शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

फेरीवाला हटाव पथके वाऱ्यावर

By admin | Updated: February 21, 2017 05:31 IST

रस्त्यांवर अतिक्रमण करणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाईसाठी गेलेल्या केडीएमसीच्या ‘क’ प्रभागातील पथकावर पुन्हा हल्ला

प्रशांत माने / कल्याणरस्त्यांवर अतिक्रमण करणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाईसाठी गेलेल्या केडीएमसीच्या ‘क’ प्रभागातील पथकावर पुन्हा हल्ला झाल्याची घटना नुकतीच शहरात घडली. यातून फेरीवाल्यांमधील मुजोरपणा समोर आला असताना या बळावलेल्या प्रवृत्तीला राजकीय अभय मिळत असल्याने फेरीवाल्यांचा हा मस्तवालपणा दिवसागणिक वाढत आहे. एकीकडे फेरीवाला हटाव व अतिक्रमणविरोधी पथके कुचकामी ठरत असताना त्यांना पुरवले जाणारे पोलीस बळही अपुरे आहे. वारंवार होणारे हल्ले पाहता पथकांची सुरक्षा धोक्यात आल्याचे चित्र आहे. कल्याण पश्चिमेतील रेल्वे स्थानकासमोरील बोरगावकरवाडी येथे फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावर कारवाईसाठी गेलेल्या ‘क’ प्रभागाच्या पथकावर १० ते १५ जणांच्या टोळीने हल्ला केल्याची घटना आॅगस्टमध्ये घडली होती. यात राजेश पेठकर हा महापालिकेचा कर्मचारी गंभीर जखमी झाला होता. आता अलीकडेच पुन्हा ‘क’ प्रभागाच्या पथकावरच हल्ला झाला. यात पथकातील कर्मचाऱ्यांकडून कारवाईसाठी वापरला जाणारा मोठा हातोडा हिसकावून घेऊन पथकाच्या गाडीवरच प्रहार करून नुकसान करण्याचा प्रकार फेरीवाल्यांकडून घडला आहे. या वेळी एकाने बुटाच्या मोज्यातून चाकू काढून धाक दाखवण्याचा प्रकारही घडल्याने फेरीवाले कशाप्रकारे घातक शस्त्रे बाळगतात, याची प्रचीती यानिमित्ताने आली. याप्रकरणी ‘क’ प्रभाग अधिकारी अरुण वानखेडे यांच्या तक्रारीवरून महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असला, तरी वारंवार घडणाऱ्या या घटनांमधून महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी यांची सुरक्षा धोक्यात आली आहे. महापालिका कर्मचाऱ्यांवरील हल्ले यापूर्वीही अनेकदा घडले आहेत. आॅगस्ट २०१५ मध्ये डोंबिवली पूर्वेकडील परिसरात ‘फ’ प्रभागाचे तत्कालीन प्रभाग अधिकारी विनायक पांडे यांना फेरीवाल्यांनी घेराव घातला होता. तर, जानेवारी २०१४ मध्ये ‘क’ प्रभागातच पथकातील कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली होती. नोव्हेंबर २०१५ मध्ये ‘क’ प्रभाग अधिकारी वानखेडे यांना धक्काबुक्की आणि दमदाटीचा प्रकार घडला होता. जानेवारी २०१६ मध्येही कारवाईच्या वेळी मनसेचे गटनेते मंदार हळबे यांनाही फेरीवाल्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. हे एकंदरीत चित्र पाहता फेरीवाल्यांमधील मुजोरपणा दिवसागणिक वाढत असल्याचे स्पष्ट होत आहे. सध्या कर्मचाऱ्यांना पुरवले जात असलेले पोलीस संरक्षण तुटपुंजे आहे. कारवाईच्या वेळी ३ ते ४ पोलीसच असतात. त्यामुळे कारवाई करणे जिकिरीचे होते. किमान १० पोलीस कर्मचाऱ्यांची आवश्यकता असल्याचे अधिकारी, कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. राजकीय अभय कारणीभूतविशेष म्हणजे कल्याण-डोंबिवलीतील फेरीवाला संघटनांचे अध्यक्ष हे राजकीय पक्षांचे पदाधिकारी आहेत. त्यामुळे फेरीवाल्यांविरोधात ठोस अशी कारवाई होताना दिसत नाही. कल्याणमधील महानगर फेरीवाला संघटनेचे अध्यक्ष अरविंद मोरे आहेत. ते शिवसेनेचे विधानसभा संघटक व माजी नगरसेवक आहेत, तर फळे, फुले, भाजीपाला कल्याणकारी फेरीवाला संघटनेचे अध्यक्ष प्रशांत माळी हे भाजपा युवा मोर्चाचे पदाधिकारी आहे. पथपथारी फेरीवाला संघटनेचे अध्यक्ष रमेश हनुमंते हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कल्याण जिल्हाध्यक्ष आहेत. राष्ट्रीय फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी तसेच पुनर्वसन होत नाही, तोपर्यंत असाच उद्रेक होत राहील, अशी भूमिका फेरीवाला संघटनांकडून सातत्याने मांडली जाते. सध्याची कारवाई बेकायदा असल्याचा आरोप त्यांच्याकडून होतो. एकीकडे सत्ताधारी शिवसेना-भाजपा स्मार्ट सिटीच्या बाता करत असताना त्यांचेच प्रतिनिधी शहराच्या बकालतेला फेरीवाल्यांच्या माध्यमातून का होईना प्रोत्साहन देत असल्याचे चित्र आहे.