शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
3
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
4
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
5
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
6
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
7
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
8
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
9
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
10
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
11
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
12
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
13
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
14
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
15
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
16
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
17
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
18
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
19
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
20
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास

रिक्षाचं लायसन-बॅच नसलेल्यांनी रात्री आठनंतर रिक्षा चालवण्याचा फतवा

By पंकज पाटील | Updated: October 9, 2022 17:01 IST

अंबरनाथ पश्चिम येथील नगरपालिकेजवळ असलेल्या जठार रिक्षा स्टँडवर संघटनेच्या अधिकृत फलकावर चुकीची सूचना लिहिण्यात आली होती

अंबरनाथ - अंबरनाथच्या नगरपालिकेजवळ असलेल्या मुख्य रिक्षा स्टँड जवळ काही रिक्षा चालकांनी युनियनच्या फलकावर सूचना लिहिली असून ती सूचना भलतीच व्हायरल झाली आहे. ज्या रिक्षा चालकांकडे बॅच आणि लायसन नाही अशा रिक्षा चालकांनी रात्री आठ नंतर स्टॅंडवर रिक्षा चालवावी अशी सूचना त्या फलकावर लावण्यात आली होती. मात्र या प्रकरणी खुद्द रिक्षा चालक-मालक संघटनेने आक्षेप नोंदवला असून असा चुकीचा प्रकार करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

अंबरनाथ पश्चिम येथील नगरपालिकेजवळ असलेल्या जठार रिक्षा स्टँडवर संघटनेच्या अधिकृत फलकावर चुकीची सूचना लिहिण्यात आली होती. त्यावर 'ज्या रिक्षा चालकांकडे लायसन्स आणि बॅच नाही त्यांनी रात्री आठ नंतरच रिक्षा स्टॅन्ड वर धंदा करावा' अशी सूचना लिहिली होती. हा प्रकार जाणून बुजून करण्यात आला असून गेल्या काही महिन्यांपासून रिक्षा संघटनेने भंगारात निघालेल्या रिक्षा चालकांवर कारवाई करावी या अनुषंगाने सातत्याने पाठपुरावा केला होता. अनेक रिक्षा चालक भंगार्यातल्या रिक्षा वापरून कोणतेही बॅच आणि लायसन नसताना मुख्य स्टॅन्डवर आणि शहरातील इतर स्टॅंडवर व्यवसाय करीत होते. त्याचा फटका प्रामाणिक रिक्षा चालकांना बसत होता. यासंदर्भात तक्रारी वाढल्यानंतर रिक्षा चालक मालक संघटनेने आरटीओ कार्यालयाला आणि वाहतूक विभागाला या संदर्भात तक्रार केली होती. मात्र सततच्या पाठपुराव्यानंतर देखील कोणतेही कारवाई होताना दिसत नाही. 

रिक्षा संघटना सातत्याने कालबाह्य झालेल्या रिक्षांवर कारवाई करावी यासाठी पाठपुरा करीत असल्याने काही रिक्षाचालकांनी संघटनेलाच अडचणीत आणण्यासाठी फलकावर ही सूचना लिहिण्याचा संशय व्यक्त केला जात आहे. ही बाब रीक्षा संघटनेच्या लक्षात येताच त्यांनी या फलकावरील सूचना पूसली असून ही सूचना नेमके कोणी लिहिली त्याचा शोध घेत त्या संदर्भात वाहतूक पोलिसांकडे तक्रार केली आहे. दरम्यान हा सर्व प्रकार घडत असताना आता कालबाह्य झालेल्या रिक्षांवर आणि लायसन व बॅच नसलेल्या रिक्षा चालकांवर कारवाई करावी यासाठी आता संघटना पुन्हा सक्रिय झाली आहे. याप्रकरणी रिक्षा चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष मिलिंद पाटील यांना विचारले असता हा खोडसाळपणा असून काही रिक्षा चालकाने संघटनेला अडचणीत आणण्यासाठी हा प्रकार केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :ambernathअंबरनाथauto rickshawऑटो रिक्षा