शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

भिवंडीत शांतताक्षेत्र केवळ कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 04:06 IST

पोलीस, पालिकेचे दुर्लक्ष : कर्कश हॉर्नमुळे नागरिकांना त्रास

भिवंडी : पर्यावरण विभागाने पालिका क्षेत्रात १६ शांतता क्षेत्रांची घोषणा केवळ कागदावर जाहीर केली असून त्या ठिकाणी पालिकेने शांतातक्षेत्र दर्शविणारे फलकही लावलेले नाहीत. तसेच या क्षेत्रात पोलीस किंवा पालिका कर्मचाऱ्यांकडून शांतता भंग करणाºयांवर कारवाईही झालेली नाही.

नागरी वस्तीत कर्कश हॉर्न वाजविले जात असल्याने नागरिक बेजार झाले आहेत. उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे महापालिकेने १६ शांतता क्षेत्राची यादी जाहीर केली. त्यात दिवाणी व फौजदारी न्यायालय, इंदिरा गांधी स्मृती रूग्णालय,चाविंद्रा रोड पालिका शाळा, ममता रूग्णालय, एसएनडीटी कॉलेज कल्याणरोड, महापालिका शाळा क्र. ४६ पोलीस लाईन, सरकारी तंत्रनिकेतन(आयटीआय),पद्मश्री आण्णासाहेब जाधव शाळा, शेट जुगीलाल पोद्दार शाळा, बी.एन.एन.कॉलेज, पी.टी.हायस्कूल, ओसवाल शाळा,कान्हा चौधरी शाळा,जयराम सखाराम टावरे शाळा, गुरूकृपा रूग्णालय, पीली शाळा (निजामपूर) यांचा समावेश आहे. त्यापैकी काही शांतता क्षेत्र हे शांततेच्या ठिकाणीच आहेत. उच्च न्यायालयाने शांतता क्षेत्र जाहीर करण्याची जबाबदारी महापालिका प्रशासनाकडे दिली होती. परंतु प्रशासनाकडून त्याचे पालन न झाल्याने शांतता क्षेत्र जाहीर करण्याची जबाबदारी राज्य सरकारने स्वत:कडे घेतली. शहरात वंजारपाटी नाका ते कल्याणरोड या मार्गावर न्यायालयासह, रूग्णालय व सरकारी कार्यालये आहेत. असे असताना या मार्गावर नेहमी मोर्चे-आंदोलने होऊन घोषणा दिल्या जातात. तसेच या मार्गावर होणाºया वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक हॉर्न वाजवून शांतता भंग करतात.मात्र आजतागायत कुणावरही पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही. त्याचप्रमाणे शहरात अनेक राजकीय पक्षांना बाईकरॅली काढण्यास परवानगी दिली जाते. त्या बाईकरॅली पोलीस ठाण्यासमोरून कर्कश हॉर्न वाजवत जातात. त्यांना पोलीस आवर घालत नाही.वाचनालय परिसरात गोंगाटच्शांतता क्षेत्र जाहीर करताना टिळक वाचन मंदिर व डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाकडे पालिकेने पूर्णत: दुर्लक्ष केले आहे.च्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या अभ्यासिका आहेत. सर्वच वाचनालयाच्या परिसराचा शांतता क्षेत्रात समावेश करा अशी मागणी होत आहे.

टॅग्स :Bhiwandiभिवंडी