शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणूक २०२५: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
2
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
3
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
4
बांगलादेशला पुन्हा पूर्व पाकिस्तान करण्याचा मुनीरचा डाव, ट्रम्प यांना दाखवली अशी लालूच, भारतासाठी धोका वाढला
5
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
6
'हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मूर्खपणाचं पाऊल..,' ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ म्हणाले, "ट्रम्प टॅरिफनेच ब्रिक्सला विजय मिळवून दिला.."
7
२.९५ लाखांपर्यंतचा बंपर डिस्काउंट, Mahindra च्या 'या' ५ गाड्यांवर जबरदस्त ऑफर्स
8
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
9
राज्यसभेत उघडपणे बोलणारे आज गप्प का? धनखड यांच्या मौनावर राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न
10
गणेश चतुर्थी २०२५: बाप्पाला मोदक आवडतात; पण उकडीचे की तळणीचे? पद्म पुराणात सापडते उत्तर!
11
Vinod Kambli: बोलायला त्रास होतोय, चालताही येईना; विनोद कांबळींच्या प्रकृतीबद्दल चिंताजनक माहिती
12
कुमार बिर्ला स्वतःच्याच कंपनीचे शेअर्स स्वस्तात का विकत आहेत? एक वर्षापूर्वीच खरेदी; का आली अशी वेळ?
13
प्रसिद्ध अमेरिकन जज फ्रँक कॅप्रियो यांचे निधन; 'दयाळू न्यायाधीश' म्हणून होते लोकप्रिय!
14
"श्री गणेश करते हैं..."; जेव्हा रशियन राजदूतांनी हिंदीमध्ये सुरू केली पत्रकार परिषद! 'सुदर्शन चक्र'चा उल्लेख करत दिलं मोठं आश्वासन, बघा VIDEO
15
हाय स्पीड कॅमेरे, सेन्सर अन् 3D मोशन कॅप्चर टेक्नॉलॉजीसह या गोलंदाजाची अ‍ॅक्शन रेकॉर्ड केली जाणार
16
इंजिनीअर तरुणाने आईच्या मदतीने पत्नीला संपवलं, मृतदेह चादरीत गुंडाळला अन्...; कारण ऐकून होईल संताप!
17
Ganesh Chaturthi 2025: गणेश चतुर्थीला बाप्पाला दूर्वा सोडून का वाहिली जाते तुळस?
18
ड्रीम११ आणि My11Circle चे भविष्य धोक्यात? ऑनलाइन गेमिंग बिलामुळे 'हे' प्लॅटफॉर्म कायमचे बंद होणार?
19
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
20
Coconut Oil : नारळ तेल बनलं VIP प्रोडक्ट; दोन वर्षांत तीन पटींनी वाढली किंमत

फेरीवाला हटाव पथके वाऱ्यावर

By admin | Updated: February 21, 2017 05:31 IST

रस्त्यांवर अतिक्रमण करणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाईसाठी गेलेल्या केडीएमसीच्या ‘क’ प्रभागातील पथकावर पुन्हा हल्ला

प्रशांत माने / कल्याणरस्त्यांवर अतिक्रमण करणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाईसाठी गेलेल्या केडीएमसीच्या ‘क’ प्रभागातील पथकावर पुन्हा हल्ला झाल्याची घटना नुकतीच शहरात घडली. यातून फेरीवाल्यांमधील मुजोरपणा समोर आला असताना या बळावलेल्या प्रवृत्तीला राजकीय अभय मिळत असल्याने फेरीवाल्यांचा हा मस्तवालपणा दिवसागणिक वाढत आहे. एकीकडे फेरीवाला हटाव व अतिक्रमणविरोधी पथके कुचकामी ठरत असताना त्यांना पुरवले जाणारे पोलीस बळही अपुरे आहे. वारंवार होणारे हल्ले पाहता पथकांची सुरक्षा धोक्यात आल्याचे चित्र आहे. कल्याण पश्चिमेतील रेल्वे स्थानकासमोरील बोरगावकरवाडी येथे फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावर कारवाईसाठी गेलेल्या ‘क’ प्रभागाच्या पथकावर १० ते १५ जणांच्या टोळीने हल्ला केल्याची घटना आॅगस्टमध्ये घडली होती. यात राजेश पेठकर हा महापालिकेचा कर्मचारी गंभीर जखमी झाला होता. आता अलीकडेच पुन्हा ‘क’ प्रभागाच्या पथकावरच हल्ला झाला. यात पथकातील कर्मचाऱ्यांकडून कारवाईसाठी वापरला जाणारा मोठा हातोडा हिसकावून घेऊन पथकाच्या गाडीवरच प्रहार करून नुकसान करण्याचा प्रकार फेरीवाल्यांकडून घडला आहे. या वेळी एकाने बुटाच्या मोज्यातून चाकू काढून धाक दाखवण्याचा प्रकारही घडल्याने फेरीवाले कशाप्रकारे घातक शस्त्रे बाळगतात, याची प्रचीती यानिमित्ताने आली. याप्रकरणी ‘क’ प्रभाग अधिकारी अरुण वानखेडे यांच्या तक्रारीवरून महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असला, तरी वारंवार घडणाऱ्या या घटनांमधून महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी यांची सुरक्षा धोक्यात आली आहे. महापालिका कर्मचाऱ्यांवरील हल्ले यापूर्वीही अनेकदा घडले आहेत. आॅगस्ट २०१५ मध्ये डोंबिवली पूर्वेकडील परिसरात ‘फ’ प्रभागाचे तत्कालीन प्रभाग अधिकारी विनायक पांडे यांना फेरीवाल्यांनी घेराव घातला होता. तर, जानेवारी २०१४ मध्ये ‘क’ प्रभागातच पथकातील कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली होती. नोव्हेंबर २०१५ मध्ये ‘क’ प्रभाग अधिकारी वानखेडे यांना धक्काबुक्की आणि दमदाटीचा प्रकार घडला होता. जानेवारी २०१६ मध्येही कारवाईच्या वेळी मनसेचे गटनेते मंदार हळबे यांनाही फेरीवाल्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. हे एकंदरीत चित्र पाहता फेरीवाल्यांमधील मुजोरपणा दिवसागणिक वाढत असल्याचे स्पष्ट होत आहे. सध्या कर्मचाऱ्यांना पुरवले जात असलेले पोलीस संरक्षण तुटपुंजे आहे. कारवाईच्या वेळी ३ ते ४ पोलीसच असतात. त्यामुळे कारवाई करणे जिकिरीचे होते. किमान १० पोलीस कर्मचाऱ्यांची आवश्यकता असल्याचे अधिकारी, कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. राजकीय अभय कारणीभूतविशेष म्हणजे कल्याण-डोंबिवलीतील फेरीवाला संघटनांचे अध्यक्ष हे राजकीय पक्षांचे पदाधिकारी आहेत. त्यामुळे फेरीवाल्यांविरोधात ठोस अशी कारवाई होताना दिसत नाही. कल्याणमधील महानगर फेरीवाला संघटनेचे अध्यक्ष अरविंद मोरे आहेत. ते शिवसेनेचे विधानसभा संघटक व माजी नगरसेवक आहेत, तर फळे, फुले, भाजीपाला कल्याणकारी फेरीवाला संघटनेचे अध्यक्ष प्रशांत माळी हे भाजपा युवा मोर्चाचे पदाधिकारी आहे. पथपथारी फेरीवाला संघटनेचे अध्यक्ष रमेश हनुमंते हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कल्याण जिल्हाध्यक्ष आहेत. राष्ट्रीय फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी तसेच पुनर्वसन होत नाही, तोपर्यंत असाच उद्रेक होत राहील, अशी भूमिका फेरीवाला संघटनांकडून सातत्याने मांडली जाते. सध्याची कारवाई बेकायदा असल्याचा आरोप त्यांच्याकडून होतो. एकीकडे सत्ताधारी शिवसेना-भाजपा स्मार्ट सिटीच्या बाता करत असताना त्यांचेच प्रतिनिधी शहराच्या बकालतेला फेरीवाल्यांच्या माध्यमातून का होईना प्रोत्साहन देत असल्याचे चित्र आहे.