शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
3
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
4
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
5
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
7
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
8
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
9
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
10
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
11
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
12
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
13
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
14
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
15
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
16
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
17
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
18
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
19
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
20
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  

बदलत्या हवामानाचा डोक्याला ‘ताप’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:28 IST

कल्याण : कोरोनाचे सावट कायम असताना दुसरीकडे बदलत्या हवामानामुळे शहरात ताप, सर्दी, खोकला या आजारांचे रुग्ण आढळून येत आहेत. ...

कल्याण : कोरोनाचे सावट कायम असताना दुसरीकडे बदलत्या हवामानामुळे शहरात ताप, सर्दी, खोकला या आजारांचे रुग्ण आढळून येत आहेत. ही लक्षणे कोरोनासारखी असल्याने संबंधित रुग्णांनी याकडे दुर्लक्ष न करता खबरदारी म्हणून कोरोना चाचणी करून घ्यावी, जेणेकरून पुढील धोका टाळता येईल, असा मोलाचा सल्ला केडीएमसीच्या वैद्यकीय आरोग्य विभागासह तज्ज्ञ डॉक्टरांनी दिला आहे.

जूनमध्ये मान्सूनला सुरुवात झाली की, पावसाळ्यातील साथींचे आजार डोके वर काढतात. त्यात तापाचे रुग्ण अधिक असतात. तापावरून अन्य आजारांची तपासणी केली जाते. त्यातून डेंग्यू, मलेरिया, टाॅयफॉइड, लेप्टोस्पायरोसिस, स्वाइन फ्लू, चिकुनगुन्या आदी आजारांची लागण मनपा हद्दीतील दाट वस्त्यांसह अन्य ठिकाणच्या लोकवस्तीतून होते. अशावेळी शहरांतील मनपा व खासगी रुग्णालये, दवाखान्यांमध्ये या आजाराच्या रुग्णांची झुंबड उडत असल्याचे दरवर्षी पाहायला मिळते. गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही कोरोनाचे सावट कायम आहे. सध्या कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे, पण संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. जूनच्या सुरुवातीला चांगला दमदार पाऊस पडला, मात्र गेल्या आठवड्यापासून ऊन-पावसाच्या खेळामुळे वातावरणात झालेल्या बदलात तापाचे रुग्ण वाढू लागले आहेत. यात निदानाअंती बहुतांश रुग्ण सामान्य तापाचे आहेत. एखाद्‌दुसरा कोरोना पॉझिटिव्ह आढळून येत असल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे. कोरोना रुग्णांची कमी झालेली संख्या पाहता, केडीएमसीच्या हद्दीत बहुतांश निर्बंध उठविण्यात आले आहेत. त्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. सोशल डिस्टन्सबाबत वेळीच सतर्कता आणि खबरदारी नाही बाळगली, तर पुढे संक्रमणाच्या माध्यमातून धोका वाढण्याची भीती डॉ. आनंद हर्डीकर यांनी व्यक्त केली. तापाबरोबर सर्दी, खोकल्याचे रुग्णही उपचारासाठी येत असल्याची माहिती डॉ. समीर जोशी यांनी दिली.

-----------------------------------------------------

कोरोना चाचणी बंधनकारक

बदलत्या हवामानात तापाचे, सर्दी, खोकल्याचे रुग्ण आढळतात. सध्या तापाचे रुग्ण वाढले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे तपासणीअंती १० पैकी एकच रुग्ण कोविड पॉझिटिव्ह आढळून येत आहे. दरम्यान, आपल्याकडे कोरोनाचे आजही १०० च्या आसपास रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे कोरोना पूर्णत: नियंत्रणात आलेला नाही. या साथरोगाच्या वातावरणात ताप, सर्दी, खोकला व अन्य काही कोरोनासारखी लक्षणे असल्यास तत्काळ कोरोना चाचणी करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे पुढील धोका टळेल. जर कोरोना नसल्याचे निदान झाल्यास त्याप्रमाणे पुढील उपचार घेऊ शकतात.

- डॉ. प्रतिभा पानपाटील, साथरोग प्रतिबंधक विभाग अधिकारी, केडीएमसी

------------------------------------------------------