शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
2
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
3
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
4
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
5
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
6
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
7
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
8
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
9
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
10
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
11
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
12
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
13
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
14
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
15
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
16
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
17
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
18
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
19
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
20
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त

कारखान्यांत सुरक्षेचे भय वाढले!

By admin | Updated: March 7, 2016 02:20 IST

औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाचे कार्यालय कल्याण येथे आहे. मात्र या कार्यालयाची कार्यकक्षा मोठी आणि त्यांच्याकडे असलेला अधिकारी व कर्मचारी वर्ग अपुरा असल्याने

मुरलीधर भवार, डोंबिवलीऔद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाचे कार्यालय कल्याण येथे आहे. मात्र या कार्यालयाची कार्यकक्षा मोठी आणि त्यांच्याकडे असलेला अधिकारी व कर्मचारी वर्ग अपुरा असल्याने औद्योगिक सुरक्षा तपासणी वाऱ्यावर असल्याचे उघड झाले आहे. ही स्थिती कारखान्यांत काम करणाऱ्या कामगारांचे भय वाढवणारी ठरते आहे.अल्ट्रा प्यूअर कंपनीला लागलेल्या भीषण आगीच्या घटनेनंतर औद्योगिक सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. सुरक्षेचे नियम पाळले जातात की नाही, या बाबी औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाकडून योग्य प्रकारे तपासल्याच जात नसल्याचे आगीच्या घटनांवरून उघड होत आहे. या संचालनालयास पुरेसा अधिकारी व कर्मचारी वर्ग पुरविण्याकडे सरकारी यंत्रणांचीही अनास्था असल्याने भविष्यात डोंबिवलीतील औद्योगिक परिसरातील कारखान्यांंमध्ये एखादी मोठी दुर्घटना होण्याची सरकार वाट बघते काय, असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे. डोंबिवलीत औद्योगिक क्षेत्रात फेज वन आणि टू असे दोन फेज आहेत. त्यात जवळपास ४५० कारखाने सुरू आहेत. तितकेच कारखाने अंबरनाथ औद्योगिक परिसरात सुरू आहेत. अंबरनाथ, बदलापूर, डोंबिवलीसह मुरबााड परिसरातील औद्योगिक वसाहतीत कारखान्यांची संख्या मोठी आहे. जवळपास एक हजार कारखाने औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाच्या कल्याण कार्यालयांतर्गत येतात. कमी स्टाफमुळे सगळ््याच कारखान्यांना भेटी देऊन त्यांच्या सुरक्षितेतीच तपासणी केली जात नाही. ही वस्तूस्थिती आहे. स्टाफ कमी असल्याने कारखान्याचे सुरक्षा लेखा परीक्षण संचालनालयाच्या कार्यालयामार्फत केले जात नाही. तसेच त्रयस्थ संस्थाकडूनही करून घेतले जात नाही. जे कारखाने कायद्यातील तरतुदीनुसार चालतात. त्यांचे सुरक्षा लेखा परीक्षण हे त्या कारखान्यांमार्फत केले जाते अशी माहिती औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाकडून सांगण्यात येते. खाजगी जमिनीवरील कारखान्यास अधिनियम लागू होता. मात्र भिवंडीसारख्या शहरातील बेकायदा गोडावून औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाच्या नियंत्रणाखाली येत नाही. त्यामुळे त्यांची सुरक्षितता व आरोग्याचा प्रश्न कोणी हाताळायचा, त्यांच्यावर कारवाई कोणी करायची हा प्रश्न यामुळे निरुत्तीतच राहतो. केवळ भंगार गोदामे ही भिवंडीत नाहीत. तर कल्याण डोंबिवलीसह अन्य शहरातील बेकायदा गोदामे आहेत. त्यांची संख्या बरीच मोठी आहे. २०११ ते २०१४ या कालावधील डोंबिवलीतील घरडा केमिकल्स, विनायक टेक्सटाईल्स, अल्केमी लॅबोरेटीज, र्व्हसटाईल्स केमिकल्स, पायोनेअर डाईंग, महेश टेक्सटाईल्स, तारकेम इंटस्ट्रीज, महावीर डाईंग, श्रीजी टेक्सटाईल्स, सनबीम मोनोकेम, आरती केल्थ केअर, ओरेक्स फार्मा आणि जॅक अ‍ॅड जिल्स कंपनी या १३ कंपन्यांमध्ये आगीच्या घटना घडल्या होत्या. आगीच्या व स्फोटाच्या घटनांमध्ये १३ जणांना प्राण गमावावे लागले. तर १६ जण जखमी झाले. २७ अपघाताच्या घटना घडल्या. त्यापैकी काही कारखान्यांच्या विरोधात संचालनालयााने खटले दाखल केले. तर काहींच्या विरोधात संचालनालयास खटलेच दाखल करता आले नाही. कारण त्याठिकाणी कोणत्याही नियमावलीचा भंग झाला नाही. तरी देखील आग लागली.