शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
2
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
3
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
4
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
5
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
6
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
7
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
8
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...
9
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
10
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
11
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
12
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
13
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
14
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
15
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
16
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
17
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
18
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
19
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
20
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!

ताडी व्यवसायाला अखेरची घरघर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2020 23:57 IST

सर्वच सत्ताधाऱ्यांनी व्यापारीकरणाचे धोरण राबविल्याने हा व्यवसाय आता उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर

- हितेन नाईकपालघर : अल्पभूधारक व बेरोजगार असलेल्या भंडारी समाजाच्या परंपरागत ताडी व्यवसायाला आता अखेरची घरघर लागली आहे. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी ताडी व्यवसाय खुला करून या समाजाच्या उदरनिर्वाहाच्या साधनासह सहकार्याची बीजे घट्ट रोवली होती, परंतु नंतर सर्वच सत्ताधाऱ्यांनी व्यापारीकरणाचे धोरण राबविल्याने हा व्यवसाय आता उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. यामुळे अन्यायाविरोधात मोर्चे-आमरण उपोषणाद्वारे उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा अध्यक्ष विजय राऊत यांनी दिला आहे.पालघर जिल्ह्यातील डहाणू ते एडवण या भागात राहणाऱ्या भंडारी समाजाचा शेती हा प्रमुख व्यवसाय असला तरी शेतीव्यतिरिक्त खाजरी-माडावरून निघणाऱ्या ताडी विक्रीचा जोडधंदा हा समाज अनेक वर्षांपासून करीत आला आहे. १९६८ सालापासून ताडी व्यवसायाला सुरुवात होत आज सहकारी संस्थांच्या माध्यमातून हा शेतीपूरक व्यवसाय सुरू ठेवला असताना शासनाच्या ताडी विक्री परवान्याबाबतच्या बदलत्या धोरणाचा फटका सहकारी संस्थांना बसून धनदांडग्यांचा शिरकाव या व्यवसायात सुरू झाला आहे. परप्रांतीय व्यावसायिकांना शिरकाव करून देताना शासनाचे बदलते धोरण स्थानिक भंडारी व्यावसायिकांना उद्ध्वस्त करीत आहे. परिणामी, अधिक उत्पन्न मिळविण्याच्या नावाखाली शरीराला पोषक असणाऱ्या या पेयाचे डुप्लिकेशन करून या व्यवसायाला बदनाम करण्याचा प्रयत्न काही परप्रांतीय व्यापाऱ्यांकडून केला जात असल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे आंदाेलनाचा इशारा दिला आहे.या धंद्यापासून भंडारी समाजास सारले जात आहे दूरया धंद्यापासून भंडारी समाज दूर सारला जाऊ लागला असून सहकारी संस्था हळूहळू बंद पडू लागल्या आहेत. पालघर जिल्ह्यात सुरू असलेल्या ४० संस्थांपैकी सातपाटी, वडराई, माहीम येथील फक्त तीन सहकारी संस्था मागील काही वर्षांपासून तग धरून हा व्यवसाय वाचविण्याचा खटाटोप करीत असल्याचे अध्यक्ष विजय राऊत यांनी ‘लोकमत’ला सांगितले. २०१२ पासून तत्कालीन राज्यमंत्री व विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांच्यापासून ते विद्यमान पालकमंत्री दादासाहेब भुसे अशा डझनभर मंत्र्यांना आतापर्यंत निवेदने देण्यात आल्यानंतरही भंडारी समाजाच्या समस्या आजही जैसे थे आहेत.