शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
2
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
3
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
4
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
5
८०% ‘जेन झी’ला करायचंय ‘एआय’शी लग्न, एआय पार्टनर्स आता मानवी नात्यांची जागा घेईल
6
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
7
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
8
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
9
मतदान केंद्र निश्चितीचे निवडणूक आयोगाचे आदेश; राजकीय पक्षांच्या बैठका घेण्याचीही अधिकाऱ्यांना सूचना
10
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी
11
वाहतूकदारांचा संप मागे; ८० टक्के मागण्या मान्य, ई-चलानचा दंड तसेच ९० दिवसांपेक्षा जास्त जुने चलानही रद्द
12
उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची पदे भरण्यास सर्वोच्च न्यायालय प्रयत्नशील : सरन्यायाधीश गवई
13
कांदळवनांचा अडथळा; पुनर्विचार याचिका करणार, वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती; सर्वेक्षणातून समजणार अचूक क्षेत्रफळ
14
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
15
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
16
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
17
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
18
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
19
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा

फेरीवाला हटाव पथके वाऱ्यावर

By admin | Updated: February 21, 2017 05:31 IST

रस्त्यांवर अतिक्रमण करणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाईसाठी गेलेल्या केडीएमसीच्या ‘क’ प्रभागातील पथकावर पुन्हा हल्ला

प्रशांत माने / कल्याणरस्त्यांवर अतिक्रमण करणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाईसाठी गेलेल्या केडीएमसीच्या ‘क’ प्रभागातील पथकावर पुन्हा हल्ला झाल्याची घटना नुकतीच शहरात घडली. यातून फेरीवाल्यांमधील मुजोरपणा समोर आला असताना या बळावलेल्या प्रवृत्तीला राजकीय अभय मिळत असल्याने फेरीवाल्यांचा हा मस्तवालपणा दिवसागणिक वाढत आहे. एकीकडे फेरीवाला हटाव व अतिक्रमणविरोधी पथके कुचकामी ठरत असताना त्यांना पुरवले जाणारे पोलीस बळही अपुरे आहे. वारंवार होणारे हल्ले पाहता पथकांची सुरक्षा धोक्यात आल्याचे चित्र आहे. कल्याण पश्चिमेतील रेल्वे स्थानकासमोरील बोरगावकरवाडी येथे फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावर कारवाईसाठी गेलेल्या ‘क’ प्रभागाच्या पथकावर १० ते १५ जणांच्या टोळीने हल्ला केल्याची घटना आॅगस्टमध्ये घडली होती. यात राजेश पेठकर हा महापालिकेचा कर्मचारी गंभीर जखमी झाला होता. आता अलीकडेच पुन्हा ‘क’ प्रभागाच्या पथकावरच हल्ला झाला. यात पथकातील कर्मचाऱ्यांकडून कारवाईसाठी वापरला जाणारा मोठा हातोडा हिसकावून घेऊन पथकाच्या गाडीवरच प्रहार करून नुकसान करण्याचा प्रकार फेरीवाल्यांकडून घडला आहे. या वेळी एकाने बुटाच्या मोज्यातून चाकू काढून धाक दाखवण्याचा प्रकारही घडल्याने फेरीवाले कशाप्रकारे घातक शस्त्रे बाळगतात, याची प्रचीती यानिमित्ताने आली. याप्रकरणी ‘क’ प्रभाग अधिकारी अरुण वानखेडे यांच्या तक्रारीवरून महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असला, तरी वारंवार घडणाऱ्या या घटनांमधून महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी यांची सुरक्षा धोक्यात आली आहे. महापालिका कर्मचाऱ्यांवरील हल्ले यापूर्वीही अनेकदा घडले आहेत. आॅगस्ट २०१५ मध्ये डोंबिवली पूर्वेकडील परिसरात ‘फ’ प्रभागाचे तत्कालीन प्रभाग अधिकारी विनायक पांडे यांना फेरीवाल्यांनी घेराव घातला होता. तर, जानेवारी २०१४ मध्ये ‘क’ प्रभागातच पथकातील कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली होती. नोव्हेंबर २०१५ मध्ये ‘क’ प्रभाग अधिकारी वानखेडे यांना धक्काबुक्की आणि दमदाटीचा प्रकार घडला होता. जानेवारी २०१६ मध्येही कारवाईच्या वेळी मनसेचे गटनेते मंदार हळबे यांनाही फेरीवाल्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. हे एकंदरीत चित्र पाहता फेरीवाल्यांमधील मुजोरपणा दिवसागणिक वाढत असल्याचे स्पष्ट होत आहे. सध्या कर्मचाऱ्यांना पुरवले जात असलेले पोलीस संरक्षण तुटपुंजे आहे. कारवाईच्या वेळी ३ ते ४ पोलीसच असतात. त्यामुळे कारवाई करणे जिकिरीचे होते. किमान १० पोलीस कर्मचाऱ्यांची आवश्यकता असल्याचे अधिकारी, कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. राजकीय अभय कारणीभूतविशेष म्हणजे कल्याण-डोंबिवलीतील फेरीवाला संघटनांचे अध्यक्ष हे राजकीय पक्षांचे पदाधिकारी आहेत. त्यामुळे फेरीवाल्यांविरोधात ठोस अशी कारवाई होताना दिसत नाही. कल्याणमधील महानगर फेरीवाला संघटनेचे अध्यक्ष अरविंद मोरे आहेत. ते शिवसेनेचे विधानसभा संघटक व माजी नगरसेवक आहेत, तर फळे, फुले, भाजीपाला कल्याणकारी फेरीवाला संघटनेचे अध्यक्ष प्रशांत माळी हे भाजपा युवा मोर्चाचे पदाधिकारी आहे. पथपथारी फेरीवाला संघटनेचे अध्यक्ष रमेश हनुमंते हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कल्याण जिल्हाध्यक्ष आहेत. राष्ट्रीय फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी तसेच पुनर्वसन होत नाही, तोपर्यंत असाच उद्रेक होत राहील, अशी भूमिका फेरीवाला संघटनांकडून सातत्याने मांडली जाते. सध्याची कारवाई बेकायदा असल्याचा आरोप त्यांच्याकडून होतो. एकीकडे सत्ताधारी शिवसेना-भाजपा स्मार्ट सिटीच्या बाता करत असताना त्यांचेच प्रतिनिधी शहराच्या बकालतेला फेरीवाल्यांच्या माध्यमातून का होईना प्रोत्साहन देत असल्याचे चित्र आहे.