शहरं
Join us  
Trending Stories
1
हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
3
भूस्खलन होऊन बसवर कोसळली दरड, १८ जणांचा मृत्यू, पण ३ मुलं आश्चर्यकारकरीत्या बचावली  
4
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
5
Bigg Bossचं घर सील, सर्व स्पर्धकांना लवकरच काढणार बाहेर, समोर आलं असं कारण 
6
ICC Womens World Cup 2025 : हेदर नाइटचा हिट शो! इंग्लंडनं बांगलादेशला पराभूत करत भारताला दिला धक्का
7
कस्तुरबा रुग्णालयातील पुस्तक वाटप प्रकरणाला वेगळं वळण, किशोरी पेडणेकरांचा तक्रारदारालाच प्रतिप्रश्न, म्हणाल्या...
8
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
9
अभिषेक शर्मा ICC पुरस्काराच्या शर्यतीत; त्याला कुलदीपसह झिम्बाब्वेचा गडी देणार टक्कर!
10
भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
11
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
13
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
14
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
15
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
16
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
17
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
18
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
19
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
20
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण

भिवंडीतील नाट्यरसिकांच्या नशिबी तीन वर्षांपासून उपेक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 23:53 IST

नाट्यगृह बंद : दहा कोटींचा निधी मंजूर होऊनही मिळाली नाही दमडी

- नितीन पंडीतभिवंडी : भिवंडी परिसरातील नाट्य रसिकांच्या करमणुकीसाठी महापालिकेने उभारलेले एकमेव नाट्यगृह स्व. मीनाताई ठाकरे रंगायतन गेल्या तीन वर्षांपासून दुरुस्तीअभावी बंद आहे. नाट्यगृहाच्या दुरुस्तीकरिता राज्य शासनाने दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असला, तरी तो अद्याप महापालिकेस प्राप्त झालेला नाही. कोरोनाचा प्रभाव कमी होताच ठाणे, कल्याण येथील नाट्यगृहात नाटकांचे प्रयोग सुरू झाले. मात्र, भिवंडीत नाट्यगृह असूनही नाटकांचे प्रयोग होऊ शकत नसल्याने येथील नाट्य रसिकांत तीव्र नाराजी पसरली आहे.स्व. मीनाताई ठाकरे रंगायतन या नाट्यगृहाच्या झालेल्या दुरवस्थेकडे पालिका प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी वारंवार होत आहे. मात्र, गेंड्याची कातडी असलेल्या भिवंडी महापालिका प्रशासनास त्याची काहीही चिंता वाटत नसल्याचे नाट्यरसिकांचे म्हणणे आहे. कोरोना संकटाच्या आधी या नाट्यगृहाच्या दुरुस्तीसाठी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दहा कोटींचा निधी मंजूर केला होता. मात्र, निधी मंजूर होऊनही या नाट्यगृहाच्या दुरुस्तीला मुहूर्त मिळालेला नाही. भिवंडी महापालिकेने नागरिकांच्या करमणुकीसाठी १९९५-९६ साली भव्य नाट्यगृह बांधले. राज्यात प्रथमच शिवसेनेचे सरकार स्थापन झाले होते. याच कालावधीत तत्कालीन भिवंडी नगरपरिषदेत शिवसेनेची सत्ता होती. गेल्या २४ वर्षांच्या कालावधीत या नाट्यगृहाची दुरवस्था झाली असून, सध्या बंद पडले आहे. भिवंडी शहरी व ग्रामीण भागातील नाट्यरसिकांचा त्यामुळे हिरमोड झाला असून, होतकरू व नवकलाकारांच्या कलागुणांना वाव मिळत नसल्याने त्यांचीही अडचण झाली आहे. भिवंडीतील रसिकांना नाटक व इतर मनोरंजनाचे कार्यक्रम पाहण्यासाठी कल्याण, ठाणे, मुंबई या ठिकाणी जावे लागत आहे. ही बाब खर्चिक व वेळकाढू असल्याने, अनेकदा भिवंडीतील नाट्यरसिकांना मन मारावे लागते.नाट्यगृहाच्या दुरुस्तीसाठी महापालिकेने लाखो रुपयांचा निधी खर्च केला आहे. मात्र, तरी वास्तूची दुरवस्था झाल्याने नाट्यगृह बंद आहे. येत्या ६ जानेवारी रोजी स्व. मीनाताई ठाकरे यांची जयंती साजरी होणार असून, राज्यात शिवसेनेचे ‘ठाकरे सरकार’  सत्तारुढ असताना त्यापूर्वी नाट्यगृहाची दुरुस्ती सुरू करावी, अशी मागणी आहे.नाट्यगृहाच्या दुरुस्तीसाठी दहा कोटींचा निधी मंजूर झाला आहे. मात्र, त्याचे हस्तांतरण अजूनही भिवंडी महापालिकेकडे झालेले नाही. त्यामुळे नाट्यगृह दुरुस्तीचे सुरू झालेले नाही. या निधीसाठी शासकीय स्तरावर पत्रव्यवहार सुरू आहे. निधी मनपाकडे हस्तांतरित झाल्यावर लागलीच दुरुस्ती करण्यात येईल.    - डॉ. पंकज आशिया,     आयुक्त, भिवंडी महापालिका