शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

भिवंडीतील नाट्यरसिकांच्या नशिबी तीन वर्षांपासून उपेक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 23:53 IST

नाट्यगृह बंद : दहा कोटींचा निधी मंजूर होऊनही मिळाली नाही दमडी

- नितीन पंडीतभिवंडी : भिवंडी परिसरातील नाट्य रसिकांच्या करमणुकीसाठी महापालिकेने उभारलेले एकमेव नाट्यगृह स्व. मीनाताई ठाकरे रंगायतन गेल्या तीन वर्षांपासून दुरुस्तीअभावी बंद आहे. नाट्यगृहाच्या दुरुस्तीकरिता राज्य शासनाने दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असला, तरी तो अद्याप महापालिकेस प्राप्त झालेला नाही. कोरोनाचा प्रभाव कमी होताच ठाणे, कल्याण येथील नाट्यगृहात नाटकांचे प्रयोग सुरू झाले. मात्र, भिवंडीत नाट्यगृह असूनही नाटकांचे प्रयोग होऊ शकत नसल्याने येथील नाट्य रसिकांत तीव्र नाराजी पसरली आहे.स्व. मीनाताई ठाकरे रंगायतन या नाट्यगृहाच्या झालेल्या दुरवस्थेकडे पालिका प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी वारंवार होत आहे. मात्र, गेंड्याची कातडी असलेल्या भिवंडी महापालिका प्रशासनास त्याची काहीही चिंता वाटत नसल्याचे नाट्यरसिकांचे म्हणणे आहे. कोरोना संकटाच्या आधी या नाट्यगृहाच्या दुरुस्तीसाठी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दहा कोटींचा निधी मंजूर केला होता. मात्र, निधी मंजूर होऊनही या नाट्यगृहाच्या दुरुस्तीला मुहूर्त मिळालेला नाही. भिवंडी महापालिकेने नागरिकांच्या करमणुकीसाठी १९९५-९६ साली भव्य नाट्यगृह बांधले. राज्यात प्रथमच शिवसेनेचे सरकार स्थापन झाले होते. याच कालावधीत तत्कालीन भिवंडी नगरपरिषदेत शिवसेनेची सत्ता होती. गेल्या २४ वर्षांच्या कालावधीत या नाट्यगृहाची दुरवस्था झाली असून, सध्या बंद पडले आहे. भिवंडी शहरी व ग्रामीण भागातील नाट्यरसिकांचा त्यामुळे हिरमोड झाला असून, होतकरू व नवकलाकारांच्या कलागुणांना वाव मिळत नसल्याने त्यांचीही अडचण झाली आहे. भिवंडीतील रसिकांना नाटक व इतर मनोरंजनाचे कार्यक्रम पाहण्यासाठी कल्याण, ठाणे, मुंबई या ठिकाणी जावे लागत आहे. ही बाब खर्चिक व वेळकाढू असल्याने, अनेकदा भिवंडीतील नाट्यरसिकांना मन मारावे लागते.नाट्यगृहाच्या दुरुस्तीसाठी महापालिकेने लाखो रुपयांचा निधी खर्च केला आहे. मात्र, तरी वास्तूची दुरवस्था झाल्याने नाट्यगृह बंद आहे. येत्या ६ जानेवारी रोजी स्व. मीनाताई ठाकरे यांची जयंती साजरी होणार असून, राज्यात शिवसेनेचे ‘ठाकरे सरकार’  सत्तारुढ असताना त्यापूर्वी नाट्यगृहाची दुरुस्ती सुरू करावी, अशी मागणी आहे.नाट्यगृहाच्या दुरुस्तीसाठी दहा कोटींचा निधी मंजूर झाला आहे. मात्र, त्याचे हस्तांतरण अजूनही भिवंडी महापालिकेकडे झालेले नाही. त्यामुळे नाट्यगृह दुरुस्तीचे सुरू झालेले नाही. या निधीसाठी शासकीय स्तरावर पत्रव्यवहार सुरू आहे. निधी मनपाकडे हस्तांतरित झाल्यावर लागलीच दुरुस्ती करण्यात येईल.    - डॉ. पंकज आशिया,     आयुक्त, भिवंडी महापालिका