शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
5
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
6
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
7
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
8
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
9
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
10
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
11
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
12
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
13
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
14
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
15
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
16
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
17
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
18
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
19
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
20
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका

एनआरसी कंपनीतील दगडफेकीबाबत कामगारांवरच गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:40 IST

कल्याण : आंबिवली मोहने येथील एनआरसी कंपनीच्या आवारातील कामगार वसाहतीतील पाडकाम सुरू असताना अदानी समूहाच्या सुरक्षा रक्षक आणि पोलिसांवर ...

कल्याण : आंबिवली मोहने येथील एनआरसी कंपनीच्या आवारातील कामगार वसाहतीतील पाडकाम सुरू असताना अदानी समूहाच्या सुरक्षा रक्षक आणि पोलिसांवर संतप्त जमावाने केलेल्या दगडफेकीत अदानी समूहाचे सुरक्षा रक्षक जखमी झाल्याबाबत सुमारे ६० कामगारांच्या विरोधात खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कंपनीत अंतर्गत सुरक्षा व्यवस्था पाहणारे हरेश्वर पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, कंपनीच्या वसाहतीमधील घरांमध्ये काही लोक बेकायदेशीर राहत असून त्यांना घरे रिकामी करण्याच्या नोटिसा बजाविण्याकरिता १३ सुरक्षा रक्षकांसह अन्य सुरक्षा विभागाचे अधिकारी गेले असता त्यांना कामगारांच्या जमावाने विरोध केला. या वेळी सुरक्षा रक्षकांच्या गाडीवर संतप्त कामगारांनी दगडफेक केली. या दगडफेकीत सुरक्षा रक्षक जखमी झाले. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी फरीदा पठाण, प्राजक्ता कुळधरण, माधुरी आव्हाड, राजेश त्रिपाटी, आशा पाटील यांच्यासह ६० जणांच्या विरोधात दगडफेक केल्याचा गुन्हा दाखल केला. अदानी उद्योग समूहाच्या प्रवक्त्याने सांगितले की, अंतर्गत सुरक्षा रक्षकांकडून दगडफेक केली गेली नसून माधुरी आव्हाड या कामगारांनी केलेल्या दगडफेकीत जखमी झाल्या आहेत.

........

वाचली.