शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

कोकणातील एफडीएची प्रकरणे निघणार झटपट निकाली; न्याय निर्णय जिल्ह्याच्या दारी उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 05:04 IST

अन्न व औषध प्रशासन (एफडीए) पुण्याच्या धर्तीवर ‘न्याय निर्णय जिल्ह्याच्या दारी’ हा अभिनव उपक्रम लवकरच कोकण विभागात राबवणार आहे.

- पंकज रोडेकरठाणे : अन्न व औषध प्रशासन (एफडीए) पुण्याच्या धर्तीवर ‘न्याय निर्णय जिल्ह्याच्या दारी’ हा अभिनव उपक्रम लवकरच कोकण विभागात राबवणार आहे. त्यामुळे एफडीएसंबंधी प्रलंबित असलेल्या शेकडो प्रकरणांचा निपटारा जलद गतीने होऊन वादी आणि प्रतिवादी यांचा पैसा आणि वेळेची बचत होणार आहे. जास्तीतजास्त प्रकरणे निकाली काढण्यासाठी संबंधित जिल्ह्यांतील प्रकरणांचा दरमहा आढावाही घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.कोकण विभागात ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे जिल्हे येतात. या विभागात काही महिन्यांपासून जवळपास एक हजार प्रकरणे प्रलंबित आहेत. कोकण विभागाचे मुख्यालय ठाण्यात आहे. त्यामुळे वादी आणि प्रतिवादींना दाद मागण्यासाठी नेहमी ठाण्यात यावे लागते. यामध्ये पैसा आणि वेळ खर्च होतो.या उपक्रमामुळे हे टळणार आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्याच्या अडीअडचणींचा आढावाही घेता येणार आहे. सुरुवातीला हा उपक्रम नागपूर येथे प्रायोगिक तत्त्वावर राबवण्यात आला होता. त्यानंतर, पहिल्यांदा पुण्यात राबवण्यात आला. या उपक्रमाद्वारे पुण्यासह सांगली, कोल्हापूर, सोलापूर, सातारा आणि सांगली या जिल्ह्यांतील जवळपास ६०० प्रकरणे निकाली काढण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.ठाण्यात सर्वाधिक प्रकरणेठाणे जिल्ह्यात प्रकरणांची संख्या इतर जिल्ह्यांपेक्षा जास्त आहे. ठाणे जिल्ह्यात १० उपविभाग आहेत. तेथेच दरमहा जास्तीतजास्त प्रकरणांचा निपटारा लावण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.एफडीएच्या पुणे विभागामध्ये ‘न्याय निर्णय जिल्ह्याच्या दारी’ हा उपक्रम यशस्वी झाला आहे. त्याच धर्तीवर कोकण विभागातील प्रकरणे मार्गी लावण्यासाठी हा उपक्रम लवकरच राबवला जाईल. ही संकल्पना मंत्री गिरीश बापट यांची आहे. पुण्याप्रमाणेच कोकणातही याला चांगला प्रतिसाद मिळेल. तसेच जिल्ह्यांमध्ये दरमहा आढावा घेतला जाईल.- शिवाजी देसाई, सहआयुक्त, अन्न व औषध प्रशासन विभाग (कोकण)

टॅग्स :thaneठाणे