शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

एपीएमसीच्या बाराव्या गणासाठी आज फेरमतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2019 01:06 IST

कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १७ मार्चला झालेल्या निवडणुकीत बाराव्या गणातील मतपेटीतून धूर आल्याने त्यातील मतपत्रिका जळाल्या होत्या.

कल्याण : कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १७ मार्चला झालेल्या निवडणुकीत बाराव्या गणातील मतपेटीतून धूर आल्याने त्यातील मतपत्रिका जळाल्या होत्या. त्यामुळे या गणासाठी उद्या रविवार, २४ मार्चला सकाळी ८ ते सायंकाळी ५ दरम्यान पुन्हा मतदान घेण्यात येणार आहे. या गणात ४४२ मतदार आहेत.बाजार समितीच्या १६ गणांसाठी १७ मार्चला मतदान झाले होते. २९ मतदान केंद्रांवरील मतपेट्या समितीच्या आवारात मतदान प्रक्रिया संपल्यावर आणत असताना बाराव्या गणातील मतपेटीतून धूर येत असल्याचे कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे मतपेटी उघडली असता, त्यात मतपत्रिका जळत असल्याचे दिसून आले. निवडणूक निर्णय अधिकारी शहाजी पाटील यांनी हा प्रकार निवडणूक आयोगासह जिल्हाधिकाऱ्यांना कळवला. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी १८ मार्चच्या मतमोजणीला स्थगिती दिली. तसेच बाराव्या गणासाठी २४ मार्चला फेरमतदान घेण्यात येईल, असे जाहीर केले. त्यानुसार, उद्या हे मतदान होणार आहे. तर, २५ मार्चला सर्व मतपेट्यांतील मतांची मोजणी करून निकाल जाहीर केला जाईल, असे पाटील यांनी सांगितले.१७ मार्चला मतपत्रिका जळाल्याच्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी सुरक्षिततेची काळजी घ्यावी. या गणातील मतपेट्या या स्वतंत्र स्ट्राँग रूममध्ये ठेवाव्यात, अशी मागणी निवडणूक अधिकारी पाटील यांच्याकडे करण्यात आली आहे.

टॅग्स :Electionनिवडणूक