शहरं
Join us  
Trending Stories
1
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
2
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
3
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
4
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
5
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
6
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
7
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
8
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
9
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
10
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
11
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
12
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
13
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
14
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
15
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
16
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
17
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
18
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
19
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
20
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
Daily Top 2Weekly Top 5

सीए आत्महत्येला कलाटणी, ब्लॅकमेल करून दीड कोटींची रक्कम लुबाडल्यामुळेच वडिलांची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 04:23 IST

ठाणे : वारंवार पैशांची मागणी करणाऱ्या बारबालेवर खुनीहल्ला करून शोभराज राघनी (५४) या लेखापालाने (सीए) हॉटेलच्या चौथ्या मजल्यावरून उडी ...

ठाणे : वारंवार पैशांची मागणी करणाऱ्या बारबालेवर खुनीहल्ला करून शोभराज राघनी (५४) या लेखापालाने (सीए) हॉटेलच्या चौथ्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली होती. मात्र, या बारबालेसह तिच्या अन्य दोन बहिणींनी ब्लॅकमेल करून गेल्या काही दिवसांमध्ये दीड कोटींची रक्कम उकळल्यामुळेच आपल्या वडिलांनी आत्महत्या केल्याची तक्रार शोभराज यांचा मुलगा साहिल (२३) याने कापूरबावडी पोलीस ठाण्यात रविवारी रात्री केली. या प्रकरणाला कलाटणी मिळाल्याने पोलीसही चक्रावले आहेत.

कल्याणच्या खडकपाडा, वायलेनगर येथे राहणाऱ्या साहिल शोबराज याने २८ मार्च, २०२१ रोजी कापूरबावडी पोलीस ठाण्यात या संदर्भात भारतीय दंड विधानाच्या कलम ३०६ (आत्महत्येस प्रवृत्त करणे) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. आपल्या तक्रारीमध्ये त्याने म्हटले आहे की, ठाण्यातील सावरकरनगर येथील पाटीलवाडी भागात राहणारी मुमताज उर्फ नलिनी शर्मा, तसेच तिच्या अन्य दोन बहिणी पिया आणि कमल (तिघींच्याही नावात बदल केला आहे) यांनी २०१६ ते २३ मार्च, २०२१ या कालावधीमध्ये शोभराज यांना वारंवार ब्लॅकमेल करून त्यांना मानसिक त्रास दिला. या काळात त्यांच्याकडून तब्बल दीड कोटींची रक्कम लुबाडली आहे. या तिघींकडून होत असलेल्या मानसिक त्रासाला कंटाळून शोभराज यांनी हॉटेलच्या चौथ्या मजल्यावरील खिडकीतून उडी घेऊन आत्महत्या केली.

* काय घडला होता प्रकार-

वारंवार पैशांची मागणी करणाऱ्या बारबालेवर चाकूने खुनीहल्ला करून शोभराज यांनी स्वत:ही बाळकूम येथील रेसिडेन्सी हॉटेलच्या चौथ्या मजल्यावरील खिडकीतून उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना २३ मार्च रोजी सायंकाळी घडली होती. या प्रकरणी शोभराज यांच्याविरुद्ध कापूरबावडी पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा २४ मार्च रोजी दाखल झाला होता.

शोभराज यांचे या ३३ वर्षीय बारबालेशी अनैतिक संबंध होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ती त्यांच्याकडे पैशांची मागणी करीत होती. यातूनच झालेल्या वादातून त्याने ठाण्यातील बाळकूम नाका येथील रेसिडेन्सी हॉटेलमधील एका खोलीत तिच्यावर चाकूने वार केले. त्यानंतर, स्वत: खिडकीतून उडी घेऊन आत्महत्या केली होती.

दरम्यान, खुनाचा प्रयत्न आणि आत्महत्या या दोन्ही प्रकरणांमध्ये आरोपीचा मृत्यू झाल्यामुळे न्यायालयात अबेटेड समरी सादर केली जाणार आहे. मात्र, आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या प्रकरणात बारबालेसह तिघींची चौकशी केली जाणार असून, गरज पडल्यास त्यांना अटक केली जाईल, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल देशमुख यांनी ‘लोकमत’ला दिली.