शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
2
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
3
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
4
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
5
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
6
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
7
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
8
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
9
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
10
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
11
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
12
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

अंतिम टप्यातील आवास योजनेच्या घरांना सरकारने तत्परतेने मान्यता देण्याची गरज - पडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2020 18:33 IST

येथील राम गणेश गडकरी रंगायतनमध्ये दि.ठाणे डिस्ट्रीक को. आॅपरेटिव्ही हौसिंग फेडरेशनतर्फे गृहनिर्माण संस्थांसाठी मार्गदर्शन मेळावा रविवारी घेण्यात आला. त्याप्रसंगी फडणवीस ठाण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर खासदार विनय सहस्त्रबुध्दे, आमदार संजय केवळकर, भाजपा शहर अध्यक्ष व आमदार निरंजन डावखरे आणि फेडरेशनचे अध्यक्ष सिताराम राणे आदी उपस्थित होते.

ठळक मुद्दे* आपण वरच्या मजल्याची आशा धरून बसलो नाही -महाविकास आघाडी सरकारमधील धूसमुस सुरू यावेळी चव्हाट्यावर वरच्या मजला मलाच पाहिजे अशा प्रकारचा आडमुठ्ठेपणाही सुरू

ठाणे : प्रधानमंत्री आवास योजनेचे ठाणे परिसरासह भिवंडी रोडवरील एक लाख घरांचा प्रकल्प आणि वसई-विरार परिसरात अनेक प्रकल्पांव्दारे सामान्य माणसाला घरे मिळणे शक्य आहे. या योजनेच्या अंतिमटप्यातील या प्रस्तावांवर सरकारने लवकरच निर्णय घेण्याची गरज आहे.त्यामुळे या घरांचा लोकाना मोठ्याप्रमाणात लाभ घेता येणार आहे. यासाठी आपण शासनाशी बोलणार असल्याचे सुतोवाच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.     येथील राम गणेश गडकरी रंगायतनमध्ये दि.ठाणे डिस्ट्रीक को. आॅपरेटिव्ही हौसिंग फेडरेशनतर्फे गृहनिर्माण संस्थांसाठी मार्गदर्शन मेळावा रविवारी घेण्यात आला. त्याप्रसंगी फडणवीस ठाण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर खासदार विनय सहस्त्रबुध्दे, आमदार संजय केवळकर, भाजपा शहर अध्यक्ष व आमदार निरंजन डावखरे आणि फेडरेशनचे अध्यक्ष सिताराम राणे आदी उपस्थित होते. यावेळी फडणवीस म्हणाले की ठाणे लोकसख्या वाढत आहे. त्यासाठी ‘इज आॅफ लिव्हींग’साठी दीड ते दोन वर्षांच्या परिश्रमातून क्लस्टर योजनेचा निर्णय ठाण्यातील जुन्या इमारतींसाठी घेतल्याचे ही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. पंतप्रधान आवास योजनेच्या लाभासाठी ठाणे जिल्ह्यातून एक लाखघरांचे प्रस्ताव आले आहे. त्यासाठी ठाणे, भिवंडी रोडवरील या एक लाख घरांच्या प्रकल्पास आणि वसई - विरार परिसरातील अनेक प्रकल्पावर शासनाने लवकरच निर्णय घेण्याची अपेक्षा आहे. या घरांच्या योजना आता अंतिम टप्यात आहे. त्यातील घरांचा लाभ सामान्य माणसाला मोठ्याप्रमाणात होणार आहे. इतर गोष्टीना या सरकारने स्थगीती दिली आहे. पण या घरांच्या प्रकल्पाला स्थगीती मिळालेली नसल्यामुळे सरकारने त्यास वेगाने मान्यता देऊन सामान्य जनतेला घरांचा लाभ करून द्यावा, अशी अपेक्षा ही त्यांनी यावेळी व्यक्त केली.* आपण वरच्या मजल्याची आशा धरून बसलो नाही -     या नवीन सरकारमधील वरचा मजला मलाच पाहिजे आशा आडमुठ्ठे प्रकाराविषयी सहस्त्रबुध्दे यांनी यावेळी चर्चा केली. त्यावर फडणवीस म्हणाले की कुठला मजला कोणी घेतला याची मला चिंता नाही. वरचा मजला मला कधी मिळेल यांची आशा घेऊन मी बसलेला नाही. आपल्याला त्याची काळजी करण्याचे कारण नाही. आपण जनतेच्या कोर्टात जाणारे लोक आहोत. जनताही सुप्रिम आहे. त्यांच्या आधारावर चालणार आहे. जनतेचे वकील म्हणून आपण ताकदीने त्यांच्या समस्या या सरकार पुढे मांडून पूर्ण करणार आहोत. काळजीचे कारण नसल्याचेही त्यांनी यावेळी सत्तेविषयी बोलताना स्पष्ट केले. तर स्वयं पुनर्विकास धोरणाची देखील अंमलबजावणी होईपर्यंत आपण शांत बसणार नसल्याचेही त्यांनी गृहनिर्माण संस्थांच्या मार्गदर्शनास अनुसरून स्पष्ट केले.* सरकारचे नाव न घेता सहस्त्रबुध्दे म्हणाले की, जनादेशाच्या जमिनीवरील ईमारतीत दुसरा-तिसराच कोणी घुसतो आणि ती बळकवतो. वैचारिकतेचा विचार न करता इमारत चकचकीत असल्याचे केवळ भासवली जात आहे. पण तीन - चार महिन्यात या भूसभुसीत जमिनीवरील ईमारत आता खिळखिळी झाली आहे. ज्या जनादेशाची जमीन आहे, त्या मुळमालकाला ती मिळावी आणि तसा संपूर्णपणे पुनर्विकास राजकारणातही व्हावा, ही जनतेच्या मनातील इच्छा असल्याचे सांगून त्यांनी नाव न घेता महाविकास आघाडी सरकारमधील धूसमुस सुरू यावेळी चव्हाट्यावर आणली. वरच्या मजला मलाच पाहिजे अशा प्रकारचा आडमुठ्ठेपणाही सुरू असल्याचे सहस्त्रबुध्दे यांनी सरकारचे नाव न घेता सांगितले.      * ट्रकच्या वाहतूक कोंडीतून मुक्त करण्याचे प्रयत्न - ट्रक वाहतुकीमुळे ठाणे शहर व जिल्ह्यात होत असलेली वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी रेल्वे व जेएनपीटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठका घेतल्या जात असल्याचेही सहस्त्रबुध्दे यांनी स्पष्ट करून आजही रेल्वेच्या अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली असल्याचे सुतोवाच त्यांनी केले. तर जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाच्या दृष्टीकोणातून आर्किटेक्चर कॉलेजेसच्या अभ्यास क्रमात त्यांचा समावेश करणेही शक्य असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट करून केंद्र सरकारच्या माध्यमातून आपण त्यासाठी प्रयत्न करण्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस