शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

भिवंडीतील नाट्यरसिकांच्या नशिबी तीन वर्षांपासून उपेक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 23:53 IST

नाट्यगृह बंद : दहा कोटींचा निधी मंजूर होऊनही मिळाली नाही दमडी

- नितीन पंडीतभिवंडी : भिवंडी परिसरातील नाट्य रसिकांच्या करमणुकीसाठी महापालिकेने उभारलेले एकमेव नाट्यगृह स्व. मीनाताई ठाकरे रंगायतन गेल्या तीन वर्षांपासून दुरुस्तीअभावी बंद आहे. नाट्यगृहाच्या दुरुस्तीकरिता राज्य शासनाने दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असला, तरी तो अद्याप महापालिकेस प्राप्त झालेला नाही. कोरोनाचा प्रभाव कमी होताच ठाणे, कल्याण येथील नाट्यगृहात नाटकांचे प्रयोग सुरू झाले. मात्र, भिवंडीत नाट्यगृह असूनही नाटकांचे प्रयोग होऊ शकत नसल्याने येथील नाट्य रसिकांत तीव्र नाराजी पसरली आहे.स्व. मीनाताई ठाकरे रंगायतन या नाट्यगृहाच्या झालेल्या दुरवस्थेकडे पालिका प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी वारंवार होत आहे. मात्र, गेंड्याची कातडी असलेल्या भिवंडी महापालिका प्रशासनास त्याची काहीही चिंता वाटत नसल्याचे नाट्यरसिकांचे म्हणणे आहे. कोरोना संकटाच्या आधी या नाट्यगृहाच्या दुरुस्तीसाठी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दहा कोटींचा निधी मंजूर केला होता. मात्र, निधी मंजूर होऊनही या नाट्यगृहाच्या दुरुस्तीला मुहूर्त मिळालेला नाही. भिवंडी महापालिकेने नागरिकांच्या करमणुकीसाठी १९९५-९६ साली भव्य नाट्यगृह बांधले. राज्यात प्रथमच शिवसेनेचे सरकार स्थापन झाले होते. याच कालावधीत तत्कालीन भिवंडी नगरपरिषदेत शिवसेनेची सत्ता होती. गेल्या २४ वर्षांच्या कालावधीत या नाट्यगृहाची दुरवस्था झाली असून, सध्या बंद पडले आहे. भिवंडी शहरी व ग्रामीण भागातील नाट्यरसिकांचा त्यामुळे हिरमोड झाला असून, होतकरू व नवकलाकारांच्या कलागुणांना वाव मिळत नसल्याने त्यांचीही अडचण झाली आहे. भिवंडीतील रसिकांना नाटक व इतर मनोरंजनाचे कार्यक्रम पाहण्यासाठी कल्याण, ठाणे, मुंबई या ठिकाणी जावे लागत आहे. ही बाब खर्चिक व वेळकाढू असल्याने, अनेकदा भिवंडीतील नाट्यरसिकांना मन मारावे लागते.नाट्यगृहाच्या दुरुस्तीसाठी महापालिकेने लाखो रुपयांचा निधी खर्च केला आहे. मात्र, तरी वास्तूची दुरवस्था झाल्याने नाट्यगृह बंद आहे. येत्या ६ जानेवारी रोजी स्व. मीनाताई ठाकरे यांची जयंती साजरी होणार असून, राज्यात शिवसेनेचे ‘ठाकरे सरकार’  सत्तारुढ असताना त्यापूर्वी नाट्यगृहाची दुरुस्ती सुरू करावी, अशी मागणी आहे.नाट्यगृहाच्या दुरुस्तीसाठी दहा कोटींचा निधी मंजूर झाला आहे. मात्र, त्याचे हस्तांतरण अजूनही भिवंडी महापालिकेकडे झालेले नाही. त्यामुळे नाट्यगृह दुरुस्तीचे सुरू झालेले नाही. या निधीसाठी शासकीय स्तरावर पत्रव्यवहार सुरू आहे. निधी मनपाकडे हस्तांतरित झाल्यावर लागलीच दुरुस्ती करण्यात येईल.    - डॉ. पंकज आशिया,     आयुक्त, भिवंडी महापालिका