालमत्ता कर विभागाची एकूण थकबाकी ५२० कोटींपेक्षा जास्त असून, १ लाख ७७ हजार एकूण मालमत्ताधारक आहेत. कोरोना काळात मालमत्ता कर वसुली कमी झाली असली, तरी मार्च महिन्याअखेर लक्ष्य गाठू, असा विश्वास व्यक्त केला.

कोरोना काळात नागरिकांना दिलासा देण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी महासभेत प्रस्ताव आणला होता. मालमत्ता कर विभागाचे कर निर्धारक संचालक जेठानंद करमचंदानी म्हणाले की, जास्तीत जास्त वसुली होण्यासाठी जनजागृती केेली जाणार आहे. तसेच एका खासगी कंपनीकडून मालमत्तेचे सर्वेक्षण सुरू आहे.

चौकट

कंपनीला सहापैकी दोन दिले

महापालिकेने शहरातील मालमत्तेचे पुनसर्वेक्षण करण्याचे कंत्राट क्लोर्बो नावाच्या कंपनीला दिले आहे. मालमत्ता सर्वेक्षणानंतर उत्पन्नात दुप्पट वाढ होईल, असे अरुण अशान यांनी सांगितले. मार्चनंतर मालमत्ता सर्वेक्षणावर महापालिका भर देणार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. सर्वेक्षणापोटी कंपनीला सहा कोटींपैकी दोन कोटी सहा लाख दिल्याचे बोलले जात आहे.