शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
3
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
4
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
5
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
6
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
7
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
8
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
9
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
10
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
11
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
12
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
13
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
14
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
15
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
16
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
17
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
18
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
19
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
20
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ

मुलीच्या मृत्यूची बातमी ऐकून वडिलांचाही मृत्यू

By admin | Updated: October 9, 2016 08:05 IST

शहापूर तालुक्यातील मुरबीचापाडा येथे राहणाऱ्या एका १३ वर्षांच्या मुलीला रात्री साप चावल्याने तिला शहापूर येथील उपरुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, तिची प्रकृती अधिकच

ऑनलाइन लोकमत

भातसानगर, दि. ९ : शहापूर तालुक्यातील मुरबीचापाडा येथे राहणाऱ्या एका १३ वर्षांच्या मुलीला रात्री साप चावल्याने तिला शहापूर येथील उपरुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, तिची प्रकृती अधिकच बिघडल्याने पुढील उपचारांसाठी ठाणे येथे नेत असताना तिचा रस्त्यातच मृत्यू झाला. ही बातमी कळताच तिच्या वडिलांनीही प्राण सोडले. या घटनेनंतर तिच्या आईचीही प्रकृती चिंताजनक झाली असून, या प्रकारामुळे संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे.

रेश्मा धावू वाख (१३) असे या मुलीचे नाव असून, भातसा धरणाच्या पायथ्याशी असलेल्या आदिवासी मुरबीचापाडा येथे ती राहत होती. ती रात्री घरात झोपली असताना, काहीतरी चावल्याचे तिने वडील धावू बाळू वाख (४८) यांना सांगितले. त्यांनी तिला घेऊन पहाटे साडेतीनच्या सुमारास उपरुग्णालय गाठले. तेथे उपचार केले. मात्र, प्रकृती गंभीर झाल्याने तिला तातडीने ठाणे येथील सिव्हिल रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेण्यात आला.

पहाटे ४च्या सुमारास ठाणे येथे जात असतानाच वाटेतच तिचा मृत्यू झाला. हे कळताच तिच्या वडिलांना शोक अनावर झाला आणि हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर तिच्या आईची प्रकृतीही गंभीर झाल्याने पाड्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आणखी एक घटनायाच रात्री या गावातील सोमी शिडू भगत या महिलेलाही सर्पदंश झाला. या महिलेलाही उपरुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.