शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत अपेक्षेप्रमाणे रंगणार बहुरंगी लढती

By admin | Updated: May 13, 2017 00:36 IST

वेगवेगळ््या पक्षांच्या उमेदवारांनी गुरूवारी अर्ज मागे घेतल्यानंतर भिवंडीच्या निवडणुकीत बहुरंगी लढती होतील, हे स्पष्ट झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कभिवंडी : वेगवेगळ््या पक्षांच्या उमेदवारांनी गुरूवारी अर्ज मागे घेतल्यानंतर भिवंडीच्या निवडणुकीत बहुरंगी लढती होतील, हे स्पष्ट झाले. मात्र पालिकेच्या वेगवेगळ््या कार्यलयांतील आणि मुख्यालयातील समन्वयाच्या अभावामुळे नेमक्या किती उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आणि त्यामुळे प्रत्यक्ष रिंगणात किती उमेदवार उरले, याचा नेमका आकडा समजू शकला नाही. पालिका निवडणुकीत काँग्रेस ६४, भाजपा ६३, शिवसेना ५७, समाजवादी पार्टी- राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे ७०, एमआयएमचे ९, कोणार्क विकास आघाडीचे २२, भिवंडी डेव्हलपमेंट फ्रन्टचे १३ आणि आरपीआय एकतावादीचे ४ उमेदवार रिंगणात आहेत. शिवाय इतर छोटे पक्ष, अपक्ष रिंगणात असल्याने ही लढत बहुरंगी होणार हे स्पष्ट होते. काँग्रेसने महापौरपदाचा उमेदवार जाहीर केलेला नाही. पण आम्ही या शर्यतीतून मागे हटणार नाही, अशी भूमिका प्रदेश सरचिटणीस प्रदीप पप्पू रांका यांनी घेतली. त्याचवेळी समाजवादी पक्ष आणि राष्ट्रवादी आघाडीनेही महापौर आमचाच होईल, असा दावा केला आहे. भाजपाविरोधात एकासएक लढत व्हावी यासाठी वोगवेगळ््या पक्षांमध्ये चर्चा झाली असली, तरी त्यासाठी कोणीही माघार घेतली नसल्याचे गुरूवारी स्पष्ट झाले. भाजपाविरोधाचा अजेंडा शिवसेना, काँग्रेस, समाजवादी पक्ष, राष्ट्रवादी, एमआयएम या सर्वांनी राबवला आहे. त्यामुळे भाजपा आणि कोणार्क आघाडीने समझोता केला असला, तरी त्यांच्याविरोधात तुल्यबळ लढत होईल, असा या पक्षांचा प्रयत्न आहे. अर्थात या पक्षांनाही फाटाफुटीचे ग्रहण लागले आहे. समाजवादी पक्षातील फुटीरांना काँग्रेसने स्थान दिले आहे. तर समाजवादी पक्ष, राष्ट्रवादीने आपली गळती रोखण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले आहेत. भाजपाचे निरीक्षक दाखल -संघ परिवार आणि कार्यकर्त्यांचा विरोध असतानाही नवभाजपावादी नेत्यांनी कोणार्क आघाडीशी युती लादल्याने भाजपा कार्यकर्ते आणि संघ परिवारातील स्वयंसेवक, परिवारातील इतर संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी नाराज होऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पंतप्रधान कार्यालय आणि राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याकडे लेखी तक्कारी केल्या. एसएमएस पाठवले. त्याची दखल घेत नेमकी परिस्थिती पाहण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून शिष्टमंडळ पाठवण्यात आले आहे. ते या युतीच्या फायद्या-तोट्याची माहिती घेतील. तसेच जमेल तेथे नाराजांची समजूत काढतील. कोणार्क विकास आघाडी २२ जागा लढवत असून तेथे भाजपाने उमेदवार दिले नसले, तरी त्या उमेदवारांना मत न देण्याचा निर्णय निष्ठावंतांनी जाहीर केला आहे. त्या उमेदरवारांविरोधात मत देऊ किंवा ‘नोटा’चा वापर करू, असे त्यांनी आधीच जाहीर केले आहे. त्यामुळे या युतीसाठी पुढाकार घेणाऱ्या नवभाजपवाद्यांत खळबळ उडाली आहे.