शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Maharashtra Nagar Palika Election Result: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
3
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
4
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
5
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
6
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
7
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
8
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
9
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
10
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
11
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
12
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
13
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
14
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
15
Maharashtra Nagar Palika Election Result: अमरावतीत १२ पैकी ४ निकाल हाती, बच्चू कडूंच्या 'प्रहार', भाजपचं काय झालं?
16
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
17
धोक्याची घंटा! डिजिटल युगाचा 'सायलेंट किलर'; १८ हजार वृद्ध विसरले घरचा पत्ता, ५०० जणांचा मृत्यू
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
19
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षाचं लायसन-बॅच नसलेल्यांनी रात्री आठनंतर रिक्षा चालवण्याचा फतवा

By पंकज पाटील | Updated: October 9, 2022 17:01 IST

अंबरनाथ पश्चिम येथील नगरपालिकेजवळ असलेल्या जठार रिक्षा स्टँडवर संघटनेच्या अधिकृत फलकावर चुकीची सूचना लिहिण्यात आली होती

अंबरनाथ - अंबरनाथच्या नगरपालिकेजवळ असलेल्या मुख्य रिक्षा स्टँड जवळ काही रिक्षा चालकांनी युनियनच्या फलकावर सूचना लिहिली असून ती सूचना भलतीच व्हायरल झाली आहे. ज्या रिक्षा चालकांकडे बॅच आणि लायसन नाही अशा रिक्षा चालकांनी रात्री आठ नंतर स्टॅंडवर रिक्षा चालवावी अशी सूचना त्या फलकावर लावण्यात आली होती. मात्र या प्रकरणी खुद्द रिक्षा चालक-मालक संघटनेने आक्षेप नोंदवला असून असा चुकीचा प्रकार करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

अंबरनाथ पश्चिम येथील नगरपालिकेजवळ असलेल्या जठार रिक्षा स्टँडवर संघटनेच्या अधिकृत फलकावर चुकीची सूचना लिहिण्यात आली होती. त्यावर 'ज्या रिक्षा चालकांकडे लायसन्स आणि बॅच नाही त्यांनी रात्री आठ नंतरच रिक्षा स्टॅन्ड वर धंदा करावा' अशी सूचना लिहिली होती. हा प्रकार जाणून बुजून करण्यात आला असून गेल्या काही महिन्यांपासून रिक्षा संघटनेने भंगारात निघालेल्या रिक्षा चालकांवर कारवाई करावी या अनुषंगाने सातत्याने पाठपुरावा केला होता. अनेक रिक्षा चालक भंगार्यातल्या रिक्षा वापरून कोणतेही बॅच आणि लायसन नसताना मुख्य स्टॅन्डवर आणि शहरातील इतर स्टॅंडवर व्यवसाय करीत होते. त्याचा फटका प्रामाणिक रिक्षा चालकांना बसत होता. यासंदर्भात तक्रारी वाढल्यानंतर रिक्षा चालक मालक संघटनेने आरटीओ कार्यालयाला आणि वाहतूक विभागाला या संदर्भात तक्रार केली होती. मात्र सततच्या पाठपुराव्यानंतर देखील कोणतेही कारवाई होताना दिसत नाही. 

रिक्षा संघटना सातत्याने कालबाह्य झालेल्या रिक्षांवर कारवाई करावी यासाठी पाठपुरा करीत असल्याने काही रिक्षाचालकांनी संघटनेलाच अडचणीत आणण्यासाठी फलकावर ही सूचना लिहिण्याचा संशय व्यक्त केला जात आहे. ही बाब रीक्षा संघटनेच्या लक्षात येताच त्यांनी या फलकावरील सूचना पूसली असून ही सूचना नेमके कोणी लिहिली त्याचा शोध घेत त्या संदर्भात वाहतूक पोलिसांकडे तक्रार केली आहे. दरम्यान हा सर्व प्रकार घडत असताना आता कालबाह्य झालेल्या रिक्षांवर आणि लायसन व बॅच नसलेल्या रिक्षा चालकांवर कारवाई करावी यासाठी आता संघटना पुन्हा सक्रिय झाली आहे. याप्रकरणी रिक्षा चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष मिलिंद पाटील यांना विचारले असता हा खोडसाळपणा असून काही रिक्षा चालकाने संघटनेला अडचणीत आणण्यासाठी हा प्रकार केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :ambernathअंबरनाथauto rickshawऑटो रिक्षा